शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

अतिक्रमणे हटविण्यात कसूर; मनपाच्या १२ अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये ‘कॉस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:58 IST

वारंवार संधी देऊनही खंडपीठाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन केले नसल्याचा परिणाम

छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातील अतिक्रमणे हटविण्याबाबत वारंवार आदेश व संधी देऊनही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन केले नाही, याबाबत खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी पुन्हा सक्त नाराजी व्यक्त केली. एन-१ ते एन-१२ आणि ‘कॅनॉट प्लेस’ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी सोपविलेल्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबाबत त्यांच्या पगारातून प्रत्येकी १० हजार रुपये ‘कॉस्ट’ खंडपीठात जमा करण्याचा आदेश गुरुवारी दिला. यानंतरही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही, तर मनपा आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल, असा आदेश खंडपीठाने दिला.

सिडकोने निश्चित केलेल्या ‘हॉकर्स मार्केट’ची सद्यस्थिती दर्शविणारा अहवाल मनपाने पुढील सुनावणीवेळी सादर करावा. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी काय कारवाई केली, याबाबतसुद्धा पुढील सुनावणीवेळी माहिती सादर करावी, असे आदेशात म्हटले. या जनहित याचिकेवर २९ मार्चला पुढील सुनावणी आहे. न्यायालयाचे मित्र ॲड. अभय ओस्तवाल यांनी १२ सेक्टरमधील अतिक्रमणांची सुमारे पावणेतीनशे छायाचित्रे खंडपीठात सादर केली. अनेक आदेश व सूचना देऊन, ताकीद देऊन, कॉस्ट आकारून, प्रत्येक वॉर्डांसाठी विशेष अधिकारी नेमूनही परिस्थितीत फरक पडला नसल्याने खंडपीठाने नाइलाजाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी सोपविलेल्या अधिकाऱ्यांवर विभागीय आयुक्तांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची सूचना ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली. सिडको परिसर महापालिकेकडे हस्तांतरित करताना दर्शविलेला हॉकर्स झोन, पार्किंगच्या जागा दिसत नाहीत. सिडकोत स्थायी व अस्थायी अतिक्रमणे, हातगाड्या, टपऱ्या यांच्या रस्त्यावरील, फूटपाथवरील अतिक्रमणांमुळे चालणेही अवघड झालेले आहे, असे ॲड. उदय बोपशेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले. ॲड. अनिल बजाज यांनी सिडकोतील सुविधांचा उल्लेख, स्थळ आणि आराखडे असलेले सिडकोचे मूळ माहितीपत्रक सादर केले. जरुर पडल्यास मनपाचे अधिकारी पोलिसांची मदत घेऊन अतिक्रमणांवर कारवाई करतील, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली.

अतिक्रमणामुळे सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघनअतिक्रमणामुळे सामान्य माणसांच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होते. अधिकाऱ्यांनी अतिक्रमणांवर कारवाई केली नाही तर ती जनतेची फसवणूक ठरते. अतिक्रमणामुळे लोकांच्या जीवितास आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होतो, अशा आशयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ न्यायालयाचे मित्र अभय ओस्तवाल यांनी दिला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद