शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळाचा चौथा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 16:41 IST

नदीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सिल्लोड : तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्यांने अतिवृष्टी व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने हताश होऊन  मंगळवारी खेळणा नदीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. सिल्लोड तालुक्यात  अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाचा हा चौथा बळी ठरला. गजानन विनायक जोशी ( 35 वर्ष रा.दहिगाव ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

जोशी हे अल्पभूधारक शेतकरी होते.अतिवृष्टी मुळे खरिपातील पीक वाया गेल्याने ते तणावात होते. दररोज पाऊस पडत आहे शेतातील  पीक जवळपास नष्ट झाले आहे.आता कर्ज कसे फेडावे.रब्बी पेरणी साठी पैसे कुठून आणावे याची चिंता त्यांना होती. मी हताश झालो आहे. व आता आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही असे जोशी अनेक जणांजवळ बोलत होते. अनेकांनी त्यांची मनधरणी केली. शासनावर विश्वास ठेवा सर्व काही बरे होईल. शासन नक्की मदत करेल अशी समजूत अनेकांनी काढली. मात्र त्यांनी नैराश्यातून आपली जीवन यात्रा संपविली  असे नातेवाईकांनी सांगितले. 

तीन दिवसांपूर्वी सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील ओल्या दुष्काळा ला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. काल याच गावातील एका शेतकऱ्याला शेतातील नुकसान पाहून ह्रदय विकाराचा झटका आला. सारोळा येथे पुराच्या पाण्यात बुडून एका मुलीचा मृत्यू झाला. तर आज दहिगाव येथील गजानन जोशी या शेतकऱ्यांने नदीत उडी घेवून आत्महत्या केली.

सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी मुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने लवकर मदत केली नाही व शेतकऱ्यांना धीर दिला नाही.त्यांचे समाज प्रबोधन केले नाही तर हा आकडा वाढू शकतो. तालुक्यातील शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज  निर्माण झाली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेती