शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
2
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
3
चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
4
iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
5
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
6
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
7
लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
8
एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट
9
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
10
रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
11
'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
12
Pawandeep Rajan : "माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव
13
१२ वर्षांखालील मुलांना देऊ नका स्मार्टफोन; अन्यथा नैराश्य, लठ्ठपणाचा मोठा धोका!
14
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
15
विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार
16
अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
17
'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका
18
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
19
USD to INR: का होतेय भारतीय रुपयामध्ये घसरण? आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये सामिल
20
डोळ्याला मोठा भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात; जस्सीचा बदलला लूक, आता ओळखताही येत नाही
Daily Top 2Weekly Top 5

दररोज येताहेत प्रस्ताव... टँकरची मागणी वाढली

By admin | Updated: November 26, 2014 01:09 IST

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे़ जिल्ह्यातील ९५ गावांत पाणीटंचाईचे सावट आहे़ यापैकी ३५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असून,

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे़ जिल्ह्यातील ९५ गावांत पाणीटंचाईचे सावट आहे़ यापैकी ३५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असून, त्यापैकी केवळ १८ गावांच्या अधिग्रहणाला मंजुरी देण्यात आली आहे़ तरी एकूण ६ गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे़ दरम्यान प्रशासनाने २ गावांना २ टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे़ त्यात औसा तालुक्यातील १ व अहमदपूर तालुक्यातील १ गावचा समावेश आहे़जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, अधिग्रहण, विंधन विहिरी, नळ दुरुस्ती, पूरक नळ योजना, विंधन विहिरींची दुरुस्ती आदी उपाययोजनांचे नियोजन केले आहे़ जशी मागणी येईल, त्यानुसार प्रस्ताव घेण्यात येत आहे़ जिल्ह्यातील गावे व वाडी तांडे मिळून ९५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली आहे़ त्यातील ३५ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले असून, त्यातील १८ प्रस्ताव मंजूरही झाले आहेत़ तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर तालुक्यातील १, औसा तालुक्यातील २ व अहमदपूर तालुक्यातील ३ अशा एकूण ६ गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत़ औसा तालुक्यातील १ व अहमदपूर तालुक्यातील १ अशा २ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे़ लातूर तालुक्यातील १५, औसा तालुक्यातील ३७, निलंगा तालुक्यातील २०, रेणापूर तालुक्यातील ६, अहमदपूर तालुक्यातील १४, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील २ व जळकोट तालुक्यातील १ अशा एकूण ९५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली़ त्यापैकी लातूर तालुक्यातील ७, औसा तालुक्यातील ६, निलंगा तालुक्यातील ३, अहमदपूर तालुक्यातील २ अशा एकूण १८ गावांतील अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली़ (प्रतिनिधी)४टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी जोर धरु लागली असून, दररोज या मागणीचे प्रस्ताव येत आहेत़ मंगळवारीच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात लातूर तालुक्यातील ३, औसा तालुक्यातील २, अहमदपूर तालुक्यातील ४ अशा एकूण ९ गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे़ गाव, वाडी-तांड्यावरुन मागणीचे प्रस्ताव येत आहेत़ प्रशासनाकडूनही उपलब्ध पाणी अधिग्रहण केले जात असून, स्वतंत्र टंचाई निवारण कक्ष तयार करण्यात आला आहे़ सध्या विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यावर भर असून कृती आराखड्यानुसार पूरक नळयोजना, नळयोजनांची दुरुस्ती, नव्या विंधन विहिरी आदी कामांचे प्रस्तावही घेतले जात आहेत़