शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

दीड तपानंतरही एपीआय कामगारांचा ऋणानुबंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:02 IST

औरंगाबाद : एपीआय कंपनी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचे जवळपास २५ ते ३० वर्षे साक्षीदार राहिलेले कामगार जेव्हा १७ ...

औरंगाबाद : एपीआय कंपनी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचे जवळपास २५ ते ३० वर्षे साक्षीदार राहिलेले कामगार जेव्हा १७ वर्षांनंतर शुक्रवारी ३० जुलै भेटले, तो क्षण भावूक होता. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.

या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले ते ‘लोकमत’चे उपाध्यक्ष (मनुष्यबळ विकास) बालाजी मुळे, तसेच कामगार नेते एस.एम. कुलकर्णी, युवराज पाटील, विजय इंगळे हे मान्यवर. यावेळी युवराज पाटील, आर.बी. पाटील, मोहन गोरमे यांनी मनोगत व्यक्त केले. चिकलठाणा एमआयडीसीत १९७२ नंतर एपीआय कंपनी आली आणि खऱ्या अर्थाने शहरातील औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली; मात्र टप्प्याटप्प्याने २००३ पर्यंत ही कंपनी बंद पडली आणि हजारो कामगार बेरोजगार झाले. १७ वर्षांनंतर झालेल्या या स्नेहमिलनात उपस्थित सर्वांना सुरुवातीचे दिवस आठवले. कंपनीच्या प्रगतीसाठी अहोरात्र घेतलेले परिश्रम, कामगारांच्या प्रश्नांसाठी उठविलेला आवाज, रेल्वे रुंदीकरण, वैधानिक विकास महामंडळ तसेच हायकोर्टची निर्मिती, सिडकोच्या विकासाचे प्रश्न किंवा त्या काळी गाजलेला मुंबई गिरणी कामगारांचा प्रश्न, या चळवळीत एपीआयचे कामगार हिरीरीने सहभागी व्हायचे.

चौकट

यांनी घडवून आणली कामगारांची भेट

सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात प्रभाकर खराडकर, महाजन चुंगडे, उत्तम वडगावकर, आर.आय.शेख, किसन रणसुभे, दिलीप मोगले, अनंता जोशी, सारंगधर जोशी, यादवराव बोरसे, नारायण ढाकणे यांचा सहभाग होता.

चौकट

पीएफची रक्कम दिली मिळवून

‘लोकमत’चे मनुष्य बळ विकास विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे यांनी सांगितले की, मी एपीआय कंपनीत १० वर्षे अधिकारी म्हणून काम केले. तेव्हा कामगारांच्या अडचणी जवळून पाहण्यास मिळाल्या. कंपनी बंद पडली तेव्हा ‘लोकमत’च्या माध्यमातून कामगारांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. काही कामगारांच्या मुलांना विविध कंपनीत नोकरी लावून दिली. पीएफच्या मुंबई मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत एपीआयच्या मालकांना कामगारांचा थकीत पीएफ जमा करण्यास सांगितले.

--

खेळातही होता दबदबा

एपीआयमधील तत्कालीन सहायक अधिकारी एस.एम. कुलकर्णी यांनी सांगितले की, या कंपनीतील असोसिएशन ऑफ इंजिनिअरींग वर्कर्स या संघटनेने नुसते कामगारांचेच प्रश्न सोडविले नाहीत, तर कब्बडी,व्हॉलीबॉल आदी मैदानी खेळातही आपला दबदबा निर्माण केला होता. लेझीममध्ये तर कंपनीचे पथक एशियाड स्पर्धेत सहभागी झाले होते.

--