शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

भूमिपूजनानंतरही रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास सुरुवात होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:35 IST

शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत यासाठी राज्य शासनाने तब्बल १९ महिन्यांपूर्वी शंभर कोटींचा निधी दिला. या निधीतील ३० रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टी. व्ही. सेंटर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम होऊन दहा दिवस पूर्ण होत आहेत. आजपर्यंत एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत यासाठी राज्य शासनाने तब्बल १९ महिन्यांपूर्वी शंभर कोटींचा निधी दिला. या निधीतील ३० रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टी. व्ही. सेंटर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम होऊन दहा दिवस पूर्ण होत आहेत. आजपर्यंत एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.

महापालिकेची ही कासवगती लक्षात घेता येणाऱ्या १२ महिन्यांमध्ये ३० रस्त्यांची कामे होण्याची शक्यता कमीच आहे.महापालिकेच्या इतिहासात राज्य शासनाकडून खास रस्त्यांसाठी आजपर्यंत २२५ कोटींचा निधी कधीच आला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराच्या विकासासाठी सढळ हाताने मदत करायला तयार आहेत.

मात्र, महापालिकेतील कारभारी एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. १०० कोटींतील ३० रस्त्यांसाठी चार स्वतंत्र कंत्राटदार नेमले आहेत. चारही कंत्राटदारांकडे मोठी कामे करण्याची क्षमता आहे. महापालिकेने कंत्राटदारांना ३० रस्त्यांवर कुठेच मार्किंग करून दिलेली नाही. ज्या रस्त्यांवर छोटी-मोठी अतिक्रमणे आहेत, ती काढून दिलेली नाहीत. ज्या रस्त्यांवर कामे सुरू करावयाची आहेत ते रस्ते अत्यंत वर्दळीचे आहेत. दिवसा काम करणे अशक्यप्राय असून, रात्री काम अधिक वेगाने होऊ शकेल. रात्रीच्या थंडीचा फायदाही या कामांना होईल, असे कंत्राटदारांचे म्हणणे आहे.

१०० कोटींच्या कामांना अगोदरच १९ महिने उशीर झाला आहे. कसेबसे ३ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर लगेच दुसºया दिवसापासून कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा औरंगाबादकरांना होती. मागील दहा दिवसांमध्ये एकाही रस्त्यावर एक किलो सिमेंटही टाकण्यात आले नाही.

१०० कोटींसाठी स्वतंत्र विभाग१०० कोटींची कामे करण्यासाठी महापालिकेने खास उपअभियंता एस. डी. काकडे यांना कार्यकारी अभियंता बनविले. त्यांच्या मदतीला अनुभवी उपअभियंता बी. डी. फड यांना देण्यात आले. यासोबतच प्रकल्प सल्लागार समितीही मदतीला देण्यात आली. या विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना फक्त १०० कोटींचीच कामे करायची आहेत. दुसरे कोणतेच काम त्यांच्याकडे सोपविले नाही. त्यानंतरही मागील दहा दिवसांपासून कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत.काम बंद ठेवावे लागेलमार्च, एप्रिल आणि मे महिन्यात शहराचे तापमान किमान ३८ ते ४२ अंशांपर्यंत जाते. कडक उन्हाळ्यात सिमेंट रस्त्याची कामे करता येत नाहीत. अशा वातावरणात काम केल्यास रस्त्याला तडे जाण्याची दाट शक्यता असते. किमान ३० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत सिमेंट रस्त्यांची कामे करावीत, असे निकष आहेत. उन्हाळ्यात मनपाला अजिबात काम करता येणार नाही. रात्री गारवा असेल तरच काम करता येईल.

काम सुरू करायला हरकत काय?भूमिपूजन झाल्यावर त्वरित काम सुरू करायला काहीच हरकत नाही. कंत्राटदारांची काही जुनी थकबाकी असेल तर तीसुद्धा मनपाने दिली पाहिजे. अधिकाºयांकडे नकाशे तयार असतात. त्यानुसार मार्किंग करून द्यायला हवी. त्यासाठी खास मोठे कोणते संशोधन करीत बसण्याची गरज नाही. राजकीय पक्षांनी १२५ कोटींची यादी त्वरित तयार करून द्यायला हवी. थोडासा सामंजस्यपणा दाखवायला हवा. दोन चार रस्ते इकडे तिकडे झाले तर हरकत काय? पक्षाचा विचार न करता थोडा शहराचा विचार करायला हवा.कृष्णा भोगे, माजी सनदी अधिकारी१२५ कोटींच्या यादीचा घोळराज्य शासनाने आणखी १२५ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी रस्त्यांची यादी निश्चित करण्यावरून मनपातील सेना-भाजप युतीत सुंदोपसुंदी सुरू आहे. राज्य शासनाकडे हा प्रस्ताव लवकरात लवकर न गेल्यास लोकसभा निवडणुकीच्या आचरसंहितेत निविदा प्रक्रिया रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अगोदरच शंभर कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मनपाने १९ महिने लावले. आता १२५ कोटींसाठी आणखी दोन वर्षे लावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAurangabadऔरंगाबाद