शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 14:47 IST

औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग लागली आहे.

औरंगाबाद - मध्यवर्ती  बस स्थानक परिसरात असलेल्या पुलाखालील कचऱ्याला आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या एका बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.  यामुळे परिसरात धुराचे मोठ-मोठे लोट पसरून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. 

मध्यवर्ती बस स्थानकाला लागून असलेल्या सिद्धार्थ उद्यानासमोरील पुलाखाली मनपाकडून कचरा टाकण्यात येतो. यामुळे येथे कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले आहेत. आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान येथे अचानक आग लागली. काही नागरिकांनी याची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला कळवली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. यानंतर आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळविण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या काळात आगीमुळे पुलाखालून धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते. यामुळे मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणारी वाहतूक काही काळ प्रभावित झाली.  तसेच नागरिकांना धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

मनपा विरोधात नागरिकांचा 'गार्बेज वॉक'दरम्यान, शहरातील कचराकोंडीचा आज ६१ वा दिवस असून महापालिका प्रशासन या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. बैठका, निविदा प्रक्रियेतच वेळ वाया घालविण्यात येत आहे. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. यामुळे कचऱ्याचे ढिग सतत घुमसत असतात. या प्रश्नी मनपा विरोधात आज सकाळी शहरातील नागरिकांनी पैठण गेट येथून 'गार्बेज वॉक' काढण्यात आला. यावेळी महापौर व अतिरिक्त मनपा आयुक्तांनी शहर ३० एप्रिलपर्यंत कचरा मुक्त करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :fireआगGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका