शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ओला दुष्काळ; शेतकऱ्यांना २,९०४ कोटी रुपयांच्या मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 11:49 IST

जिरायत, बागायत, फळबागांच्या नुकसान पंचनाम्याचा अहवाल शासनाला 

ठळक मुद्दे बीड, औरंगाबाद, नांदेडमध्ये प्रत्येकी ४०० कोटींपेक्षा जास्त निधीची गरज लागणार आहे परतीच्या पावसाला जिरायती क्षेत्र सर्वाधिक बळी पडले.

औरंगाबाद : मराठवाड्यात आॅक्टोबरच्या उत्तरार्धात आणि नोव्हेंबरच्या पूर्वार्धात झालेल्या पावसामुळे ४४ लाख ३३ हजार ५४९ शेतकऱ्यांची जिरायत, बागायत आणि फळबागा मिळून ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती मदत निधी निकषानुसार दोन हजार ९०४ कोटी रुपयांची गरज लागणार आहे. विभागीय प्रशासनाने यासंदर्भातील अंतिम अहवाल तयार करून बुधवारी शासनाकडे पाठविला. अहवालात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची जिल्हानिहाय माहिती देण्यात आली आहे. बीड, औरंगाबाद, नांदेडमध्ये प्रत्येकी ४०० कोटींपेक्षा जास्त निधीची गरज लागणार आहे, तर हिंगोली जिल्ह्यात १८८ कोटींच्या आसपास निधीची गरज लागणार आहे. शासन या अहवालाच्या तुलनेत किती अनुदान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी तरतूद करील, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. 

आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाला जिरायती क्षेत्र सर्वाधिक बळी पडले. ४० लाख ४७ हजार २१० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना सर्वाधिक फटका बसला. ६९ हजार ४११ हेक्टरवरील बागायती क्षेत्रावरील नुकसान झाले, तर ३२ हजार ५५२ हेक्टरवरील फळबागा पावसाने झोपविल्या. बाधित क्षेत्राच्या आकड्यांवरून असे दिसते, मराठवाड्यातील खरीप हंगाम पूर्णत: पावसावरच अवलंबून आहे. समान टप्प्यात पाऊस झाला नाही, तर येथील शेतकऱ्यांचे नुकसान ठरलेलेच आहे. ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाच्या झळांमुळे खरीप हंगाम हातून जाण्याचे संकट या दशकात अनेकदा आले. 

जिरायती क्षेत्राला प्रतिहेक्टर ६ हजार ८०० रुपये, बागायत क्षेत्राला १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर, तर फळबागांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर निधी अपेक्षित धरून विभागीय प्रशासनाने मराठवाड्यातील एकूण नुकसान आणि लागणाऱ्या निधीचे अनुमान लावले आहे. ५४ लाख ६८ हजार ३५८ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र सरलेल्या खरीप हंगामात होते. त्यापैकी ५० लाख २० हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यातील ४१ लाख ४९ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान पावसामुळे झाले.

जिल्हानिहाय मदत अशी लागेल जिल्हा        एकूण मदतीची गरज औरंगाबाद    ४२६ कोटी ३३ लाख जालना        ३९८ कोटी ८६ लाख परभणी        ३१२ कोटी ४४ लाख हिंगोली    १८८ कोटी १८ लाख नांदेड        ४३० कोटी ९९ लाख बीड        ५१४ कोटी ८० लाख लातूर        ३५६ कोटी २ लाख उस्मानाबाद    २७६ कोटी ७४ लाखएकूण         २९०० कोटी ४४ लाख 

जिल्हानिहाय नुकसान आणि मदत अशी औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ लाख ३८ हजार ३०४ शेतकरी बाधित झाले. ६ लाख ५ हजार ३३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ४२६ कोटी ३३ लाख रुपयांची गरज शासनाच्या निकषानुसार लागेल, असे विभागीय प्रशासनाने अहवालात म्हटले आहे. 

जालना : जिल्ह्यातील ५ लाख ८२ हजार २६८ हेक्टवरील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या ५ लाख २६ हजार ३४१ हेक्टवरील खरीप हंगाम संपुष्टात आला. जिरायत, बागायत, फळबागांचा यात समावेश आहे. ३९८ कोटी ८६ लाखांचा निधी जिल्ह्याला लागेल. 

परभणी : जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या ४ लाख ५६ हजार ९३३ हेक्टवरील जिरायत, बागायत, फळबागांचे नुकसान पावसामुळे झाले. ३१२ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आवश्यक आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील ३ लाख १,९६० शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या २ लाख ७६ हजार २५७ हेक्टरवरील जिरायत, बागायत, फळबागांचे नुकसान पावसाने केले. १८८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला लागेल.

नांदेड : जिल्ह्यातील ७ लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांचे ६ लाख ३३ हजार ४६९ हेक्टरवरील जिरायत, बागायत, फळबागांच्या पिकांचे नुकसान झाले. ४३० कोटी ९९ लाख रुपयांचे अनुदान जिल्ह्याला लागेल.

बीड : जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५९ शेतकऱ्यांनी ७ लाख ५६ हजार ९२७ हेक्टवर पेरणी केलेले जिरायत, बागायत, फळबागांचे पीक पावसामुळे वाया गेले. ५१४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान जिल्ह्याला लागणार आहे. 

लातूर : जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ४ शेतकऱ्यांनी पेरणी केलेले ५ लाख १७ हजार ५७४  हेक्टवरील खरीप हंगाम पावसाने हिरावला. जिल्ह्याला ३५६ कोटी २ लाख रुपयांचे अनुदान लागेल. 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ४४७ शेतकऱ्यांनी सरत्या खरीप हंगामात ३ लाख ७६ हजार ३३३ हेक्टरवर जिरायत, बागायत, फळबागांसाठी पेरणी केली होती. त्याचे पावसामुळे नुकसान झाले. जिल्ह्याला २७६ हजार कोटी ७४ लाख रुपयांची मदत लागणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊस