शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजनानंतरही रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास सुरुवात होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:35 IST

शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत यासाठी राज्य शासनाने तब्बल १९ महिन्यांपूर्वी शंभर कोटींचा निधी दिला. या निधीतील ३० रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टी. व्ही. सेंटर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम होऊन दहा दिवस पूर्ण होत आहेत. आजपर्यंत एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत यासाठी राज्य शासनाने तब्बल १९ महिन्यांपूर्वी शंभर कोटींचा निधी दिला. या निधीतील ३० रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टी. व्ही. सेंटर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम होऊन दहा दिवस पूर्ण होत आहेत. आजपर्यंत एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.

महापालिकेची ही कासवगती लक्षात घेता येणाऱ्या १२ महिन्यांमध्ये ३० रस्त्यांची कामे होण्याची शक्यता कमीच आहे.महापालिकेच्या इतिहासात राज्य शासनाकडून खास रस्त्यांसाठी आजपर्यंत २२५ कोटींचा निधी कधीच आला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराच्या विकासासाठी सढळ हाताने मदत करायला तयार आहेत.

मात्र, महापालिकेतील कारभारी एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. १०० कोटींतील ३० रस्त्यांसाठी चार स्वतंत्र कंत्राटदार नेमले आहेत. चारही कंत्राटदारांकडे मोठी कामे करण्याची क्षमता आहे. महापालिकेने कंत्राटदारांना ३० रस्त्यांवर कुठेच मार्किंग करून दिलेली नाही. ज्या रस्त्यांवर छोटी-मोठी अतिक्रमणे आहेत, ती काढून दिलेली नाहीत. ज्या रस्त्यांवर कामे सुरू करावयाची आहेत ते रस्ते अत्यंत वर्दळीचे आहेत. दिवसा काम करणे अशक्यप्राय असून, रात्री काम अधिक वेगाने होऊ शकेल. रात्रीच्या थंडीचा फायदाही या कामांना होईल, असे कंत्राटदारांचे म्हणणे आहे.

१०० कोटींच्या कामांना अगोदरच १९ महिने उशीर झाला आहे. कसेबसे ३ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर लगेच दुसºया दिवसापासून कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा औरंगाबादकरांना होती. मागील दहा दिवसांमध्ये एकाही रस्त्यावर एक किलो सिमेंटही टाकण्यात आले नाही.

१०० कोटींसाठी स्वतंत्र विभाग१०० कोटींची कामे करण्यासाठी महापालिकेने खास उपअभियंता एस. डी. काकडे यांना कार्यकारी अभियंता बनविले. त्यांच्या मदतीला अनुभवी उपअभियंता बी. डी. फड यांना देण्यात आले. यासोबतच प्रकल्प सल्लागार समितीही मदतीला देण्यात आली. या विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना फक्त १०० कोटींचीच कामे करायची आहेत. दुसरे कोणतेच काम त्यांच्याकडे सोपविले नाही. त्यानंतरही मागील दहा दिवसांपासून कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत.काम बंद ठेवावे लागेलमार्च, एप्रिल आणि मे महिन्यात शहराचे तापमान किमान ३८ ते ४२ अंशांपर्यंत जाते. कडक उन्हाळ्यात सिमेंट रस्त्याची कामे करता येत नाहीत. अशा वातावरणात काम केल्यास रस्त्याला तडे जाण्याची दाट शक्यता असते. किमान ३० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत सिमेंट रस्त्यांची कामे करावीत, असे निकष आहेत. उन्हाळ्यात मनपाला अजिबात काम करता येणार नाही. रात्री गारवा असेल तरच काम करता येईल.

काम सुरू करायला हरकत काय?भूमिपूजन झाल्यावर त्वरित काम सुरू करायला काहीच हरकत नाही. कंत्राटदारांची काही जुनी थकबाकी असेल तर तीसुद्धा मनपाने दिली पाहिजे. अधिकाºयांकडे नकाशे तयार असतात. त्यानुसार मार्किंग करून द्यायला हवी. त्यासाठी खास मोठे कोणते संशोधन करीत बसण्याची गरज नाही. राजकीय पक्षांनी १२५ कोटींची यादी त्वरित तयार करून द्यायला हवी. थोडासा सामंजस्यपणा दाखवायला हवा. दोन चार रस्ते इकडे तिकडे झाले तर हरकत काय? पक्षाचा विचार न करता थोडा शहराचा विचार करायला हवा.कृष्णा भोगे, माजी सनदी अधिकारी१२५ कोटींच्या यादीचा घोळराज्य शासनाने आणखी १२५ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी रस्त्यांची यादी निश्चित करण्यावरून मनपातील सेना-भाजप युतीत सुंदोपसुंदी सुरू आहे. राज्य शासनाकडे हा प्रस्ताव लवकरात लवकर न गेल्यास लोकसभा निवडणुकीच्या आचरसंहितेत निविदा प्रक्रिया रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अगोदरच शंभर कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मनपाने १९ महिने लावले. आता १२५ कोटींसाठी आणखी दोन वर्षे लावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAurangabadऔरंगाबाद