शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

वैजपुरात ओल्या दुष्काळाचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 12:54 IST

परतीच्या पावसाने केलेला कहर व कर्जबाजारीला कंटाळून तालुक्यातील टूनकी येथे आप्पासाहेब धोंडिराम पवार या शेतकऱ्याची आत्महत्या.

वैजापूर - परतीच्या पावसाने केलेला कहर व कर्जबाजारीला कंटाळून तालुक्यातील टूनकी येथे आप्पासाहेब धोंडिराम पवार (40) या शेतकऱ्याने मंगळवारी (29 ऑक्टोबर) सायंकाळी गावातील नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

तालुक्यात परतीच्या पावसाने गेल्या आठवडयापासून चांगलाच कहर केला आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या कापूस,मका, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी कापूस, सोयाबीन या पिकांची काढणी करुन दिवाळी साजरी करीत असतो परंतू सततच्या परतीच्या पावसाने शेतीतील कापूस, मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आप्पासाहेब पवार यांच्यावर खासगी व सहकारी, राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज होते.कापूस,मका,कांदे व भाजीपाला याची शेती ते करायचे. परंतु मागील हंगामात दुष्काळ व यंदाचा ओला दुष्काळ यामुळे त्यांचे मोठे वित्तीय नुकसान झाले.

आप्पासाहेब यांच्या भावाचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले असून वडिलांचाही मृत्यू झाला आहे. पत्नी, तीन मुले व भावाची पत्नी व त्याची तीन मुले यांची जबाबदारी आप्पासाहेब यांच्यावर होती. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने कुठल्याही मदत दिली नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याने लवकरात लवकर शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबादRainपाऊस