शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

यंदाच्या उन्हाळ्यातही घशाला कोरडच; शहराच्या पाण्यात वाढ करण्याचा प्रयोग पुन्हा लांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:47 IST

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते.

औरंगाबाद : जायकवाडीहून शहरासाठी वाढीव पाणी आणावे अशी मागणी मागील दोन दशकांपासून औरंगाबादकर करीत आहेत. शहरात वाढीव पाणी आणणार अशी गेले वर्षभर घोषणा करणारी महापालिका व शासनाने आता वाढीव पाणी आणण्याचा प्रयोग तहकूब केल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही शहराच्या घशाला कोरड पडणार, हे स्पष्ट झाले. पावसाळ्यानंतरच नवीन सात किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होऊ शकते.

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते. जास्तीचे पाणी आणण्याची क्षमता महापालिकेच्या दोन्ही जलवाहिन्यांमध्ये नाही. जलवाहिन्यांसह उपसा करणाऱ्या मोटारींचे आयुष्य २० वर्षांपूर्वीच संपले आहे. फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत अनेक ठिकाणी जलवाहिनीची जाडी कमी झाली. पाण्याचा वेग व दाब जराही वाढला तरी जलवाहिनी फुटते. शहरातील पाणीप्रश्नी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी २० एमएलडी पाणी वाढवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. वर्ष संपत आले तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात औरंगाबादकरांच्या नशिबी पाणी... पाणी... करण्याची वेळ येणार, हे निश्चित.

२०० वसाहती टँकरवरशहरातील २०० पेक्षा अधिक वसाहतींना मागील १० वर्षांपासून टँकरद्वारे तहान भागवावी लागते. या वसाहतींमध्ये जलवाहिन्याच टाकण्यात आलेल्या नाहीत. ३०० रुपये दरमहा देऊन आठवड्यातून दोनदा एक ड्रम पाणी मिळते. वापरण्यासाठी नागरिकांना वेगळे पैसे खर्च करून पाणी घ्यावे लागते. शहराचे पाणी वाढविण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाने कधीच लक्ष दिले नाही, हे विशेष.

पाच दिवस, आठ दिवसांआड पाणीशहरातील वेगवेगळ्या भागांत महापालिकेकडून सोयीनुसार पाणीपुरवठा करण्यात येतो. सर्व वसाहतींना दिवसाआड पाणी द्या, एवढी साधी मागणीही मान्य होत नाही. काही भागांत पाच दिवसाआड, तर काही भागांत आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

७ कि.मी. जलवाहिनी आवश्यकनवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिनीतूनच २० एमएलडी पाणी अधिक खेचावे लागणार आहे. सध्याच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्यामुळे जलवाहिनी अनेकदा फुटते. त्यामुळे क्रॉस कनेक्शन करावे लागणार आहे. त्यासाठी सात किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकावी लागणार आहे. पाईपनिर्मितीचे काम वेगात आल्यावरच हे काम शक्य आहे.- अजय सिंह, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी