शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या ‘स्थिर आकारा’मुळे उद्योजक अस्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 14:01 IST

सध्या उद्योगांची आर्थिक घडी रुळावर आलेली नाही आणि त्यात स्थिर आकाराचा भुर्दंड बसत असल्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत.

ठळक मुद्दे उद्योजकांना स्थिर आकार लावलेली चार महिन्यांची दिली बिले उद्योग संघटनांचे एकत्रित शिष्टमंडळ भेटणार मंत्र्यांना

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे औरंगाबादच्या उद्योगांची मागील चार महिन्यांपासून आर्थिक घडी विस्कटलेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात उद्योगांना विजेचा स्थिर आकार न लावण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र, महावितरणने स्थिर आकार लावलेली मागील चार महिन्यांची बिले दिल्यामुळे उद्योजक हादरून गेले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे २४ मार्चपासून लॉकडॉऊनची मालिका सुरू झाली. बहुतांश कामगार गावी गेले. देश-विदेशात लॉकडाऊनची परिस्थिती सारखीच असल्यामुळे ऑर्डर कमी झाल्या. अनेक उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडले. अजूनही अनेक शहरांतील बाजारपेठा उघडल्या नसल्याने येथील उद्योगांची उत्पादन क्षमता अद्यापही ५० टक्क्यांच्या वर सरकलेली नाही. दुसरीकडे, एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांत विजेच्या बिलात स्थिर आकार आकारला जाऊ नये, यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले होते. 

मात्र, आता चार महिन्यांच्या बिलासोबत महावितरणने मोठ्या प्रमाणात स्थिर आकार आकारला आहे. मोठ्या उद्योगांना प्रतिमहिना पाच लाखांपर्यंत, तर लघु, सूक्ष्म उद्योगांना दरमहा कमीत कमी २५ हजार रुपये स्थिर आकार आकारण्यात आला. चार महिन्यांचा हा स्थिर आकार तीन टप्प्यांत विभागून भरण्याच्या सूचना महावितरणने दिल्या आहेत. सध्या उद्योगांची आर्थिक घडी रुळावर आलेली नाही आणि त्यात स्थिर आकाराचा भुर्दंड बसत असल्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळातील चार महिन्यांचा विजेचा स्थिर आकार रद्द करावा, या मागणीसाठी सर्व उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, तसेच ऊर्जामंत्र्यांना भेटणार आहे. 

उद्योगांची आर्थिक स्थिती नाजूकयासंदर्भात ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे औरंगाबादचे अनेक उद्योग अखेरची घटिका मोजत आहेत. पुरेशा ऑर्डर नाहीत. कुशल कामगारांची टंचाई आहे. पूर्ण क्षमतेने बाजारपेठा सुरू नसल्यामुळे उत्पादनाला मागणी नाही. त्यामुळे उद्योगांची उत्पादन क्षमताही अर्ध्यावर आली आहे. उद्योगांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. या परिस्थितीत उद्योग बंद असलेल्या लॉकडाऊनच्या काळात उद्योगांना विजेचा स्थिर आकार लावू नये, या मागणीसंदर्भात सर्व उद्योग संटनांचे शिष्टमंडळ मंत्रिमहोदयांना या आठवड्यात भेटणार आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी