शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

आगामी विधानसभा विरोधी पक्षनेतामुक्त असेल - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:10 IST

ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर मोदी

ठळक मुद्देआम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले, असे सांगतात. हरल्यानंतरही ते काय चुकले हे पाहत नाही.

औरंगाबाद : काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते सांगतात, आम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले. त्यांना ईव्हीमएमने २००४ ते २०१४ पर्यंत झालेल्या निवडणुका चालल्या. आता जनतेनेच नाकारल्यानंतर ईव्हीएमला दोष देत आहेत; पण देशात ‘ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर मोदी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता मिळण्याएवढ्यासुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाहीत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यभरात काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा मंगळवारी सायंकाळी औरंगाबादेत पोहोचली.

चिकलठाणा ते मराठवाडा सांस्कृतिक मैदानादरम्यान रोड शो काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अतुल सावे, आ. सुरजितसिंह ठाकूर, आ. प्रशांत बंब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजपाने विरोधी पक्षात असताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा काढत सत्तापरिवर्तन केले. आता सत्तेत असताना जनतेशी संवाद साधण्यासाठी यात्रा काढली. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विरोधी पक्षांनीही यात्रा काढल्या आहेत. त्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत. १५ वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांच्या माजोरी आणि मुजोरीच्या प्रवृत्तीमुळे लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. देशाच्या लोकसभेत २०१४ मध्ये विरोधकांचे विरोधी पक्षनेता बनविण्याएवढे लोक निवडून आले नाहीत. २०१९ सालीदेखील हीच परिस्थिती आली. संसदेत १० वर्षे विरोधी पक्षनेता नसेल. आता राज्याच्या विधानसभेतही तुमच्या आशीर्वादाने विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेता बनविण्याएवढे लोक निवडणूक येणार नाहीत. सत्तेत येण्याची स्वप्ने तर सोडून द्या, आता हरल्यानंतरही ते काय चुकले हे पाहत नाही. जनतेची माफी मागत नाहीत. आम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले, असे सांगतात. बारामतीमध्ये जिंकले की ईव्हीएमचा विजय नसतो; पण आमचे दानवे जिंकले की, ईव्हीएमचा विजय असतो. एखादा बुद्दू पोरगा परीक्षेला बसून नापास झाल्यानंतर पेनला दोष देतो. आताही ही काँग्रेस-राष्ट्रवादीची नापास पोरं ईव्हीएमला दोष देत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.  

यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या जाहीर सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस