शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

औरंगाबादेतील विसर्जन विहिरींचा गाळ काढण्यासाठी ४२ लाख रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 15:23 IST

Ganesh Mahotsav Aurangabad : संघर्षनगर, मुकुंदवाडी, संतोषीमाता नगर आणि सिडको एन-१२ या चार विहिरींमधील गाळ काढण्याचे काम देण्यात आले.

ठळक मुद्देदोन कृत्रिम तलावही महापालिका तयार करणार

औरंगाबाद : शहरातील विसर्जन विहिरींच्या ( Ganesh Mahotsav ) स्वच्छतेचे काम महापालिकेने ( Aurangabad Municipal Corporation ) हाती घेतले असून, सध्या हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. परंपरागत ९ विहिरींमधील गाळ काढणे, दोन कृत्रिम तलाव तयार करणे अशा एकूण अकरा विहिरींच्या कामावर ४२ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. जालाननगर येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत.

दरवर्षी मनपाकडून गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाते. शहरात ९ विहिरींमध्ये विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. दोन ठिकाणी कृत्रिम तलावात विसर्जनासाठी सोय करण्यात येते. गणेशोत्सवापूर्वी विहिरींमधील गाळ काढण्यात येतो. पूर्वी हा खर्च १ कोटीपर्यंत जात होता. नवीन विहिरी खोदण्यासाठी सरासरी ३ ते ४ लाख रुपयांचा खर्च येतो. महापालिकेकडून एका विहिरीतील गाळ काढण्यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च दाखवत असत. या प्रकारावर प्रचंड टीका झाल्यानंतर पन्नास टक्के खर्च कमी करण्यात आला.

संघर्षनगर, मुकुंदवाडी, संतोषीमाता नगर आणि सिडको एन-१२ या चार विहिरींमधील गाळ काढण्याचे काम देण्यात आले. हे काम तब्बल १६ लाख ६० हजार रुपयांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित पाच विसर्जन विहिरींचा गाळ काढणे आणि दोन कृत्रिम तलाव करण्याचे कामही सुरू आहे. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी नमूद केले. या कामांची पाहणी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय लवकरच करणार असल्याची माहिती उपअभियंता बी.डी. फड यांनी दिली. सर्वच विसर्जन विहिरींच्या ठिकाणी ३ दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाची तयारी झालेली आहे.

गणेश विसर्जन विहिरीभावसिंगपुरा, औरंगपुरा, हडको एन-१२, संघर्षनगर, संतोषीमातानगर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर, सातारा गाव, जालाननगर, ज्योतीनगर (कृत्रिम तलाव), हर्सूल तलाव स्मृतिवन (कृत्रिम तलाव)

हेही वाचा - शिवसेनेत काहीतरी चाललंय ! अतिवृष्टीच्या पाहणीआडून राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे लोकसभा व्हिजन

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGanesh Mahotsavगणेशोत्सव