शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

फूल बाजाराला निवडणुकीच्या रणधुमाळीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:28 IST

येत्या काळात १६ लग्नतिथी आहेत. शिवाय लोकसभा निवडणूक आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी फुलांची आवक घटली 

औरंगाबाद : यंदा दुष्काळात शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. फुलांचे उत्पादनही घटले आहे. पण मागणी नसल्याने फुलांचे भाव स्थिर आहेत. पण येत्या काळात १६ लग्नतिथी आहेत. शिवाय लोकसभा निवडणूक आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. यामुळे फुलांना ‘भाव’ चढणार आहे. मात्र, यासाठी बाजाराला रणधुमाळीची प्रतीक्षा आहे. 

शालेय व महाविद्यालयीन परीक्षेचा काळ असल्याने लग्नतिथी असूनही या काळात लग्नाचे प्रमाण कमी असते. मार्च महिन्यात ६ लग्नतिथी बाकी आहेत, तसेच एप्रिल महिन्यात १० लग्नतिथी आहेत. त्यामुळे फुलांना मागणी राहील. विशेषत: उन्हाळ्यात ग्रामीण भागात विवाह लावण्याची संख्या अधिक असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे त्यात किती फरक पडतो, याचा अंदाज पुढील महिन्यातच लक्षात येईल. पण, आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एप्रिल महिन्यात जसजसे तापमान वाढत जाईल तसतसे राजकीय तापमानही चढत जाणार आहे. मिरवणुका, प्रचारफेरी, जाहीर सभा यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघणार आहे.

या काळात स्वागत, सत्कारासाठी हारांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. निवडणुकीत जेवढे जास्त उमेदवार तेवढी हारांची विक्री अधिक असते. यामुळे बंडखोर उमेदवार जेवढे जास्त उभे राहतील तेवढे या फूल व्यवसायाच्या दृष्टीने चांगले मानले जाते. फुलांचे व्यापारी बबलूशेठ यांनी सांगितले की, सध्या सिटीचौक, अत्तरगल्ली परिसरात मिळून दररोज दीड ते दोन टन फुलांची आवक होत आहे. यंदा पाण्याअभावी उत्पादन घटले आहे. पण मागणी वाढली तर येथील व्यापारी राज्यातूनच नव्हेतर परराज्यांतूनही फुले मागवतील, एवढी क्षमता त्यांच्यात आहे.

गलांडा २५ ते ३० रुपये किलो तर झेंडू २० ते ५० रुपये किलोदरम्यान विकला जात आहे. बिजलीचा हंगाम संपत आला आहे. ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने बिजली विकली जात आहे. निवडणुकीत गुलाबांच्या हाराचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. शहरात शिर्डीहून गुलाब मागविला जातो. तापमान वाढत असल्याने प्लास्टिकच्या मोठ्या गोणीत गुलाबात बर्फाचे तुकडे टाकून आणले जाते. यामुळे गुलाब बराच वेळ टवटवीत राहतो. मागणी नसल्याने सध्या १ रुपयास एक गुलाब विकला जातो. मागणी वाढल्यास फुलांना ‘भाव’ चढेल. यामुळे शेतकरीही रणधुमाळीची वाट पाहत आहे. 

मोगरा फुलला...सिटीचौकातील फूल बाजारात सध्या मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला आहे. उन्हाळ्याला सुरुवात होताच बाजारात नवीन मोगऱ्याची आवक सुरू झाली आहे. टपोरा, टवटवीत मोगरा पाहताच ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियांसी आला’ या गीताची आठवण प्रत्येकाला होत आहे. १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे मोगरा विकला जात आहे. तर मोगऱ्याचा झेला (विणलेला मोठा गजरा) १५० ते २०० रुपये (४०० ग्रॅम) विकल्या जात आहे. खास करून लग्नात या मोगऱ्याला अधिक मागणी असते. 

टॅग्स :MarketबाजारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aurangabadऔरंगाबाद