शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण मातीतून थेट हृदयला भिडणारे चित्रपट निघतात: सई परांजपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:11 IST

दहाव्या वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : मागील २० वर्षांमध्ये मराठी चित्रपटाला पुन्हा उभारी मिळाली आहे. दरवर्षी ५० ते ६० चित्रपट येतात. त्यांतील अनेक चित्रपट शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या ग्रामीण मातीतून निपजतात. त्यात होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खासगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवांमधून बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातील काही चित्रपट तांत्रिकदृष्ट्या कच्चे असले, तरी आशयाला पक्के असल्यामुळे हृदयाला भिडतात, असे निरीक्षण ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी नोंदवले.

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे एमजीएम संस्थेतील रुक्मिणी सभागृहात बुधवारी सायंकाळी उद्घाटन झाले. यावेळी परांजपे यांना पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लाख रुपये असे स्वरूप असलेल्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव विकास खारगे, महोत्सवाचे मानद अध्यक्ष तथा प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन लतिका पाडगावकर, अभिनेत्री सीमा बिस्वास, एमजीएमचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी आणि संयोजक नीलेश राऊत यांची उपस्थिती होती. परांजपे म्हणाल्या, मागील २० वर्षांमध्ये मराठी चित्रपटाला पुन्हा उभारी मिळाली आहे. होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खासगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवांमधून बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातले काही तांत्रिकदृष्ट्या कच्चे असले, तरी आशयाला पक्के असल्यामुळे हृदयाला भिडतात.

सरकारी नोकरीला कंटाळून बाहेर पडले अन् उत्तम दिग्दर्शक, निर्माती बनलेदिल्लीमध्ये आठ वर्षे सरकारी नोकरीतील यंत्रणांना कंटाळून मुंबईत परतले. त्यानंतरच लेखिका, नाटककार, चित्रपट निर्माती, दिग्दर्शक बनल्याची जाहीर कबुली ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांनी दिली. नभोवाणी, दूरदर्शन व तेथून रंगभूमी आणि चित्रपट निर्माती, दिग्दर्शक अशा कारर्किदीचा चढता आलेखच त्यांनी मांडला. छत्रपती संभाजीनगरच्या चित्रपट महोत्सवाने पुण्या-मुंबईबाहेरही महोत्सव यशस्वी होऊ शकतात, हे दाखवून दिल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

दरवर्षी १०० कोटी रुपये अनुदानचित्रपट हे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्ट पॉवर म्हणून सिनेमा काम करत असतो. राज्य शासन दरवर्षी मराठी सिनेमाला १०० कोटी रुपयांचे अनुदान देत आहे.- विकास खारगे, अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय

महोत्सव देशभरात पाेहोचलाहा एकमेव असा महोत्सव असेल ज्यामधे दिग्दर्शक आयोजकांच्या भूमिकेत आहेत. हा महोत्सव रसिक, प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना शिक्षित करत प्रेरणा देण्याचे काम करत आहे.- आशुतोष गोवारीकर, प्रसिद्ध दिग्दर्शक तथा महोत्सवाचे मानद अध्यक्ष

मानवतेचा प्रवास सांगण्याचा प्रयत्नया महोत्सवात अगोदर ज्युरी म्हणून सहभागी झालो होतो. आता महोत्सवाचा संचालक म्हणून काम करीत आहे. मानवतेच्या प्रवासाच्या गोष्टी सिनेमाच्या सहाय्याने सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे.- सुनील सुकथनकर, महोत्सव संचालक

महोत्सव देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमानहे महोत्सवाचे दशकपूर्तीचे वर्ष आहे. महोत्सव या भागापुरताच मर्यादित न राहता देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान वाटतो.- चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सव कार्यकारी संचालक

विभागाची ओळखहा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता मराठवाडा विभागाची ओळख बनला आहे. त्यातून या भागातील प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठही मिळत आहे.-नंदकिशोर कागलीवाल, अध्यक्ष, महोत्सव संयोजन समिती

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcinemaसिनेमा