शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड तपानंतरही एपीआय कामगारांचा ऋणानुबंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:02 IST

औरंगाबाद : एपीआय कंपनी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचे जवळपास २५ ते ३० वर्षे साक्षीदार राहिलेले कामगार जेव्हा १७ ...

औरंगाबाद : एपीआय कंपनी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचे जवळपास २५ ते ३० वर्षे साक्षीदार राहिलेले कामगार जेव्हा १७ वर्षांनंतर शुक्रवारी ३० जुलै भेटले, तो क्षण भावूक होता. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.

या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले ते ‘लोकमत’चे उपाध्यक्ष (मनुष्यबळ विकास) बालाजी मुळे, तसेच कामगार नेते एस.एम. कुलकर्णी, युवराज पाटील, विजय इंगळे हे मान्यवर. यावेळी युवराज पाटील, आर.बी. पाटील, मोहन गोरमे यांनी मनोगत व्यक्त केले. चिकलठाणा एमआयडीसीत १९७२ नंतर एपीआय कंपनी आली आणि खऱ्या अर्थाने शहरातील औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली; मात्र टप्प्याटप्प्याने २००३ पर्यंत ही कंपनी बंद पडली आणि हजारो कामगार बेरोजगार झाले. १७ वर्षांनंतर झालेल्या या स्नेहमिलनात उपस्थित सर्वांना सुरुवातीचे दिवस आठवले. कंपनीच्या प्रगतीसाठी अहोरात्र घेतलेले परिश्रम, कामगारांच्या प्रश्नांसाठी उठविलेला आवाज, रेल्वे रुंदीकरण, वैधानिक विकास महामंडळ तसेच हायकोर्टची निर्मिती, सिडकोच्या विकासाचे प्रश्न किंवा त्या काळी गाजलेला मुंबई गिरणी कामगारांचा प्रश्न, या चळवळीत एपीआयचे कामगार हिरीरीने सहभागी व्हायचे.

चौकट

यांनी घडवून आणली कामगारांची भेट

सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात प्रभाकर खराडकर, महाजन चुंगडे, उत्तम वडगावकर, आर.आय.शेख, किसन रणसुभे, दिलीप मोगले, अनंता जोशी, सारंगधर जोशी, यादवराव बोरसे, नारायण ढाकणे यांचा सहभाग होता.

चौकट

पीएफची रक्कम दिली मिळवून

‘लोकमत’चे मनुष्य बळ विकास विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे यांनी सांगितले की, मी एपीआय कंपनीत १० वर्षे अधिकारी म्हणून काम केले. तेव्हा कामगारांच्या अडचणी जवळून पाहण्यास मिळाल्या. कंपनी बंद पडली तेव्हा ‘लोकमत’च्या माध्यमातून कामगारांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. काही कामगारांच्या मुलांना विविध कंपनीत नोकरी लावून दिली. पीएफच्या मुंबई मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत एपीआयच्या मालकांना कामगारांचा थकीत पीएफ जमा करण्यास सांगितले.

--

खेळातही होता दबदबा

एपीआयमधील तत्कालीन सहायक अधिकारी एस.एम. कुलकर्णी यांनी सांगितले की, या कंपनीतील असोसिएशन ऑफ इंजिनिअरींग वर्कर्स या संघटनेने नुसते कामगारांचेच प्रश्न सोडविले नाहीत, तर कब्बडी,व्हॉलीबॉल आदी मैदानी खेळातही आपला दबदबा निर्माण केला होता. लेझीममध्ये तर कंपनीचे पथक एशियाड स्पर्धेत सहभागी झाले होते.

--