शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पाण्याच्या मागणीसाठी २५ गावातील शेतकऱ्यांचे सिंचन भवनमध्ये ठिय्या आंदोलन

By बापू सोळुंके | Updated: October 3, 2023 18:58 IST

गल्हाटी धरणासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजना मंजूर करा

छत्रपती संभाजीनगर: अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्प हा अवर्षण प्रवण क्षेत्रात येतो. यामुळे दहा वर्षातून एक किंवा दोन वेळाच हे धरण भरते. २५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या प्रकल्पावर अवलंबून आहे.अशा परिस्थिती गोदावरी खोऱ्याचा भाग असलेल्या या धरणांत गोदावरीली बंधाऱ्यातून उपसा सिंचन योजना राबवून पाणी आणा, या मागणीसाठी २५गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी जालना रोडवरील सिंचनभवन येथे ठिय्या आंदोलन केले. विशेष बाब म्हणून गल्हाटी धरणासाठी पाणी मंजूर करून उपसा सिंचन योजना राबविण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्याची घोषणा अधीक्षक अभियंत्यांनी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गल्हाटी मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाठी शेतकऱ्यांनी त्याच्या जमिनी दिल्या होत्या. या प्रकल्पाच्या उर्ध्वभाग हा कमी पावसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. परिणामी दहा,बारा वर्षातून एक किंवा दोनवेळाच हा प्रकल्प पूर्णपणे भरतो. यावर्षी अत्यल्प पावसामुळे गल्हाटी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गोदावरी नदीवरील पाथरवाला येथून उपसा सिंचन योजना राबवून गल्हाटी प्रकल्पात पाणी सोडावे, अशी मागणी मागील २० वर्षापासून शेतकरी करीत आहेत. याबाबतचा प्रस्तावही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास विभागाने शासनास दिला होता. मात्र पाणी शिल्लक नसल्याचे कारण देऊन हा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. ही बाब समजल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले. गंगापुरसाठी आ.प्रशांत बंब यांच्या उपसा सिंचन योजनेला पाणी देण्यात येते. आम्ही मराठवाड्यातील नाही का, असा सवाल करीत आम्हालाही जायकवाडी प्रकल्पातून पाणी मिळावे,अशी मागणी करीत सिंचनभवन येथे सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले.

मुख्य अभियंता जयंत गवळी, जलसंपदाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता एस.के.सब्बीनवार यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून उपसा सिंचन योजनेला विशेष बाब म्हणून मंजूरी देण्याची मागणी करणारा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची तयारी दर्शविली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सुरेश काळे, जन्मेजय उढाण,अशोक जाधव, पांडुरंग गटकळ, राधाकृष्ण मैंद,राजू सोळुंकेे, आबासाहेब शिंदे, बाळासाहेब मुंडे, बाळासाहेब गव्हाणे, दशरथ साठे आदींनी सहभाग नोदविला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagitationआंदोलनFarmerशेतकरीWaterपाणी