शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

‘त्या’ शेतकऱ्याच्या आत्महत्येची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 19:36 IST

तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर केल्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी नुकतीच आत्महत्या केली.

ठळक मुद्देकृष्णापूरवाडीचे प्रकरण  विधानसभा अध्यक्षांकडून कुटुंबाचे सांत्वन  

फुलंब्री (औरंगाबाद ) : तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर केल्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी नुकतीच आत्महत्या केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी या गावास भेट देऊन या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येईल, यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी मयत भावसिंग यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. 

दोन एकर तीन आर. जमीन निहालसिंग वाळूबा सुंदर्डे, खुशालसिंग वाळूबा सुंदर्डे, महासिंग वाळूबा सुंदर्डे व परमजीतसिंग धिल्लो यांनी तलाठी पुंजाबा बिरारे यांच्याशी संगनमत करुन परस्पर नावावर केल्याने २५ नोव्हेंबर रोजी भावसिंग सुंदर्डे यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.

वास्तविक यासंदर्भात शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तलाठी बिरारे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. पण कुणीही लक्ष न दिल्याने त्यांनी जीवनयात्रा संपविली. यानंतर प्रकरणी वरील चार जणांविरुद्ध फुलंब्री पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला. माझ्या वडीलांच्या मृत्यूस तलाठी पुंजाबा बिरारे हाही जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयताच्या मुलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, परंतु अजून कारवाई न झाल्याने मयताचे कुटुंब चिंतेत आहे.

तलाठ्याविरुद्ध ‘एसीबी’ची केस सुरुया प्रकरणातील तलाठी पुंजाबा बिरारे हा शेंद्रा येथे कार्यरत असताना २०१५ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता, हे प्रकरण अजून बोर्डावर आलेले नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. मंगळवारी सीआयडीच्या पथकाने कृष्णापूरवाडी येथे जाऊन मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाचे जाबजबाब घेतले. समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने तलाठ्यांकडून अशी गैर कामे होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे