ग्रामसेवकाकडून शेतकऱ्यांना मारहाण

By Admin | Updated: June 15, 2014 00:59 IST2014-06-15T00:36:14+5:302014-06-15T00:59:46+5:30

परतूर : गारपीटग्रस्त यादीतील नावे का वगळली, अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांनाच संबंधित ग्रामसेवकाने मारहाण केल्याची घटना शहरात घडली.

Farmers beat villagers | ग्रामसेवकाकडून शेतकऱ्यांना मारहाण

ग्रामसेवकाकडून शेतकऱ्यांना मारहाण

परतूर : गारपीटग्रस्त यादीतील नावे का वगळली, अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांनाच संबंधित ग्रामसेवकाने मारहाण केल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
परतूर तालुक्यातील वाढोणा येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी यांनी केले होते; परंतु वाढोणा या गावचे ग्रामसेवक चौधरी यांनी याच गावातील काही लोकांची नावे यादीतून वगळली होती. याची विचारणा करण्यासाठी काही शेतकरी ग्रामसेवक चौधरी यांच्याकडे गेले असता, जि. प. चे उपाध्याक्ष यांच्या घरासमोर आरोपी ग्रामसेवक चौधरी याने दोन क्रुझर गाडीत माणसे आणून फिर्यादी संतोष तनपुरे यांना फायटरने मारहाण केली. याप्रकरणी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामसेवकाने शेतकऱ्यास मारहाण करण्याची घटना परतूर तालुक्यात प्रथमच घडली आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यास मदत तर मिळालीच नाही; परंतु मारपीट होण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, सदरील ग्रामसेवकास निलंबित केले नाही, तर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संतोष तनपुरे, सर्जेराव साळवे, रामेश्वर तनपूरे, नवनाथ तनपुरे, वैजनाथ गोरे, अशोक तनपुरे, गोविंद तनपुरेंसह पन्नास शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Farmers beat villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.