शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आगामी विधानसभा विरोधी पक्षनेतामुक्त असेल - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:10 IST

ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर मोदी

ठळक मुद्देआम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले, असे सांगतात. हरल्यानंतरही ते काय चुकले हे पाहत नाही.

औरंगाबाद : काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते सांगतात, आम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले. त्यांना ईव्हीमएमने २००४ ते २०१४ पर्यंत झालेल्या निवडणुका चालल्या. आता जनतेनेच नाकारल्यानंतर ईव्हीएमला दोष देत आहेत; पण देशात ‘ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर मोदी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता मिळण्याएवढ्यासुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाहीत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यभरात काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा मंगळवारी सायंकाळी औरंगाबादेत पोहोचली.

चिकलठाणा ते मराठवाडा सांस्कृतिक मैदानादरम्यान रोड शो काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अतुल सावे, आ. सुरजितसिंह ठाकूर, आ. प्रशांत बंब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजपाने विरोधी पक्षात असताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा काढत सत्तापरिवर्तन केले. आता सत्तेत असताना जनतेशी संवाद साधण्यासाठी यात्रा काढली. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विरोधी पक्षांनीही यात्रा काढल्या आहेत. त्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत. १५ वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांच्या माजोरी आणि मुजोरीच्या प्रवृत्तीमुळे लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. देशाच्या लोकसभेत २०१४ मध्ये विरोधकांचे विरोधी पक्षनेता बनविण्याएवढे लोक निवडून आले नाहीत. २०१९ सालीदेखील हीच परिस्थिती आली. संसदेत १० वर्षे विरोधी पक्षनेता नसेल. आता राज्याच्या विधानसभेतही तुमच्या आशीर्वादाने विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेता बनविण्याएवढे लोक निवडणूक येणार नाहीत. सत्तेत येण्याची स्वप्ने तर सोडून द्या, आता हरल्यानंतरही ते काय चुकले हे पाहत नाही. जनतेची माफी मागत नाहीत. आम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले, असे सांगतात. बारामतीमध्ये जिंकले की ईव्हीएमचा विजय नसतो; पण आमचे दानवे जिंकले की, ईव्हीएमचा विजय असतो. एखादा बुद्दू पोरगा परीक्षेला बसून नापास झाल्यानंतर पेनला दोष देतो. आताही ही काँग्रेस-राष्ट्रवादीची नापास पोरं ईव्हीएमला दोष देत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.  

यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या जाहीर सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस