शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 20:50 IST

बागा वाळत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकन्नड तालुक्यातील नागद परिसरातील चित्र कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळेना 

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नागद परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बागा वाळत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या येथील बळीराजा अडचणीत सापडला असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादन शेतकऱ्यांनी केली आहे. 

नागद परिसरात यंदा दुष्काळी परिस्थिती असूनही मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून केळीचे पीक जगविले आहे; मात्र जगविलेल्या केळी पिकावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन निसटली आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आलेल्या कांद्याशिवाय मार्च व एप्रिलमध्ये लागवड केलेल्या मिरगाच्या बागांवरही करपाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर काय उपाययोजना कराव्यात, याबद्दल शेतकरी संभ्रमात असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

येथील शेतकऱ्यांनी लागवडीपासून, आंतरमशागत ठिबक सिंचन प्रणाली, महागडी औषधी यावर मोठा खर्च केला आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कापणीवर येणाऱ्या केळी बागांमध्ये डिसेंबरअखेर, तसेच जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीने केळी बागा करपत असून, केळीची पाने सुरुवातीला पिवळी पडत आहेत. त्यामुळे केळी पीक जवळपास हातातून गेले आहे. त्यातच सध्या भावात घसरण झाल्याने उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. 

केळीसाठी विमा का नाहीनागद परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिकाचा विमा काढता येत नाही. त्यामुळे नागदसह वडगाव, हरसवाडी, सायगव्हाण, बोरमळी, पांगरा, पांगरातांडा, नागदतांडा, बेलखेडा, सोनवाडी या परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे नुकसान होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चाळीसगाव व पाचोरा (जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून विम्याचा लाभ मिळत आहे, तर कन्नड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीसाठी विमा का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे

नागद व परिसरात केळी पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे; मात्र तरीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र