शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात शेतकरी संपवत आहेत जीवन; केंद्रेकरांनी नोकरी सोडली, अहवालावर धूळ साचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 12:10 IST

शेतकऱ्यांना होतंय जगणं असह्य? मागील दोन महिन्यांत वाढल्या शेतकरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनील केंद्रेकर यांनी सरकारला मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांचा अहवाल सादर केला होता. आता त्या अहवालावरही धूळ साचली आहे. सरकार त्याबाबत सध्यातरी गप्प आहे. दरम्यान, मराठवाड्यात जुलै, ऑगस्ट महिन्यांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. दोन महिन्यांत २०२ तर आठ महिन्यांत ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामात पेरण्या झाल्या. परंतु जुलैअखेर ते सप्टेंबरच्या ६ तारखेपर्यंत मराठवाड्यात ४४ दिवस पाऊसच नव्हता. परिणामी शेतकऱ्यांनी हंगामात केलेली गुंतवणूक संकटात आली. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी प्रयत्न कमी पडत आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. आठ महिन्यांत ६८५ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपवली आहे. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १८६ तर धाराशिवमध्ये ११३ आत्महत्या झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ९५ शेतकऱ्यांनी स्वत:चे जीवन संपवले आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतमालाला कमी भाव, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे.

एक लाख शेतकऱ्यांना होतंय जगणं असह्य?माजी आयुक्त केंद्रेेकर यांच्या काळात झालेल्या पाहणीतून धक्कादायक निष्कर्ष समोर आले होते. मराठवाड्यातील एक लाख शेतकऱ्यांना जगणं असह्य होत असल्याचे अहवालात नमूद होते. तेलंगणा राज्याप्रमाणे शासनाने शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात एकरी दहा हजार रुपये अर्थसाहाय्य करण्याची शिफारस केंद्रेकर यांनी केली होती. ३ जुलै रोजी केंद्रेकर कार्यमुक्त झाले. त्यानंतर निष्कर्षासह शेतकरी पाहणी अहवाल शासनाकडे दिला होता.

आत्महत्येची कारणे अशी......शेतकऱ्यांची मानसिक, आर्थिक परिस्थिती, मुलांचे विवाह, सावकारी आणि बँकांच्या कर्जबाजारीपणातून आत्महत्येचे विचार शेतकऱ्याच्या मनात येत आहेत. शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. असे अहवालात म्हटले होते. पेरणीपूर्वी उधारीवर खते, बियाणे, औषधीसाठी सावकाराकडून कर्ज घेणे. सावकारांकडून सक्ती होणाऱ्या कर्जवसुलीमुळे आत्महत्या वाढत आहेत.

जुलै व ऑगस्ट महिन्यातील आत्महत्या......औरंगाबाद......३५जालना.........२३परभणी......२०हिंगोली......०५नांदेड.........२१बीड..........५८लातूर.........१७उस्मानाबाद...२३एकूण........२०२

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद