शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात लाचखोर कृषी अधिकाऱ्यांना अभय; ११ दिवसानंतरही निलंबन नाही

By बापू सोळुंके | Updated: April 6, 2023 19:10 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी घेतली होती लाच

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विविध योजना मंजूर करण्यासाठी पुरवठादाराकडून प्रती फाईल लाच घेणाऱ्या खुलताबाद तालुक्यातील कृषी विभागाच्या तीन अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते. या कारवाईनंतर हे अधिकारी चार दिवस जेलमध्ये राहिले होते. अशा या लाचखोर अधिकाऱ्यांना कृषी विभागाने मेहरनजर दाखविल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्यांना घटनेच्या अकरा दिवसानंतरही सेवेतून निलंबित करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.

तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे अशी आरोपींची नावे आहेत. लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना आणलेल्या आहेत. या सर्व योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याने योजनेनुसार एखादी वस्तू खरेदी केली अथवा नाही, याची पडताळणी करण्याचे अधिकार कृषी विभागाच्या विविध स्तरावरील अधिकाऱ्यांना असते. ही पडताळणी झाल्यानंतरच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा ओके रिपार्ट गेल्यानंतरच त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते. 

याचाच गैरफायदा कृषी विभागाचे अधिकारी घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पैसे न दिल्यास कृषी अधिकारी शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही, यासाठी खोडा घालतो,असा आरोप शेतकरी करीत आहेत. अशाच एका प्रकरणात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी तक्रारदार डिलरकडून प्रती फाइल ७००रुपये याप्रमाणे २४ हजार ५००रुपये आणि खुलताबाद तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी घनबहादूर यांच्यासह अन्य मंडळ कृषी अधिकारी नरवडे यांना आणि कार्यालयातील कंत्राटी ऑपरेटर नलावडे यांना २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले होते. तर याच कारवाईदरम्यान स्टॉक रजिस्टरच तपासणी करण्यासाठी मंडळ अधिकारी निकम यांना हजार रुपये लाच घेताना अटक केली होती. एकाच वेळी तीन अधिकारी एक ऑपरेटर लाचेच्या जाळ्यात गेल्याने कृषी विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यातील या घटनेनंतर लाचखोर अधिकाऱ्यांवर झटपट कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र एसीबीच्या कारवाईस ११दिवस उलटले तरी ६ एप्रिलपर्यंत लाचखोर सेवेतून निलंबित करण्यात आले नसल्याचे समोर आले.

आम्ही रिपोर्ट पाठविलाएसीबीकडून आलेल्या कारवाईचा अहवाल कृषी आयुक्तालयास पाठविला आहे. हे अधिकारी किती दिवस अटक होते, याविषयी सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास आवश्यक आहे. याकरीता आम्ही एसीबीशी पत्रव्यवहार करून सविस्तर अहवाल देण्याची विनंती केली आहे. या अहवालानंतर संबंधितांवर शासनाकडून कारवाई होईल.- दिनकर जाधव, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादagricultureशेती