शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात उत्साह तर शिवसेनेत तीव्र नाराजी

By admin | Updated: November 14, 2014 00:53 IST

जालना : सत्तापरिवर्तनात वाटा न मिळाल्याने या जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत प्रचंड निरुत्साह तर सत्तेत प्रतिनिधित्व मिळणार असल्याने भाजपात प्रचंड उत्साह संचारला आहे.

जालना : सत्तापरिवर्तनात वाटा न मिळाल्याने या जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत प्रचंड निरुत्साह तर सत्तेत प्रतिनिधित्व मिळणार असल्याने भाजपात प्रचंड उत्साह संचारला आहे. राज्याप्रमाणे या जिल्ह्यानेही १५ वर्षे काँग्रेसजनांची राजवट अनुभवली. या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तापरिवर्तन घडले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेच्याही पुढाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. लगेच अपेक्षाही उंचावल्या. २५ वर्षांपासून एकत्रितपणे निवडणुका लढविलेल्या या दोन्ही पक्षांच्या पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांना यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणे सर्वार्थाने अक्षरश: जड गेले. परंतु ऐनवेळी युती फिस्कटल्यानंतर स्वत:स कसबसे सावरत पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी परिवर्तनाच्या लाटेत स्वार होण्याचे सर्वार्थाने प्रयत्न केले. त्यात भाजपाला मोठे यश मिळाले. तर काठावर विजयीश्री खेचून शिवसेनेने प्रतिष्ठा राखली. या पार्श्वभूमीवरच निवडणुकीनंतरच का असेना एकेकाळच्या दोन्ही मित्रपक्षांत मनोमिलन व्हावे व सत्तेत वाटा मिळावा, असा सूर प्रकटला. त्यामुळेच गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींवर या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे लक्ष होते. विशेषत: भाजपाप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते बारीक लक्ष ठेवून होते. केंद्रिय मंत्रिमंडळात या जिल्ह्यास प्रतिनिधित्व मिळाल्यामुळेच सुखावलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना राज्य मंत्रिमंडळात सुद्धा प्रतिनिधित्व मिळेल, याची खात्री निर्माण झाली आहे.जिल्हाध्यक्ष तथा आमदार बबनराव लोणीकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल म्हणून समर्थकांसह कार्यकर्ते मोठ्या आत्मविश्वासात वावरत आहेत. त्याप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा भाजपा-शिवसेनेत तडजोड होईल, सत्तेत वाटा मिळेल या अपेक्षेत होते. माजीमंत्री अर्जुन खोतकर यांच्या रूपाने जिल्ह्यास कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळेलच, अशी आशा बाळगून होते. परंतु गेल्या दोन दिवसांत राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.विशेषत: या जिल्ह्यातील पाचपैकी तीन विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा झेंडा फडकला आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळात या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळेच भाजपाच्या प्राबल्यामुळे अस्वस्थता आणखी वाढली आहे. काहींनी विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेचे स्वागत केले खरे. परंतु बहुतांशी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळायला हवा होता, असे वाटत होते. ( जिल्हा प्रतिनिधी)