शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

यंदाच्या उन्हाळ्यातही घशाला कोरडच; शहराच्या पाण्यात वाढ करण्याचा प्रयोग पुन्हा लांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:47 IST

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते.

औरंगाबाद : जायकवाडीहून शहरासाठी वाढीव पाणी आणावे अशी मागणी मागील दोन दशकांपासून औरंगाबादकर करीत आहेत. शहरात वाढीव पाणी आणणार अशी गेले वर्षभर घोषणा करणारी महापालिका व शासनाने आता वाढीव पाणी आणण्याचा प्रयोग तहकूब केल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही शहराच्या घशाला कोरड पडणार, हे स्पष्ट झाले. पावसाळ्यानंतरच नवीन सात किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होऊ शकते.

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते. जास्तीचे पाणी आणण्याची क्षमता महापालिकेच्या दोन्ही जलवाहिन्यांमध्ये नाही. जलवाहिन्यांसह उपसा करणाऱ्या मोटारींचे आयुष्य २० वर्षांपूर्वीच संपले आहे. फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत अनेक ठिकाणी जलवाहिनीची जाडी कमी झाली. पाण्याचा वेग व दाब जराही वाढला तरी जलवाहिनी फुटते. शहरातील पाणीप्रश्नी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी २० एमएलडी पाणी वाढवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. वर्ष संपत आले तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात औरंगाबादकरांच्या नशिबी पाणी... पाणी... करण्याची वेळ येणार, हे निश्चित.

२०० वसाहती टँकरवरशहरातील २०० पेक्षा अधिक वसाहतींना मागील १० वर्षांपासून टँकरद्वारे तहान भागवावी लागते. या वसाहतींमध्ये जलवाहिन्याच टाकण्यात आलेल्या नाहीत. ३०० रुपये दरमहा देऊन आठवड्यातून दोनदा एक ड्रम पाणी मिळते. वापरण्यासाठी नागरिकांना वेगळे पैसे खर्च करून पाणी घ्यावे लागते. शहराचे पाणी वाढविण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाने कधीच लक्ष दिले नाही, हे विशेष.

पाच दिवस, आठ दिवसांआड पाणीशहरातील वेगवेगळ्या भागांत महापालिकेकडून सोयीनुसार पाणीपुरवठा करण्यात येतो. सर्व वसाहतींना दिवसाआड पाणी द्या, एवढी साधी मागणीही मान्य होत नाही. काही भागांत पाच दिवसाआड, तर काही भागांत आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

७ कि.मी. जलवाहिनी आवश्यकनवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिनीतूनच २० एमएलडी पाणी अधिक खेचावे लागणार आहे. सध्याच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्यामुळे जलवाहिनी अनेकदा फुटते. त्यामुळे क्रॉस कनेक्शन करावे लागणार आहे. त्यासाठी सात किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकावी लागणार आहे. पाईपनिर्मितीचे काम वेगात आल्यावरच हे काम शक्य आहे.- अजय सिंह, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी