शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दादा पासपोर्ट काढून घ्या, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विदेशात अभ्यास दौरा

By बापू सोळुंके | Updated: January 24, 2024 15:01 IST

विदेशातील शेतीचे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांनी अवगत करून शेती व्यवसायात सुधारणा करावी, यासाठी राज्य सरकारने प्रथमच शेतकऱ्यांसाठी विदेश दौऱ्यांची योजना आणली आहे.

छत्रपती संभाजीनगर : विदेशातील शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी आता दरवर्षी शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. याअंतर्गत यावर्षी ५० शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे. कमीत कमी बारावी पास असलेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने पासपोर्ट काढून घ्यावा आणि कृषी विभागाकडे अर्ज करावा लागेल.

विदेशातील शेतीचे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांनी अवगत करून शेती व्यवसायात सुधारणा करावी, यासाठी राज्य सरकारने प्रथमच शेतकऱ्यांसाठी विदेश दौऱ्यांची योजना आणली आहे. या दौऱ्यासाठी प्रति शेतकरी एक लाख रुपयांपर्यंत अनुदान कृषी विभागाकडून दिले जाणार आहे. दरवर्षी राज्यातील सुमारे ४० ते ५० शेतकऱ्यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली. ते म्हणाले की, या योजनेसाठी शासनाने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. पासपोर्टधारक आणि कमीत कमी बारावी उत्तीर्ण शेतकरी यासाठी पात्र आहेत.

विदेश दौऱ्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत करा अर्जकृषी विभागाच्या योजनेनुसार विदेशात अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.

१ लाखांपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार अनुदानविदेश दाैऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम (जास्तीत जास्त एक लाख रुपये) शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. महाडीबीटी संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी विदेश प्रवास खर्चाचा तपशील सादर केल्यानंतर त्यांच्या अनुदानाची रक्कम मिळेल.

लॉटरी पद्धतीने निवडले जातील शेतकरीविदेशातील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून केवळ ३ शेतकऱ्यांची या दौऱ्यासाठी निवड केली जाईल.

या आहेत अटीअर्जदार शेतकऱ्यांचा स्वत:चा पासपोर्ट असावा, स्वत:च्या नावे सातबारा असावा, अर्जदार शेतकरी २५ ते ६० वयोगटातील असावा. शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र अर्जासोबत देणे आवश्यक, शेतकरी खासगी अथवा सरकारी नोकरीत असू नये.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद