सिद्धार्थ महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ
By Admin | Updated: April 14, 2016 00:58 IST2016-04-14T00:44:53+5:302016-04-14T00:58:35+5:30
जाफराबाद : महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभाग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त समता व न्याय वर्ष म्हणून साजरे करीत आहे.

सिद्धार्थ महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ
जाफराबाद : महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभाग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त समता व न्याय वर्ष म्हणून साजरे करीत आहे. याचे औचित्य साधून येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे माजी प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा मेळावा. त्याचबरोबर सामाजिक न्यायाचा संदेश देण्यासाठी व्याख्यान, प्रबोधन, मनोरंजन आदी कार्यक्रम घेऊन माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व स्मृतीचिन्ह देऊन मंगळवारी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. रमेश खंडागळे, रतनकुमार पंडागळे, कैलास कांबळे, प्राचार्य डॉ. अशोक काकडे, सचिव प्रा. राहूल म्हस्के, कृष्णा भंडारी, प्रा. साहेबराव गायकवाड, सभापती चंद्रकांत चौतमल, वामन दांडगे, अनिल बोर्डे, सुनिल म्हस्के यांची उपस्थिती होती.
प्रबोधन कार्यक्रमप्रसंगी बोलताना अॅड. रमेश खंडागळे म्हणाले, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन आजचा तरूणांनी काम करण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता टिकून राहण्यासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन राज्य घटनेच्या माध्यमातून अधिकार मिळवून दिले आहे. मात्र, याच अधिकाराची जाणीव आपण विसरत आहोत, असे अॅड. खंडागळे म्हणाले. यावेळी रतनकुमार पंडागळे, कैलास कांबळे, प्राचार्य डॉ. अशोक काकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
समारोप प्रसंगी अध्यक्ष दादासाहेब म्हस्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळे आपल्या मूलभूत हक्काने आज आपण सर्व क्षेत्रात काम करत आहे, ते विसरून चालणार नाही, असे म्हस्के म्हणाले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उच्च शिखरावर काम करीत आहे. त्यापैकी महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यासह प्रा. मनोज पगारे, प्रा. भगवान गाढवे, संदीप जाधव, कौतिक पंडित, अभिजीत साळवे, दीपक खरात, चेतन बायस यासह विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रात्री भीमा तुझ्या जन्मामुळे या समाज प्रबोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी एसीबीचे उपअधीक्षक प्रवीण मोरे उपस्थित होते.