शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तक्रार ऐकणे दूरच, अधिकाऱ्यांनी उलटे सुनावले; उद्विग्न शेतकऱ्याची त्यांच्यासमोरच विहिरीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:01 IST

धक्कादायक: रस्ता कामामुळे शेतात घुसले पाणी, पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्यांनी सुनावले; शेतकऱ्याने त्यांच्यासमोरच दिला जीव, पैठण तालुक्यातील खादगावची घटना

पाचोड : रस्ताकामामुळे शेतात पाणी साचले, याबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रार केली असता मंडळ अधिकारी व तलाठी पाहणी करण्याकरिता आले. मात्र त्यांनी शेतकऱ्यालाच फैलावर घेतल्याने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने त्यांच्यासमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील खादगाव येथे मंगळवारी दुपारी अडीच वाजता घडली. संजय शेषराव काेहकडे (वय ४५, रा. खादगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, खादगाव ते खर्डा रस्त्याचे काम सुरू आहे; पण पाऊस पडल्यामुळे हे काम बंद झाले. या रस्त्यालगत संजय कोहकडे यांचे शेत असून त्यांच्या शेताच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम झालेले आहे. यामुळे पावसाचे पाणी कोहकडे यांच्या शेतात साचून पिकांचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार संजय कोहकडे यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी पंचनाम्यासाठी बालानगर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे घटनास्थळी आले होते. संजय कोहकडे यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांनाच धारेवर धरले. एकीकडे शेतपिकाचे नुकसान झाले व दुसरीकडे अधिकारी आपल्यालाच खरे- खोटे सुनावत आहे, यामुळे उद्विग्न झालेले संजय कोहकडे यांनी अधिकाऱ्यांसमोरच पळत जाऊन शेजारील विहिरीत उडी घेतली. यावेळी काही ग्रामस्थांनीही धावत जाऊन त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उड्या टाकल्या. कोहकडे यांना बेशुद्धावस्थेत विहिरीबाहेर काढून तत्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी प्रकाश साबळे यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण गावात संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मयत कोहकडे यांचेकडे पाच ते सहा एकर शेती असून घरची परिस्थिती जेमतेम आहे. रस्ताकामामुळे त्यांच्या शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांनाच खडसावले यामुळे त्यांनी टाेकाचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकारया घटनेनंतर संतप्त झालेल्या संजय कोहकडे यांचे कुटुंबीय व नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र पाचोड पोलिसांनी त्यांची समजूत काढून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सायंकाळी ७ वाजता मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चर्चा करीत असतानाच घटनाखादगाव येथील आप्पासाहेब जगन्नाथ डाके व इतर शेतकऱ्यांनी पैठण तहसील कार्यालयात शेत जमिनीचे पाणी रस्त्याने जाण्यासाठी मोकळे करण्यासाठी तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या आदेशावरुन मी स्वतः खादगाव येथे गेले होते. तेथे शेतकऱ्यांशी चर्चा करीत असताना अचानक संजय कोहकडे या शेतकऱ्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मी स्वतः पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार व पाचोड पोलिस स्टेशनला दिली आहे.-शुभांगी शिंदे, मंडळ अधिकारी.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊस