शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

महावितरणच्या ‘स्थिर आकारा’मुळे उद्योजक अस्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 14:01 IST

सध्या उद्योगांची आर्थिक घडी रुळावर आलेली नाही आणि त्यात स्थिर आकाराचा भुर्दंड बसत असल्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत.

ठळक मुद्दे उद्योजकांना स्थिर आकार लावलेली चार महिन्यांची दिली बिले उद्योग संघटनांचे एकत्रित शिष्टमंडळ भेटणार मंत्र्यांना

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे औरंगाबादच्या उद्योगांची मागील चार महिन्यांपासून आर्थिक घडी विस्कटलेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात उद्योगांना विजेचा स्थिर आकार न लावण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र, महावितरणने स्थिर आकार लावलेली मागील चार महिन्यांची बिले दिल्यामुळे उद्योजक हादरून गेले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे २४ मार्चपासून लॉकडॉऊनची मालिका सुरू झाली. बहुतांश कामगार गावी गेले. देश-विदेशात लॉकडाऊनची परिस्थिती सारखीच असल्यामुळे ऑर्डर कमी झाल्या. अनेक उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडले. अजूनही अनेक शहरांतील बाजारपेठा उघडल्या नसल्याने येथील उद्योगांची उत्पादन क्षमता अद्यापही ५० टक्क्यांच्या वर सरकलेली नाही. दुसरीकडे, एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांत विजेच्या बिलात स्थिर आकार आकारला जाऊ नये, यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले होते. 

मात्र, आता चार महिन्यांच्या बिलासोबत महावितरणने मोठ्या प्रमाणात स्थिर आकार आकारला आहे. मोठ्या उद्योगांना प्रतिमहिना पाच लाखांपर्यंत, तर लघु, सूक्ष्म उद्योगांना दरमहा कमीत कमी २५ हजार रुपये स्थिर आकार आकारण्यात आला. चार महिन्यांचा हा स्थिर आकार तीन टप्प्यांत विभागून भरण्याच्या सूचना महावितरणने दिल्या आहेत. सध्या उद्योगांची आर्थिक घडी रुळावर आलेली नाही आणि त्यात स्थिर आकाराचा भुर्दंड बसत असल्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळातील चार महिन्यांचा विजेचा स्थिर आकार रद्द करावा, या मागणीसाठी सर्व उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, तसेच ऊर्जामंत्र्यांना भेटणार आहे. 

उद्योगांची आर्थिक स्थिती नाजूकयासंदर्भात ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे औरंगाबादचे अनेक उद्योग अखेरची घटिका मोजत आहेत. पुरेशा ऑर्डर नाहीत. कुशल कामगारांची टंचाई आहे. पूर्ण क्षमतेने बाजारपेठा सुरू नसल्यामुळे उत्पादनाला मागणी नाही. त्यामुळे उद्योगांची उत्पादन क्षमताही अर्ध्यावर आली आहे. उद्योगांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. या परिस्थितीत उद्योग बंद असलेल्या लॉकडाऊनच्या काळात उद्योगांना विजेचा स्थिर आकार लावू नये, या मागणीसंदर्भात सर्व उद्योग संटनांचे शिष्टमंडळ मंत्रिमहोदयांना या आठवड्यात भेटणार आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी