शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

फूल बाजाराला निवडणुकीच्या रणधुमाळीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:28 IST

येत्या काळात १६ लग्नतिथी आहेत. शिवाय लोकसभा निवडणूक आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी फुलांची आवक घटली 

औरंगाबाद : यंदा दुष्काळात शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. फुलांचे उत्पादनही घटले आहे. पण मागणी नसल्याने फुलांचे भाव स्थिर आहेत. पण येत्या काळात १६ लग्नतिथी आहेत. शिवाय लोकसभा निवडणूक आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. यामुळे फुलांना ‘भाव’ चढणार आहे. मात्र, यासाठी बाजाराला रणधुमाळीची प्रतीक्षा आहे. 

शालेय व महाविद्यालयीन परीक्षेचा काळ असल्याने लग्नतिथी असूनही या काळात लग्नाचे प्रमाण कमी असते. मार्च महिन्यात ६ लग्नतिथी बाकी आहेत, तसेच एप्रिल महिन्यात १० लग्नतिथी आहेत. त्यामुळे फुलांना मागणी राहील. विशेषत: उन्हाळ्यात ग्रामीण भागात विवाह लावण्याची संख्या अधिक असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे त्यात किती फरक पडतो, याचा अंदाज पुढील महिन्यातच लक्षात येईल. पण, आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एप्रिल महिन्यात जसजसे तापमान वाढत जाईल तसतसे राजकीय तापमानही चढत जाणार आहे. मिरवणुका, प्रचारफेरी, जाहीर सभा यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघणार आहे.

या काळात स्वागत, सत्कारासाठी हारांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. निवडणुकीत जेवढे जास्त उमेदवार तेवढी हारांची विक्री अधिक असते. यामुळे बंडखोर उमेदवार जेवढे जास्त उभे राहतील तेवढे या फूल व्यवसायाच्या दृष्टीने चांगले मानले जाते. फुलांचे व्यापारी बबलूशेठ यांनी सांगितले की, सध्या सिटीचौक, अत्तरगल्ली परिसरात मिळून दररोज दीड ते दोन टन फुलांची आवक होत आहे. यंदा पाण्याअभावी उत्पादन घटले आहे. पण मागणी वाढली तर येथील व्यापारी राज्यातूनच नव्हेतर परराज्यांतूनही फुले मागवतील, एवढी क्षमता त्यांच्यात आहे.

गलांडा २५ ते ३० रुपये किलो तर झेंडू २० ते ५० रुपये किलोदरम्यान विकला जात आहे. बिजलीचा हंगाम संपत आला आहे. ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने बिजली विकली जात आहे. निवडणुकीत गुलाबांच्या हाराचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. शहरात शिर्डीहून गुलाब मागविला जातो. तापमान वाढत असल्याने प्लास्टिकच्या मोठ्या गोणीत गुलाबात बर्फाचे तुकडे टाकून आणले जाते. यामुळे गुलाब बराच वेळ टवटवीत राहतो. मागणी नसल्याने सध्या १ रुपयास एक गुलाब विकला जातो. मागणी वाढल्यास फुलांना ‘भाव’ चढेल. यामुळे शेतकरीही रणधुमाळीची वाट पाहत आहे. 

मोगरा फुलला...सिटीचौकातील फूल बाजारात सध्या मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला आहे. उन्हाळ्याला सुरुवात होताच बाजारात नवीन मोगऱ्याची आवक सुरू झाली आहे. टपोरा, टवटवीत मोगरा पाहताच ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियांसी आला’ या गीताची आठवण प्रत्येकाला होत आहे. १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे मोगरा विकला जात आहे. तर मोगऱ्याचा झेला (विणलेला मोठा गजरा) १५० ते २०० रुपये (४०० ग्रॅम) विकल्या जात आहे. खास करून लग्नात या मोगऱ्याला अधिक मागणी असते. 

टॅग्स :MarketबाजारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aurangabadऔरंगाबाद