शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

जायकवाडी धरणातून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 7:25 PM

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या पाणी परवाण्याविना पाणी उपसा

पैठण : पाणी परवाना नसताना जायकवाडी धरणातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या  १६ शेतकऱ्यावर  पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जायकवाडीचे सहाय्यक अभियंता बुध्दभूषण दाभाडे यांनी आज पैठण पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद दिली आहे.या बाबत दाखल याचिकेत न्यायालयाने जायकवाडी प्रशासनास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

आज जायकवाडीचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण सुखदेव दाभाडे यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, दि ५ फेब्रुवारी रोजी जायकवाडी, पोलीस व महावितरणच्या संयुक्त पथकातील रोहीत तायडे सहाय्यक अभियंता महावितरण , एस टी घुसर मोजणीदार जायकवाडी जलफुगवटा शाखा,  अभिजीत कुलकर्णी व राजू तुसांबड कालवा निरिक्षक, आय डी भागवत वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिंदे व गणेश कुलट यांनी जायकवाडी धरणाच्या उजवा कालव्याच्या मुखाशी केलेल्या कारवाईत अनधिकृतपणे जलसंपदा विभागाच्या पाणी परवाण्याविना पाणी उपसा सुरू असल्याचे दिसून आले.

हा पाणी उपसा  नामदेव किसण रायकर रा महंमदपुर. बाळु भगवान गिरजे रा . घारी. जितेंद्र नामदेव पाबळे रा . महमदपुर.  हरिभाऊ अनंतराव चेवुलवार रा . महंमदपुर. गोपाळ प्रभाकर काळे रा सोनवाडी ( खु ).  वैजनाथ एकनाथ काळे रा सोनवाडी ( खु ). अनिल रावसाहेब खेडकर रा महंमदपुर. सुनिल रावसाहेब खेडकर रा महमदपुर हे आठ शेतकरी करत होते; तर अज्ञात आठ शेतकऱ्यांचे नावे समजू न शकल्याने त्यांच्या विद्युत पंपाचे स्टार्टर जप्त करण्यात आले आहे.अनधिकृतपणे जायकवाडी धरणातून पाणी उपसा करणाऱ्या सोळा शेतकऱ्यावर   कलम  430 भादवी सह कलम 92 , ( ज ) महाराष्ट्र पाटबंधारे अधीनियम 1976 प्रमाणे  कारवाई करावी  असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून  पैठण पोलीस ठाण्यात  १६ शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांवरील गुन्हे रद्द कराविद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आज शेतकऱ्यात मोठा रोष निर्माण झाला. पाणी परवाना संपलेल्या शेतकऱ्यांना जायकवाडी प्रशासनाने दंड आकारून परत पाणी परवाना द्यावा. शेतकरी पाणी चोरून विकत नाही शेतीलाच वापरतात याचे भान जायकवाडी प्रशासनाने ठेवावे. गुन्हा दाखल करण्यापेक्षा शेतकऱ्यांना पाणीपरवाना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांची आपण भेट घेणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे यांनी सांगितले.- रविंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस कॉंग्रेस

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस