शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळाचा चौथा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 16:41 IST

नदीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सिल्लोड : तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्यांने अतिवृष्टी व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने हताश होऊन  मंगळवारी खेळणा नदीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. सिल्लोड तालुक्यात  अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाचा हा चौथा बळी ठरला. गजानन विनायक जोशी ( 35 वर्ष रा.दहिगाव ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

जोशी हे अल्पभूधारक शेतकरी होते.अतिवृष्टी मुळे खरिपातील पीक वाया गेल्याने ते तणावात होते. दररोज पाऊस पडत आहे शेतातील  पीक जवळपास नष्ट झाले आहे.आता कर्ज कसे फेडावे.रब्बी पेरणी साठी पैसे कुठून आणावे याची चिंता त्यांना होती. मी हताश झालो आहे. व आता आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही असे जोशी अनेक जणांजवळ बोलत होते. अनेकांनी त्यांची मनधरणी केली. शासनावर विश्वास ठेवा सर्व काही बरे होईल. शासन नक्की मदत करेल अशी समजूत अनेकांनी काढली. मात्र त्यांनी नैराश्यातून आपली जीवन यात्रा संपविली  असे नातेवाईकांनी सांगितले. 

तीन दिवसांपूर्वी सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील ओल्या दुष्काळा ला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. काल याच गावातील एका शेतकऱ्याला शेतातील नुकसान पाहून ह्रदय विकाराचा झटका आला. सारोळा येथे पुराच्या पाण्यात बुडून एका मुलीचा मृत्यू झाला. तर आज दहिगाव येथील गजानन जोशी या शेतकऱ्यांने नदीत उडी घेवून आत्महत्या केली.

सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी मुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने लवकर मदत केली नाही व शेतकऱ्यांना धीर दिला नाही.त्यांचे समाज प्रबोधन केले नाही तर हा आकडा वाढू शकतो. तालुक्यातील शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज  निर्माण झाली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेती