शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

ग्रामीण मातीतून थेट हृदयला भिडणारे चित्रपट निघतात: सई परांजपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:11 IST

दहाव्या वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : मागील २० वर्षांमध्ये मराठी चित्रपटाला पुन्हा उभारी मिळाली आहे. दरवर्षी ५० ते ६० चित्रपट येतात. त्यांतील अनेक चित्रपट शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या ग्रामीण मातीतून निपजतात. त्यात होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खासगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवांमधून बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातील काही चित्रपट तांत्रिकदृष्ट्या कच्चे असले, तरी आशयाला पक्के असल्यामुळे हृदयाला भिडतात, असे निरीक्षण ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी नोंदवले.

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे एमजीएम संस्थेतील रुक्मिणी सभागृहात बुधवारी सायंकाळी उद्घाटन झाले. यावेळी परांजपे यांना पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लाख रुपये असे स्वरूप असलेल्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव विकास खारगे, महोत्सवाचे मानद अध्यक्ष तथा प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन लतिका पाडगावकर, अभिनेत्री सीमा बिस्वास, एमजीएमचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी आणि संयोजक नीलेश राऊत यांची उपस्थिती होती. परांजपे म्हणाल्या, मागील २० वर्षांमध्ये मराठी चित्रपटाला पुन्हा उभारी मिळाली आहे. होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खासगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवांमधून बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातले काही तांत्रिकदृष्ट्या कच्चे असले, तरी आशयाला पक्के असल्यामुळे हृदयाला भिडतात.

सरकारी नोकरीला कंटाळून बाहेर पडले अन् उत्तम दिग्दर्शक, निर्माती बनलेदिल्लीमध्ये आठ वर्षे सरकारी नोकरीतील यंत्रणांना कंटाळून मुंबईत परतले. त्यानंतरच लेखिका, नाटककार, चित्रपट निर्माती, दिग्दर्शक बनल्याची जाहीर कबुली ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांनी दिली. नभोवाणी, दूरदर्शन व तेथून रंगभूमी आणि चित्रपट निर्माती, दिग्दर्शक अशा कारर्किदीचा चढता आलेखच त्यांनी मांडला. छत्रपती संभाजीनगरच्या चित्रपट महोत्सवाने पुण्या-मुंबईबाहेरही महोत्सव यशस्वी होऊ शकतात, हे दाखवून दिल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

दरवर्षी १०० कोटी रुपये अनुदानचित्रपट हे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्ट पॉवर म्हणून सिनेमा काम करत असतो. राज्य शासन दरवर्षी मराठी सिनेमाला १०० कोटी रुपयांचे अनुदान देत आहे.- विकास खारगे, अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय

महोत्सव देशभरात पाेहोचलाहा एकमेव असा महोत्सव असेल ज्यामधे दिग्दर्शक आयोजकांच्या भूमिकेत आहेत. हा महोत्सव रसिक, प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना शिक्षित करत प्रेरणा देण्याचे काम करत आहे.- आशुतोष गोवारीकर, प्रसिद्ध दिग्दर्शक तथा महोत्सवाचे मानद अध्यक्ष

मानवतेचा प्रवास सांगण्याचा प्रयत्नया महोत्सवात अगोदर ज्युरी म्हणून सहभागी झालो होतो. आता महोत्सवाचा संचालक म्हणून काम करीत आहे. मानवतेच्या प्रवासाच्या गोष्टी सिनेमाच्या सहाय्याने सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे.- सुनील सुकथनकर, महोत्सव संचालक

महोत्सव देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमानहे महोत्सवाचे दशकपूर्तीचे वर्ष आहे. महोत्सव या भागापुरताच मर्यादित न राहता देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान वाटतो.- चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सव कार्यकारी संचालक

विभागाची ओळखहा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता मराठवाडा विभागाची ओळख बनला आहे. त्यातून या भागातील प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठही मिळत आहे.-नंदकिशोर कागलीवाल, अध्यक्ष, महोत्सव संयोजन समिती

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcinemaसिनेमा