शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

मुलाचे लग्न पाच दिवसांवर, मायबापाचा अपघाती मृत्यू, औरंगाबादमध्ये भरधाव ट्रकखाली चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 07:56 IST

मुलाच्या लग्नाला अवघे  पाच दिवस शिल्लक राहिले असताना त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या वर मायबापाचा करोडी फाट्याजवळ भरधाव ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला

औरंगाबाद : मुलाच्या लग्नाला अवघे  पाच दिवस शिल्लक राहिले असताना त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या वर मायबापाचा करोडी फाट्याजवळ भरधाव ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार दाम्पत्याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. यामुळे त्यांचे मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला.  संजय पूनमसिंग छानवाल (५१) आणि मीना संजय छानवाल (४६, दोघे. रा. परसोडा, ता. वैजापूर) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. त्यांचा लहान मुलगा गणेशचा विवाह औरंगाबाद तालुक्यातील शामवाडी येथे ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याचे रीतसर निमंत्रण नातेवाइकांना देण्यासाठी ते मोटारसायकलवरून राजेवाडी (ता. बदनापूर) येथे निघाले होते. मात्र, धुळे-सोलापूर महामार्गावर काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाखालून जात असताना समोरून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यात ते ट्रकच्या समोरच्या चाकाखाली आले. ट्रकने त्यांना  काही फूट फरपटत नेल्याने त्यांच्या शरीरांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.      

उद्या परत येऊ, असे सांगून गेले अन्‌...संजय आणि मीना छानवाल यांनी घरून निघताना राजेवाडी येथे आज रात्री मुक्काम करू आणि उद्या (शनिवारी) दुपारपर्यंत घरी परत येऊ, असे मुलगी राधा आणि नवरदेव गणेश यांना सांगितले होते. मात्र, आजच्या घटनेने ते कधीच घरी परतणार नाहीत. त्यांच्या मृत्यूमुळे छानवाल  कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.  

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद