शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

बील भरायची सक्ती केली; संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 4:40 PM

शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये बिल भरून नवीन रोहित्राची मागणी केली; परंतु महावितरणने सहा महिन्यांपासून हे रोहित्र दुरुस्त करून दिले नाही, तर नवीन रोहित्रदेखील बसविले नाही.

लासूर स्टेशन : सहा महिन्यांपासून रोहित्राची मागणी करूनदेखील महावितरण अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जात आहे. त्यात बिल भरण्याची सक्ती केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासूर स्टेशन येथील सहायक अभियंत्याला कार्यालयात कोंडले. अखेर शिल्लेगाव पोलिसांच्या मध्यस्थीने अभियंत्याची सुटका झाली.

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, अनंतपूर, वैरागड, बाभूळगाव शिवारातील रोहित्र सहा महिन्यांपुर्वी जळाले होते. शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये बिल भरून नवीन रोहित्राची मागणी केली; परंतु महावितरणने सहा महिन्यांपासून हे रोहित्र दुरुस्त करून दिले नाही, तर नवीन रोहित्रदेखील बसविले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून येथील महावितरण कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला गेला. मंगळवारी काही शेतकरी कार्यालयात विचारणा करण्यास गेले असता पुन्हा १२ हजार रुपये बिल भरा, नाहीतर रोहित्र नाही, असे सांगण्यात आले. त्यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सहायक अभियंता शिवाजी आहेर यांना धारेवर धरले.

सहा महिन्यांपासून रोहित्र तुमच्या ताब्यात आहे आणि आता सक्तीचे बिल भरण्यास का सांगता. असा प्रश्न उपस्थित करून आहेर यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडले. अखेर शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यस्थी करून शेतकऱ्यांना शांत होण्यास सांगितले. महावितरणचे कार्यकारी अभियंता काळे यांना फोनवरून माहिती देऊन प्रश्न सोडविण्यास सांगितले. यावेळी उपसरपंच रवींद्र चव्हाण, भाजपायुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव, देवीदास ठोंबरे, भगवान गाडे, कारभारी जाधव, वाल्मीक वाकळे, प्रतीक देसले आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद