शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतकरी दादा पासपोर्ट काढून घ्या, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विदेशात अभ्यास दौरा

By बापू सोळुंके | Updated: January 24, 2024 15:01 IST

विदेशातील शेतीचे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांनी अवगत करून शेती व्यवसायात सुधारणा करावी, यासाठी राज्य सरकारने प्रथमच शेतकऱ्यांसाठी विदेश दौऱ्यांची योजना आणली आहे.

छत्रपती संभाजीनगर : विदेशातील शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी आता दरवर्षी शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. याअंतर्गत यावर्षी ५० शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे. कमीत कमी बारावी पास असलेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने पासपोर्ट काढून घ्यावा आणि कृषी विभागाकडे अर्ज करावा लागेल.

विदेशातील शेतीचे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांनी अवगत करून शेती व्यवसायात सुधारणा करावी, यासाठी राज्य सरकारने प्रथमच शेतकऱ्यांसाठी विदेश दौऱ्यांची योजना आणली आहे. या दौऱ्यासाठी प्रति शेतकरी एक लाख रुपयांपर्यंत अनुदान कृषी विभागाकडून दिले जाणार आहे. दरवर्षी राज्यातील सुमारे ४० ते ५० शेतकऱ्यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली. ते म्हणाले की, या योजनेसाठी शासनाने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. पासपोर्टधारक आणि कमीत कमी बारावी उत्तीर्ण शेतकरी यासाठी पात्र आहेत.

विदेश दौऱ्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत करा अर्जकृषी विभागाच्या योजनेनुसार विदेशात अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.

१ लाखांपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार अनुदानविदेश दाैऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम (जास्तीत जास्त एक लाख रुपये) शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. महाडीबीटी संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी विदेश प्रवास खर्चाचा तपशील सादर केल्यानंतर त्यांच्या अनुदानाची रक्कम मिळेल.

लॉटरी पद्धतीने निवडले जातील शेतकरीविदेशातील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून केवळ ३ शेतकऱ्यांची या दौऱ्यासाठी निवड केली जाईल.

या आहेत अटीअर्जदार शेतकऱ्यांचा स्वत:चा पासपोर्ट असावा, स्वत:च्या नावे सातबारा असावा, अर्जदार शेतकरी २५ ते ६० वयोगटातील असावा. शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र अर्जासोबत देणे आवश्यक, शेतकरी खासगी अथवा सरकारी नोकरीत असू नये.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद