शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाड्यांमध्ये अग्निरोधक साहित्याची वानवा

By admin | Updated: October 27, 2014 00:11 IST

संतोष हिरेमठ, औरंगाबाद रेल्वे प्रशासन आगीच्या घटना रोखण्याची जबाबदारी झटकत असल्याची परिस्थिती अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून येत आहे

संतोष हिरेमठ, औरंगाबाद‘रेल्वे प्रवासादरम्यान ज्वालाग्राही पदार्थ नेऊ नये,’ अशी केवळ घोषणा करून रेल्वे प्रशासन आगीच्या घटना रोखण्याची जबाबदारी झटकत असल्याची परिस्थिती अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून येत आहे. एक्स्प्रेस रेल्वेच्या द्वितीय आणि अनारक्षित बोगींमध्ये, त्यातही पॅसेंजर गाड्यांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आग वेळीच रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची वानवा दिसून येत आहे. आवश्यक ती यंत्रणा पुरविण्याकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत असल्याने ‘बर्निंग ट्रेन’चा धोका मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.सर्वसामान्य प्रवाशांपासून तर उच्च श्रेणीच्या प्रवाशांकडून रेल्वेतून प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे वर्षभर प्रवाशांची रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी दिसून येते; परंतु सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र विविध रेल्वेगाड्यांमधील परिस्थितीवरून दिसून येत आहे. उच्च श्रेणीच्या वातानुकूलित बोगींमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्ष असल्याचे चित्र आहे. बहुतांश एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वातानुकूलित बोगींमध्ये अग्निरोधक साहित्य दिसून येते; परंतु द्वितीय श्रेणीत ही यंत्रणा अपवादानेच दिसून येते. त्यातही पॅसेंजर रेल्वेगाड्यांमध्ये या यंत्रणेची वानवाच दिसून येते. रेल्वे इंजिन, गार्डची बोगी, पेंट्री कार या ठिकाणीच ही अग्निशमन यंत्रणा ठेवण्याची तसदी प्रशासन घेत आहे. रेल्वेमध्ये दुर्दैवाने आग लागल्यास अग्निशमनविरोधी सिलिंडरमधील कार्बन डायआॅक्साईड गॅसद्वारे परिस्थितीवर वेळीच नियंत्रण येण्यास मोठी मदत होते; परंतु प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रेल्वेगाड्यांचा प्रवास जीवावर बेतत आहे.