शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 20:50 IST

बागा वाळत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकन्नड तालुक्यातील नागद परिसरातील चित्र कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळेना 

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नागद परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बागा वाळत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या येथील बळीराजा अडचणीत सापडला असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादन शेतकऱ्यांनी केली आहे. 

नागद परिसरात यंदा दुष्काळी परिस्थिती असूनही मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून केळीचे पीक जगविले आहे; मात्र जगविलेल्या केळी पिकावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन निसटली आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आलेल्या कांद्याशिवाय मार्च व एप्रिलमध्ये लागवड केलेल्या मिरगाच्या बागांवरही करपाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर काय उपाययोजना कराव्यात, याबद्दल शेतकरी संभ्रमात असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

येथील शेतकऱ्यांनी लागवडीपासून, आंतरमशागत ठिबक सिंचन प्रणाली, महागडी औषधी यावर मोठा खर्च केला आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कापणीवर येणाऱ्या केळी बागांमध्ये डिसेंबरअखेर, तसेच जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीने केळी बागा करपत असून, केळीची पाने सुरुवातीला पिवळी पडत आहेत. त्यामुळे केळी पीक जवळपास हातातून गेले आहे. त्यातच सध्या भावात घसरण झाल्याने उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. 

केळीसाठी विमा का नाहीनागद परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिकाचा विमा काढता येत नाही. त्यामुळे नागदसह वडगाव, हरसवाडी, सायगव्हाण, बोरमळी, पांगरा, पांगरातांडा, नागदतांडा, बेलखेडा, सोनवाडी या परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे नुकसान होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चाळीसगाव व पाचोरा (जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून विम्याचा लाभ मिळत आहे, तर कन्नड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीसाठी विमा का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे

नागद व परिसरात केळी पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे; मात्र तरीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र