शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 18:01 IST

जेथे पारंपरिक शिक्षणाचीच वानवा, अशा मराठवाड्याच्या प्रतिभेची पताका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे जगभरात फडकली. गेल्या ६० वर्षांत अनेक अडचणींवर मात करून हे महाविद्यालय नावारूपाला येतानाच स्वत:लाही तंत्रज्ञानात अद्ययावत करीत राहिले. येथून बाहेर पडलेल्या अभियंत्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यशैलीचा अमीट ठसा उमटविला. हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने जागविलेल्या या आठवणी...

ठळक मुद्देजायकवाडीसह शेकडो सिंचन प्रकल्पांच्या उभारणीत तांत्रिक साहाय्यऔरंगाबादेतील उद्योगांना पुरविले कुशल मनुष्यबळ

- राम शिनगारे  

औरंगाबाद : मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणीच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जिका) विद्यार्थ्यांनी केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाकाय जायकवाडी धरणाच्या उभारणीत तांत्रिक साहाय्य करीत ‘जिका’च्या विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिले. १९७२ च्या दुष्काळानंतर उभारण्यात आलेल्या बहुतांश सिंचन प्रकल्पांत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलला, तसेच  १९७० च्या काळातच औरंगाबादेत औद्योगिक कंपन्या येण्यास सुुरुवात झाली. या कंपन्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थीच होते. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी करणाऱ्या प्रत्येक प्रकल्पात ‘जिका’च्या माजी विद्यार्थ्यांचा वाटा असल्याची माहिती उद्योजक तथा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गर्व्हनिंग कौन्सिलचे अध्यक्ष विवेक भोसले यांनी दिली.

१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते

मराठवाड्यातील पहिल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १९६० साली करण्यात आली. हे महाविद्यालय ज्या इमारतींमध्ये सुरू झाले, ती इमारत पॉलिटेक्निक महाविद्यालयासाठी बांधण्यात आली होती. १९६०-६१ या शैक्षणिक वर्षात सुरू झालेली पहिली बॅच १९६३ साली शिक्षण घेऊन बाहेर पडली. त्यावेळी अभियांत्रिकीचे शिक्षण हे तीन वर्षांचे होते. सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरीही मराठवाड्यातील विद्यार्थी जिद्दीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. जायकवाडी प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली होती. या प्रकल्पावर छोटी-छोटी तांत्रिक कामे, विभाग सांभाळण्यासाठी सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने गरज होती. सिव्हिलमधील विद्यार्थी तात्काळ बांधकाम विभागात दाखल होत होती. यातील उर्वरित विद्यार्थी सिंचन विभागात म्हणजेच जायकवाडी प्रकल्पावर कामासाठी रुजू होत.

शासकीय अभियांत्रिकीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी जायकवाडीच्या प्रकल्पात रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. १९७० ते ७५ या काळात मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. या काळात रोजगार हमीसह इतर कामे शासनाने सुरू केली होती. या कामांमध्ये रस्त्याची आणि सिंचनाची कामे मोठ्या संख्येने होती. ही कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य करून घेण्याची जबाबदारी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून शासकीय नोकरी लागलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पार पाडली असल्याचेही विवेक भोसले यांनी सांगितले. त्यामुळे मराठवाड्यातील शेती, उद्योगासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे.

'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा

उद्योगांना पुरविले कुशल मनुष्यबळऔरंगाबाद शहरातील औद्योगिक वसाहतींमध्ये जायकवाडीचे काम वेगाने सुरू झाल्यानंतर अनेक उद्योग येऊ लागले होते. यामध्ये १९७०-७१ मध्ये एपीआय, इंडियन टूल, ग्रिव्ह्यूज, फोर्ब्स, सेन्ट्रॉन या कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्यांमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल विभागात बहुतांश विद्यार्थी हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे होते. या कंपन्यांच्या नंतर औरंगाबादेत मोठ्या संख्येने उद्योग आले. त्यामध्ये बिर्ला केनामेटल, कॉस्मो, जॉन्सन, बागला ग्रुप, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स, वोखार्ड आदी कंपन्या वाळूज एमआयडीमध्ये दाखल झाल्या. या कंपन्यांनाही मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळ याच महाविद्यालयातून पुरविण्यात आले असल्याचेही विवेक भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Goverment Engineering College Aurangabadशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबादAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाEducationशिक्षण