शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात लाचखोर कृषी अधिकाऱ्यांना अभय; ११ दिवसानंतरही निलंबन नाही

By बापू सोळुंके | Updated: April 6, 2023 19:10 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी घेतली होती लाच

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विविध योजना मंजूर करण्यासाठी पुरवठादाराकडून प्रती फाईल लाच घेणाऱ्या खुलताबाद तालुक्यातील कृषी विभागाच्या तीन अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते. या कारवाईनंतर हे अधिकारी चार दिवस जेलमध्ये राहिले होते. अशा या लाचखोर अधिकाऱ्यांना कृषी विभागाने मेहरनजर दाखविल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्यांना घटनेच्या अकरा दिवसानंतरही सेवेतून निलंबित करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.

तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे अशी आरोपींची नावे आहेत. लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना आणलेल्या आहेत. या सर्व योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याने योजनेनुसार एखादी वस्तू खरेदी केली अथवा नाही, याची पडताळणी करण्याचे अधिकार कृषी विभागाच्या विविध स्तरावरील अधिकाऱ्यांना असते. ही पडताळणी झाल्यानंतरच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा ओके रिपार्ट गेल्यानंतरच त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते. 

याचाच गैरफायदा कृषी विभागाचे अधिकारी घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पैसे न दिल्यास कृषी अधिकारी शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही, यासाठी खोडा घालतो,असा आरोप शेतकरी करीत आहेत. अशाच एका प्रकरणात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ठिबक सिंचनची फाईल मंजूर करण्यासाठी तक्रारदार डिलरकडून प्रती फाइल ७००रुपये याप्रमाणे २४ हजार ५००रुपये आणि खुलताबाद तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी घनबहादूर यांच्यासह अन्य मंडळ कृषी अधिकारी नरवडे यांना आणि कार्यालयातील कंत्राटी ऑपरेटर नलावडे यांना २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले होते. तर याच कारवाईदरम्यान स्टॉक रजिस्टरच तपासणी करण्यासाठी मंडळ अधिकारी निकम यांना हजार रुपये लाच घेताना अटक केली होती. एकाच वेळी तीन अधिकारी एक ऑपरेटर लाचेच्या जाळ्यात गेल्याने कृषी विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यातील या घटनेनंतर लाचखोर अधिकाऱ्यांवर झटपट कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र एसीबीच्या कारवाईस ११दिवस उलटले तरी ६ एप्रिलपर्यंत लाचखोर सेवेतून निलंबित करण्यात आले नसल्याचे समोर आले.

आम्ही रिपोर्ट पाठविलाएसीबीकडून आलेल्या कारवाईचा अहवाल कृषी आयुक्तालयास पाठविला आहे. हे अधिकारी किती दिवस अटक होते, याविषयी सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास आवश्यक आहे. याकरीता आम्ही एसीबीशी पत्रव्यवहार करून सविस्तर अहवाल देण्याची विनंती केली आहे. या अहवालानंतर संबंधितांवर शासनाकडून कारवाई होईल.- दिनकर जाधव, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादagricultureशेती