शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अतिक्रमणे हटविण्यात कसूर; मनपाच्या १२ अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये ‘कॉस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:58 IST

वारंवार संधी देऊनही खंडपीठाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन केले नसल्याचा परिणाम

छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातील अतिक्रमणे हटविण्याबाबत वारंवार आदेश व संधी देऊनही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन केले नाही, याबाबत खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी पुन्हा सक्त नाराजी व्यक्त केली. एन-१ ते एन-१२ आणि ‘कॅनॉट प्लेस’ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी सोपविलेल्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबाबत त्यांच्या पगारातून प्रत्येकी १० हजार रुपये ‘कॉस्ट’ खंडपीठात जमा करण्याचा आदेश गुरुवारी दिला. यानंतरही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही, तर मनपा आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल, असा आदेश खंडपीठाने दिला.

सिडकोने निश्चित केलेल्या ‘हॉकर्स मार्केट’ची सद्यस्थिती दर्शविणारा अहवाल मनपाने पुढील सुनावणीवेळी सादर करावा. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी काय कारवाई केली, याबाबतसुद्धा पुढील सुनावणीवेळी माहिती सादर करावी, असे आदेशात म्हटले. या जनहित याचिकेवर २९ मार्चला पुढील सुनावणी आहे. न्यायालयाचे मित्र ॲड. अभय ओस्तवाल यांनी १२ सेक्टरमधील अतिक्रमणांची सुमारे पावणेतीनशे छायाचित्रे खंडपीठात सादर केली. अनेक आदेश व सूचना देऊन, ताकीद देऊन, कॉस्ट आकारून, प्रत्येक वॉर्डांसाठी विशेष अधिकारी नेमूनही परिस्थितीत फरक पडला नसल्याने खंडपीठाने नाइलाजाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी सोपविलेल्या अधिकाऱ्यांवर विभागीय आयुक्तांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची सूचना ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली. सिडको परिसर महापालिकेकडे हस्तांतरित करताना दर्शविलेला हॉकर्स झोन, पार्किंगच्या जागा दिसत नाहीत. सिडकोत स्थायी व अस्थायी अतिक्रमणे, हातगाड्या, टपऱ्या यांच्या रस्त्यावरील, फूटपाथवरील अतिक्रमणांमुळे चालणेही अवघड झालेले आहे, असे ॲड. उदय बोपशेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले. ॲड. अनिल बजाज यांनी सिडकोतील सुविधांचा उल्लेख, स्थळ आणि आराखडे असलेले सिडकोचे मूळ माहितीपत्रक सादर केले. जरुर पडल्यास मनपाचे अधिकारी पोलिसांची मदत घेऊन अतिक्रमणांवर कारवाई करतील, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली.

अतिक्रमणामुळे सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघनअतिक्रमणामुळे सामान्य माणसांच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होते. अधिकाऱ्यांनी अतिक्रमणांवर कारवाई केली नाही तर ती जनतेची फसवणूक ठरते. अतिक्रमणामुळे लोकांच्या जीवितास आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होतो, अशा आशयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ न्यायालयाचे मित्र अभय ओस्तवाल यांनी दिला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद