शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दीड तपानंतरही एपीआय कामगारांचा ऋणानुबंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:02 IST

औरंगाबाद : एपीआय कंपनी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचे जवळपास २५ ते ३० वर्षे साक्षीदार राहिलेले कामगार जेव्हा १७ ...

औरंगाबाद : एपीआय कंपनी व चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचे जवळपास २५ ते ३० वर्षे साक्षीदार राहिलेले कामगार जेव्हा १७ वर्षांनंतर शुक्रवारी ३० जुलै भेटले, तो क्षण भावूक होता. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.

या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले ते ‘लोकमत’चे उपाध्यक्ष (मनुष्यबळ विकास) बालाजी मुळे, तसेच कामगार नेते एस.एम. कुलकर्णी, युवराज पाटील, विजय इंगळे हे मान्यवर. यावेळी युवराज पाटील, आर.बी. पाटील, मोहन गोरमे यांनी मनोगत व्यक्त केले. चिकलठाणा एमआयडीसीत १९७२ नंतर एपीआय कंपनी आली आणि खऱ्या अर्थाने शहरातील औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली; मात्र टप्प्याटप्प्याने २००३ पर्यंत ही कंपनी बंद पडली आणि हजारो कामगार बेरोजगार झाले. १७ वर्षांनंतर झालेल्या या स्नेहमिलनात उपस्थित सर्वांना सुरुवातीचे दिवस आठवले. कंपनीच्या प्रगतीसाठी अहोरात्र घेतलेले परिश्रम, कामगारांच्या प्रश्नांसाठी उठविलेला आवाज, रेल्वे रुंदीकरण, वैधानिक विकास महामंडळ तसेच हायकोर्टची निर्मिती, सिडकोच्या विकासाचे प्रश्न किंवा त्या काळी गाजलेला मुंबई गिरणी कामगारांचा प्रश्न, या चळवळीत एपीआयचे कामगार हिरीरीने सहभागी व्हायचे.

चौकट

यांनी घडवून आणली कामगारांची भेट

सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात प्रभाकर खराडकर, महाजन चुंगडे, उत्तम वडगावकर, आर.आय.शेख, किसन रणसुभे, दिलीप मोगले, अनंता जोशी, सारंगधर जोशी, यादवराव बोरसे, नारायण ढाकणे यांचा सहभाग होता.

चौकट

पीएफची रक्कम दिली मिळवून

‘लोकमत’चे मनुष्य बळ विकास विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे यांनी सांगितले की, मी एपीआय कंपनीत १० वर्षे अधिकारी म्हणून काम केले. तेव्हा कामगारांच्या अडचणी जवळून पाहण्यास मिळाल्या. कंपनी बंद पडली तेव्हा ‘लोकमत’च्या माध्यमातून कामगारांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. काही कामगारांच्या मुलांना विविध कंपनीत नोकरी लावून दिली. पीएफच्या मुंबई मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत एपीआयच्या मालकांना कामगारांचा थकीत पीएफ जमा करण्यास सांगितले.

--

खेळातही होता दबदबा

एपीआयमधील तत्कालीन सहायक अधिकारी एस.एम. कुलकर्णी यांनी सांगितले की, या कंपनीतील असोसिएशन ऑफ इंजिनिअरींग वर्कर्स या संघटनेने नुसते कामगारांचेच प्रश्न सोडविले नाहीत, तर कब्बडी,व्हॉलीबॉल आदी मैदानी खेळातही आपला दबदबा निर्माण केला होता. लेझीममध्ये तर कंपनीचे पथक एशियाड स्पर्धेत सहभागी झाले होते.

--