शरद वाघमारे, मालेगाव मालेगाव व नांदेड तालुक्यातील काही गावांना इसापूर धरणाचे दोन दलघमी पाणी सोडण्यात आले, पाणी आलेही. यासंदर्भात ‘लोकमत’ ने १७ डिसेंबरच्या अंकात सविस्तरपणे वृत्त प्रकाशित केले होते. सदरील पाणी गिरगाव जि़हिंगोली दाभडी वितरीकेतून दिले जाणार असून पाण्याच्या अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार असल्याची माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी दिली़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी मालेगाव परिसराला मिळावे याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता़ मालेगाव परिसरातील मालेगाव, धामधरी, देगाव कु़, डौर, सावरगाव, उमरी, कामठा बु़ व नांदेड तालुक्यातील कासारखेडा,भालकी, चिखली आदी गावांना उर्ध्व पैनगंगेचे (ईसापूर) पाणी दाभडी नाल्यातून सोडावे अशी मागणी होते़ परंतु आरक्षित झालेले पाणी ०़३० दलघमी होते़ प्रत्यक्षात या गावांना पाणी मिळण्यासाठी वाढीव पाण्याची आवश्यकता होती़ याबाबत खा़अशोकराव चव्हाण व मालेगाव व नांदेड तालुक्यातील गावांनी वाढीव पाण्याची मागणी केली होती़ त्यामुळे उर्ध्व पैनगंगेचे पाणी गिरगाव वितरीकेतून दाभडी नाल्यातून धामधरी, मालेगाव, देगाव कु़, डौर, कासारखेडा, भालकी, चिखली, पासदगाव, इजळी, चिकाळा, सावरगाव, उमरी, कामठा बु़ आदी गावांना २ दशलक्ष घनमीटर पाणी सीतानदीमधून मिळणार आहे़
अखेर मालेगाव परिसराला ईसापूरचे २ दलघमी पाणी
By admin | Updated: December 18, 2015 00:01 IST