शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळे बहाद्दर शाळांना समाज कल्याणचे अभय !

By admin | Updated: August 1, 2014 01:05 IST

बीड: समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात लाखोंचा घोटाळा असल्याचे ‘लोकमत’ने समाजकल्याणच्या निदर्शनास आणून दिले होते.

बीड: समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात लाखोंचा घोटाळा असल्याचे ‘लोकमत’ने समाजकल्याणच्या निदर्शनास आणून दिले होते. आठ दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप समाजकल्याण सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. या घोटाळे बहाद्दरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुलींना समाजकल्याण विभागामार्फत प्रत्येक वर्षी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. मागासवर्गीय जातीतील मुलींचे शिक्षणातील घटू नये, यासाठी ही शिष्यवृत्ती योजना २००३-०४ साली शासनाने सुरू केली. मात्र प्रत्यक्षात ही शिष्यवृत्ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलीच नाही. संस्था चालक, मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी मिलीभगत करुन मुलींची शिष्यवृत्ती आपल्या खिश्यात टाकण्याचा महाप्रताप केला होता.या शिष्यवृत्ती वाटपाचा घोटाळा ‘लोकमत’ने उजेडात आणला होता. यावर औरंगाबादचे प्रादेशिक उपायुक्त एस.बी. कांबळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात आजही समिती न नेमल्याने या घोटाळे बहाद्दरांना समाजकल्याणचेच अभय असल्याचा आरोप मनविसेचे शैलेश जाधव यांनी केला आहे.बीडचे सहाय्यक आयुक्त आर.एम. शिंदे यांच्याशी गुरुवारी चर्चा करण्यात आली. मात्र त्यांना या घोटाळ्याबाबत फारसे गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. शिंदे यांनीही यापूर्वी आपण चौकशी समिती नेमू, असे सांगितले होते. मात्र त्यांनीही अद्याप कुठलेही पाऊल उचललेच नाही. हा प्रकार मागील तीन-चार वर्षांपासून सुरू असून, यामध्ये समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांसह शाळेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे.विद्यार्थिनींनीपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचत नसल्याने आजही सर्वसामान्य कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित रहात आहेत. याला समाजकल्याण कार्यालयच जबाबदार असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे. आठ दिवसानंतरही समाजकल्याणला साधी पाहणी करण्याची तसदीही घ्यावीशी वाटली नाही. आपल्याला इतर कामे भरपूर आहेत, असे सांगून या शिष्यवृत्ती वाटपात घोटाळा करणाऱ्या शाळांची पाठराखण केली जात आहे. गुरुवारी मनविसेचे शैलेश जाधव यांनी शिष्यवृत्ती वाटपाच्या घोटाळ्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. घोटाळे बहाद्दर शाळांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील मनविसेने दिला आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थी संघटनाही झाल्या आक्रमकविद्यार्थिनींना शिष्यवृत्तीपासून अलिप्त ठेवणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा विद्यार्थिनींना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एसएफआयचे राज्याध्यक्ष मोहन जाधव, देविदास जाधव, कौस्तुभ पटाईत, रोहिदास जाधव, दिनेश सुरवसे, गोविंद निरडे, अरुण कलेटवार यांनी दिला आहेसमाजकल्याणच्या अधिकाऱ्यांकडूनच घोटाळे बहाद्दरांची पाठराखण होत असल्याचेही मनविसेचे शैलेश जाधव यांनी सांगितले.