शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
2
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
3
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
4
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
5
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
6
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
7
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
8
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
9
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
10
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
11
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
12
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
13
सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने
14
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
15
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
16
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
17
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
18
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
19
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
20
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!

पाणीपातळी खालावल्याने शेतकरी संकटात; पैठणमधील ८ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 18:08 IST

पैठण तालुक्यातील मुरमा येथील एका शेतकऱ्याने पाण्याअभावी मोसंबीची बाग जेसीबीच्या सहाय्याने मोडून काढली.

- अनिलकुमार मेहेत्रेपैठण : तालुक्यात पाण्याअभावी ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा धोक्यात आल्या असून, अनेक बोअर, विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी मोसंबीच्या बागा मोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पैठण तालुक्यात शेतकऱ्यांनी जवळपास ८ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड केली असून, अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचीही लागवड केली आहे. तालुक्यातील जमीन सुपीक असल्याने व पाण्याची उपलब्धताही चांगली असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी फळबागांची लागवड करतात. त्यामुळे पैठणला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पैठणची मोसंबी सातासमुद्रापार गेली आहे. याच मोसंबीच्या बागा आता धोक्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे बोअर, विहिरींची पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे या बागांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे.

परिणामी चार वर्षे काळजीपूर्वक जपणूक केलेली मोसंबीची झाडे आता जड अंतकरणाने तोडावी लागत आहेत. मुरमा गावातील शेतकरी राजेंद्र लेंभे यांच्याकडे जेमतेम शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये मोसंबीची ३०० झाडे लावली होती. आता त्यांच्या विहिरीचे पाणी आटल्याने त्यांनी शनिवारी मोसंबीची बाग जेसीबीच्या सहाय्याने तोडली. शेतकरी लेंभे यांच्यासारखेच अनेक शेतकरी सध्या आपल्या शेतातील फळबागा तोडत आहेत.

पाणी नसेल तर फळे नको पैठण तालुक्यात साडेसात ते आठ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली आहे. सध्या तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, याचा फटका फळबागांना बसत आहे. शेतात पाण्याची व्यवस्था नसेल तर शेतकऱ्यांनी मोसंबीच्या झाडावर कुठल्याही प्रकारची फळे ठेवू नयेत.-संदीप शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी