शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

आगामी विधानसभा विरोधी पक्षनेतामुक्त असेल - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:10 IST

ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर मोदी

ठळक मुद्देआम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले, असे सांगतात. हरल्यानंतरही ते काय चुकले हे पाहत नाही.

औरंगाबाद : काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते सांगतात, आम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले. त्यांना ईव्हीमएमने २००४ ते २०१४ पर्यंत झालेल्या निवडणुका चालल्या. आता जनतेनेच नाकारल्यानंतर ईव्हीएमला दोष देत आहेत; पण देशात ‘ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर मोदी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता मिळण्याएवढ्यासुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाहीत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यभरात काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा मंगळवारी सायंकाळी औरंगाबादेत पोहोचली.

चिकलठाणा ते मराठवाडा सांस्कृतिक मैदानादरम्यान रोड शो काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अतुल सावे, आ. सुरजितसिंह ठाकूर, आ. प्रशांत बंब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजपाने विरोधी पक्षात असताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा काढत सत्तापरिवर्तन केले. आता सत्तेत असताना जनतेशी संवाद साधण्यासाठी यात्रा काढली. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विरोधी पक्षांनीही यात्रा काढल्या आहेत. त्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत. १५ वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांच्या माजोरी आणि मुजोरीच्या प्रवृत्तीमुळे लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. देशाच्या लोकसभेत २०१४ मध्ये विरोधकांचे विरोधी पक्षनेता बनविण्याएवढे लोक निवडून आले नाहीत. २०१९ सालीदेखील हीच परिस्थिती आली. संसदेत १० वर्षे विरोधी पक्षनेता नसेल. आता राज्याच्या विधानसभेतही तुमच्या आशीर्वादाने विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेता बनविण्याएवढे लोक निवडणूक येणार नाहीत. सत्तेत येण्याची स्वप्ने तर सोडून द्या, आता हरल्यानंतरही ते काय चुकले हे पाहत नाही. जनतेची माफी मागत नाहीत. आम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले, असे सांगतात. बारामतीमध्ये जिंकले की ईव्हीएमचा विजय नसतो; पण आमचे दानवे जिंकले की, ईव्हीएमचा विजय असतो. एखादा बुद्दू पोरगा परीक्षेला बसून नापास झाल्यानंतर पेनला दोष देतो. आताही ही काँग्रेस-राष्ट्रवादीची नापास पोरं ईव्हीएमला दोष देत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.  

यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या जाहीर सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस