अग्निशमन विभागाचे पितळ पडले उघडे
By Admin | Updated: May 23, 2014 01:08 IST2014-05-23T00:55:51+5:302014-05-23T01:08:50+5:30
विकास राऊत , औरंगाबाद मेट्रोसिटी, डीएमआयसीच्या दिशेने झेपावणारे, बहुमजली इमारतींचे हे शहर विकासाच्या दिशेने चाललेले असताना एक भयावह सत्य पुढे आले आहे.

अग्निशमन विभागाचे पितळ पडले उघडे
विकास राऊत , औरंगाबाद मेट्रोसिटी, डीएमआयसीच्या दिशेने झेपावणारे, बहुमजली इमारतींचे हे शहर विकासाच्या दिशेने चाललेले असताना एक भयावह सत्य पुढे आले आहे. शहरातील एखाद्या ८ मजली इमारतीत दुर्दैवाने आगीची घटना घडली, तर ती आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाकडे कुठलीही यंत्रणा नसल्याने मनपाचे पितळ उघडे पडले आहे. औरंगपुर्यातील नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स या होम अप्लायन्सच्या दुकानाला आग लागली. ती इमारत चार मजली होती. म्हणजेच १२ मीटर उंच असलेल्या त्या इमारतीची आग विझविण्यासाठीदेखील पालिकेला १२ तास प्रयत्न करावे लागले. सध्या असलेली यंत्रणा आग विझविण्यास कमी पडत होती. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी औरंगाबाद मनपावर असताना शहरातील २४ मीटरपर्यंतच्या इमारतींची सुरक्षा पालिका करू शकणार नाही. १२ मीटरपर्यंत म्हणजेच ४ मजल्यांपर्यंत पाणी व फोम फवारणीची यंत्रणा अग्निशमन विभागाकडे आहे. ती यंत्रणादेखील अपुर्या कर्मचार्यांमुळे तोकडी पडते. आगीच्या लपेट्यात आलेली वास्तू पूर्णत: जळून खाक होऊन राख होईपर्यंत वाट पाहण्यापलीकडे काहीही करता न येण्याची परिस्थिती ओढावली, तर त्याला असक्षम यंत्रणा जबाबदार असणार हे निश्चित. विभागाला १५० कर्मचार्यांची गरज आहे. शहर वाढत आहे, टोलेजंग इमारती वाढत आहेत. त्यामुळे इमारतींच्या उंचीएवढी यंत्रणा उभी करण्यासाठी निधीची गरज आहे. १५ ते २० कोटी रुपयांपर्यंतची तरतूद त्यासाठी करावी लागेल. ५५ कर्मचार्यांच्या जीवावर सर्व विभाग आहे. २४ मीटरपर्यंतच्या इमारतीपर्यंत फायर बंब पोहोचू शकत नाही. ओढूनताणून १२ ते १५ मीटर उंचीपर्यंत फायर बंब जातो. मात्र, पाहिजे त्या दाबाने पाणी, फोमचा मारा होत नाही. फायर एनओसी व इतर बाबी या परवानगीसाठी असल्या तरी दुर्घटना सांगून घडत नाहीत. त्यामुळे विभाग सक्षमीकरणाची गरज असल्याचे अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. मागील वर्षभरात ३६ सिलिंडर स्फोटाच्या घटना घडल्या, तर ९ कारखान्यांना आग लागली. २३ घरे, २३ दुकाने, २ गोदाम, २९ विद्युत डी.पी., २७ वाहने, २ मंडप, ६ शेतमळे, ३ हॉटेल्स, १ दवाखाना, कापूस फेडरेशन १, ३ कार्यालये, १ शाळा, तर इतर ४९ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.महापालिका हद्दीत व बाहेर १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत ६३३ आगीच्या घटनांमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला आहे, तर साडेपंधरा कोटी रुपयांची संपती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन विभागाने वर्षभरात २९ कोटी १ लाख रुपयांची संपती आगीतून वाचविली. अडीच कोटी रुपयांचा अग्निशमन कर विभागाने वसूल केला. विभागात २९ पदे रिक्त आहेत. ८१ पदे मंजूर आहेत. ५२ कर्मचार्यांच्या जीवावर विभाग चालतो आहे. १५ विविध प्रकारचे फायर टेंडर वाहन विभागाकडे आहेत. बांधकाम परवानगी अशी नगररचना विभागाकडून ७ +जी (सात मजली व ग्राऊंड फ्लोअर पार्किंग), अशी बांधकाम परवानगी देण्यात येते. ही परवानगी देताना अग्निशमनप्रवण यंत्रणा बसविण्याची अटही घालण्यात आलेली असते. अपार्टमेंटसाठी ही परवानगी असते. शक्यतो बंगलो, रो-हाऊसेस दोन किं वा तीनच मजली असतात. १५ मीटरच्या आतील बांधकामाला फायर एनओसीची गरज नसते. त्यापुढील बांधकामांना एनओसी लागते. बहुमजली इमारतींची वाढती संख्या पाहता अग्निशमन विभागाकडे २४ मीटरपर्यंत जाणारी अद्ययावत यंत्रणा असणे गरजेचे आहे. शहरात सध्या दीडशेपर्यंत आठ मजली इमारती आहेत. ६ मजली इमारतींचा आकडा मोठा आहे, असे सूत्रांनी सांगितले. गुंठेवारी वसाहती वार्यावर गुंठेवारी वसाहतींमध्ये दुर्दैवाने आगीची घटना घडली, तर अरुंद रस्ते आणि व्हेंटिलेशन नसलेल्या घरांमुळे अग्निशमन विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. फायर बंब वसाहतींमध्ये पोहोचूच शकत नाही. लहान फायर बंब पालिकेला तयार करावे लागतील. त्यासाठी निधी, कर्मचार्यांची गरज असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.