शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फूल बाजाराला निवडणुकीच्या रणधुमाळीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:28 IST

येत्या काळात १६ लग्नतिथी आहेत. शिवाय लोकसभा निवडणूक आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी फुलांची आवक घटली 

औरंगाबाद : यंदा दुष्काळात शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. फुलांचे उत्पादनही घटले आहे. पण मागणी नसल्याने फुलांचे भाव स्थिर आहेत. पण येत्या काळात १६ लग्नतिथी आहेत. शिवाय लोकसभा निवडणूक आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. यामुळे फुलांना ‘भाव’ चढणार आहे. मात्र, यासाठी बाजाराला रणधुमाळीची प्रतीक्षा आहे. 

शालेय व महाविद्यालयीन परीक्षेचा काळ असल्याने लग्नतिथी असूनही या काळात लग्नाचे प्रमाण कमी असते. मार्च महिन्यात ६ लग्नतिथी बाकी आहेत, तसेच एप्रिल महिन्यात १० लग्नतिथी आहेत. त्यामुळे फुलांना मागणी राहील. विशेषत: उन्हाळ्यात ग्रामीण भागात विवाह लावण्याची संख्या अधिक असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे त्यात किती फरक पडतो, याचा अंदाज पुढील महिन्यातच लक्षात येईल. पण, आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एप्रिल महिन्यात जसजसे तापमान वाढत जाईल तसतसे राजकीय तापमानही चढत जाणार आहे. मिरवणुका, प्रचारफेरी, जाहीर सभा यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघणार आहे.

या काळात स्वागत, सत्कारासाठी हारांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. निवडणुकीत जेवढे जास्त उमेदवार तेवढी हारांची विक्री अधिक असते. यामुळे बंडखोर उमेदवार जेवढे जास्त उभे राहतील तेवढे या फूल व्यवसायाच्या दृष्टीने चांगले मानले जाते. फुलांचे व्यापारी बबलूशेठ यांनी सांगितले की, सध्या सिटीचौक, अत्तरगल्ली परिसरात मिळून दररोज दीड ते दोन टन फुलांची आवक होत आहे. यंदा पाण्याअभावी उत्पादन घटले आहे. पण मागणी वाढली तर येथील व्यापारी राज्यातूनच नव्हेतर परराज्यांतूनही फुले मागवतील, एवढी क्षमता त्यांच्यात आहे.

गलांडा २५ ते ३० रुपये किलो तर झेंडू २० ते ५० रुपये किलोदरम्यान विकला जात आहे. बिजलीचा हंगाम संपत आला आहे. ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने बिजली विकली जात आहे. निवडणुकीत गुलाबांच्या हाराचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. शहरात शिर्डीहून गुलाब मागविला जातो. तापमान वाढत असल्याने प्लास्टिकच्या मोठ्या गोणीत गुलाबात बर्फाचे तुकडे टाकून आणले जाते. यामुळे गुलाब बराच वेळ टवटवीत राहतो. मागणी नसल्याने सध्या १ रुपयास एक गुलाब विकला जातो. मागणी वाढल्यास फुलांना ‘भाव’ चढेल. यामुळे शेतकरीही रणधुमाळीची वाट पाहत आहे. 

मोगरा फुलला...सिटीचौकातील फूल बाजारात सध्या मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला आहे. उन्हाळ्याला सुरुवात होताच बाजारात नवीन मोगऱ्याची आवक सुरू झाली आहे. टपोरा, टवटवीत मोगरा पाहताच ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियांसी आला’ या गीताची आठवण प्रत्येकाला होत आहे. १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे मोगरा विकला जात आहे. तर मोगऱ्याचा झेला (विणलेला मोठा गजरा) १५० ते २०० रुपये (४०० ग्रॅम) विकल्या जात आहे. खास करून लग्नात या मोगऱ्याला अधिक मागणी असते. 

टॅग्स :MarketबाजारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aurangabadऔरंगाबाद