शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

मराठवाड्याचा अनुशेष भरा, अन्यथा १७ सप्टेंबरला ध्वजारोहण करू देणार नाही: सकल मराठा समाज

By बापू सोळुंके | Updated: September 2, 2024 20:05 IST

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी लढा उभारण्यात येणार

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने गतवर्षी  मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. हा निधी त्वरीत वितरित करा आणि मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरा, अन्यथा १७ स्पटेंबर रोजीच्या ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने प्रा. चंद्रकांत भराट यांनी सोमवारी येेथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना दिला.

प्रा. भराट म्हणाले की, हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा प्रदेश करारानुसार विनाअट भारत देशात सामील झाला. यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मागासलेल्या मराठवाड्याला अन्य प्रांतासारखा विकास करण्यासाठी विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र निधी देण्याचा निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण हे केंद्रात गेले आणि नंतर आलेल्या मुख्यमंत्र्यानी आणि राज्यकर्त्यांनी मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले आहे. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे मराठवाड्यातील नेते मुख्यमंत्री झाले मात्र त्यांनी मराठवाड्याला विशेष निधी दिला नाही. सन १९८२ साली स्थापन झालेल्या वैधानिक विकास मंडळ बरखास्त करण्यात आली. निधी अभावी या मंडळाला काम करता आले नाही. परिणामी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. रोजगाराअभावी तरूणही मृत्यूला कवटाळात आहेत. राज्यकर्ते  मराठवाड्याला सावत्र वागणूक देत असल्याने येथील सकल मराठा समाज आता शांत बसणार नाही. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे प्रा.भराट म्हणाले. याचाच एक भाग म्हणून मराठवाड्याच्या अनुशेष भरून काढावा यासाठी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदने दिली आहेत.  

गतवर्षी येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या नावाखाली नाशिक करीता नदीजोड प्रकल्प मंजूर करण्यात आला. शिवाय येथे येऊन जाहीर करण्यात आलेल्या ४५ हजार कोटी रुपयांच्या निधी अद्याप वितरीत करण्यात आला नाही. यामुळे हा निधी तातडीने वितरीत करावा अन्यथा  १७ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तालय येथे मुख्यमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.यापत्रकार परिषदेला  सुरेश वाकडे, सुनील कोटकर, सुकन्या भोसले आणि डॉ. दिव्या पाटील यांची उपस्थिती होती.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारmarathaमराठा