शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

दररोज येताहेत प्रस्ताव... टँकरची मागणी वाढली

By admin | Updated: November 26, 2014 01:09 IST

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे़ जिल्ह्यातील ९५ गावांत पाणीटंचाईचे सावट आहे़ यापैकी ३५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असून,

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे़ जिल्ह्यातील ९५ गावांत पाणीटंचाईचे सावट आहे़ यापैकी ३५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असून, त्यापैकी केवळ १८ गावांच्या अधिग्रहणाला मंजुरी देण्यात आली आहे़ तरी एकूण ६ गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे़ दरम्यान प्रशासनाने २ गावांना २ टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे़ त्यात औसा तालुक्यातील १ व अहमदपूर तालुक्यातील १ गावचा समावेश आहे़जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, अधिग्रहण, विंधन विहिरी, नळ दुरुस्ती, पूरक नळ योजना, विंधन विहिरींची दुरुस्ती आदी उपाययोजनांचे नियोजन केले आहे़ जशी मागणी येईल, त्यानुसार प्रस्ताव घेण्यात येत आहे़ जिल्ह्यातील गावे व वाडी तांडे मिळून ९५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली आहे़ त्यातील ३५ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले असून, त्यातील १८ प्रस्ताव मंजूरही झाले आहेत़ तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर तालुक्यातील १, औसा तालुक्यातील २ व अहमदपूर तालुक्यातील ३ अशा एकूण ६ गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत़ औसा तालुक्यातील १ व अहमदपूर तालुक्यातील १ अशा २ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे़ लातूर तालुक्यातील १५, औसा तालुक्यातील ३७, निलंगा तालुक्यातील २०, रेणापूर तालुक्यातील ६, अहमदपूर तालुक्यातील १४, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील २ व जळकोट तालुक्यातील १ अशा एकूण ९५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली़ त्यापैकी लातूर तालुक्यातील ७, औसा तालुक्यातील ६, निलंगा तालुक्यातील ३, अहमदपूर तालुक्यातील २ अशा एकूण १८ गावांतील अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली़ (प्रतिनिधी)४टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी जोर धरु लागली असून, दररोज या मागणीचे प्रस्ताव येत आहेत़ मंगळवारीच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात लातूर तालुक्यातील ३, औसा तालुक्यातील २, अहमदपूर तालुक्यातील ४ अशा एकूण ९ गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे़ गाव, वाडी-तांड्यावरुन मागणीचे प्रस्ताव येत आहेत़ प्रशासनाकडूनही उपलब्ध पाणी अधिग्रहण केले जात असून, स्वतंत्र टंचाई निवारण कक्ष तयार करण्यात आला आहे़ सध्या विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यावर भर असून कृती आराखड्यानुसार पूरक नळयोजना, नळयोजनांची दुरुस्ती, नव्या विंधन विहिरी आदी कामांचे प्रस्तावही घेतले जात आहेत़