शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात लाचखोर कृषी अधिकाऱ्यांना अभय; ११ दिवसानंतरही निलंबन नाही

By बापू सोळुंके | Updated: April 6, 2023 19:10 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी घेतली होती लाच

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विविध योजना मंजूर करण्यासाठी पुरवठादाराकडून प्रती फाईल लाच घेणाऱ्या खुलताबाद तालुक्यातील कृषी विभागाच्या तीन अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते. या कारवाईनंतर हे अधिकारी चार दिवस जेलमध्ये राहिले होते. अशा या लाचखोर अधिकाऱ्यांना कृषी विभागाने मेहरनजर दाखविल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्यांना घटनेच्या अकरा दिवसानंतरही सेवेतून निलंबित करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.

तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे अशी आरोपींची नावे आहेत. लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना आणलेल्या आहेत. या सर्व योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याने योजनेनुसार एखादी वस्तू खरेदी केली अथवा नाही, याची पडताळणी करण्याचे अधिकार कृषी विभागाच्या विविध स्तरावरील अधिकाऱ्यांना असते. ही पडताळणी झाल्यानंतरच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा ओके रिपार्ट गेल्यानंतरच त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते. 

याचाच गैरफायदा कृषी विभागाचे अधिकारी घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पैसे न दिल्यास कृषी अधिकारी शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही, यासाठी खोडा घालतो,असा आरोप शेतकरी करीत आहेत. अशाच एका प्रकरणात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी तक्रारदार डिलरकडून प्रती फाइल ७००रुपये याप्रमाणे २४ हजार ५००रुपये आणि खुलताबाद तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी घनबहादूर यांच्यासह अन्य मंडळ कृषी अधिकारी नरवडे यांना आणि कार्यालयातील कंत्राटी ऑपरेटर नलावडे यांना २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले होते. तर याच कारवाईदरम्यान स्टॉक रजिस्टरच तपासणी करण्यासाठी मंडळ अधिकारी निकम यांना हजार रुपये लाच घेताना अटक केली होती. एकाच वेळी तीन अधिकारी एक ऑपरेटर लाचेच्या जाळ्यात गेल्याने कृषी विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यातील या घटनेनंतर लाचखोर अधिकाऱ्यांवर झटपट कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र एसीबीच्या कारवाईस ११दिवस उलटले तरी ६ एप्रिलपर्यंत लाचखोर सेवेतून निलंबित करण्यात आले नसल्याचे समोर आले.

आम्ही रिपोर्ट पाठविलाएसीबीकडून आलेल्या कारवाईचा अहवाल कृषी आयुक्तालयास पाठविला आहे. हे अधिकारी किती दिवस अटक होते, याविषयी सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास आवश्यक आहे. याकरीता आम्ही एसीबीशी पत्रव्यवहार करून सविस्तर अहवाल देण्याची विनंती केली आहे. या अहवालानंतर संबंधितांवर शासनाकडून कारवाई होईल.- दिनकर जाधव, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादagricultureशेती