शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

यंदाच्या उन्हाळ्यातही घशाला कोरडच; शहराच्या पाण्यात वाढ करण्याचा प्रयोग पुन्हा लांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:47 IST

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते.

औरंगाबाद : जायकवाडीहून शहरासाठी वाढीव पाणी आणावे अशी मागणी मागील दोन दशकांपासून औरंगाबादकर करीत आहेत. शहरात वाढीव पाणी आणणार अशी गेले वर्षभर घोषणा करणारी महापालिका व शासनाने आता वाढीव पाणी आणण्याचा प्रयोग तहकूब केल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही शहराच्या घशाला कोरड पडणार, हे स्पष्ट झाले. पावसाळ्यानंतरच नवीन सात किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होऊ शकते.

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते. जास्तीचे पाणी आणण्याची क्षमता महापालिकेच्या दोन्ही जलवाहिन्यांमध्ये नाही. जलवाहिन्यांसह उपसा करणाऱ्या मोटारींचे आयुष्य २० वर्षांपूर्वीच संपले आहे. फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत अनेक ठिकाणी जलवाहिनीची जाडी कमी झाली. पाण्याचा वेग व दाब जराही वाढला तरी जलवाहिनी फुटते. शहरातील पाणीप्रश्नी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी २० एमएलडी पाणी वाढवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. वर्ष संपत आले तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात औरंगाबादकरांच्या नशिबी पाणी... पाणी... करण्याची वेळ येणार, हे निश्चित.

२०० वसाहती टँकरवरशहरातील २०० पेक्षा अधिक वसाहतींना मागील १० वर्षांपासून टँकरद्वारे तहान भागवावी लागते. या वसाहतींमध्ये जलवाहिन्याच टाकण्यात आलेल्या नाहीत. ३०० रुपये दरमहा देऊन आठवड्यातून दोनदा एक ड्रम पाणी मिळते. वापरण्यासाठी नागरिकांना वेगळे पैसे खर्च करून पाणी घ्यावे लागते. शहराचे पाणी वाढविण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाने कधीच लक्ष दिले नाही, हे विशेष.

पाच दिवस, आठ दिवसांआड पाणीशहरातील वेगवेगळ्या भागांत महापालिकेकडून सोयीनुसार पाणीपुरवठा करण्यात येतो. सर्व वसाहतींना दिवसाआड पाणी द्या, एवढी साधी मागणीही मान्य होत नाही. काही भागांत पाच दिवसाआड, तर काही भागांत आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

७ कि.मी. जलवाहिनी आवश्यकनवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिनीतूनच २० एमएलडी पाणी अधिक खेचावे लागणार आहे. सध्याच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्यामुळे जलवाहिनी अनेकदा फुटते. त्यामुळे क्रॉस कनेक्शन करावे लागणार आहे. त्यासाठी सात किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकावी लागणार आहे. पाईपनिर्मितीचे काम वेगात आल्यावरच हे काम शक्य आहे.- अजय सिंह, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी