शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव मोहीम ‘पाट्या’ टाकणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 16:38 IST

फुटपाथवर पावलापावलांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मुख्य रस्त्यांवरून चालणेही जिकिरीचे ठरत आहे.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर राजरोसपणे अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ज्याला जिथे जागा दिसेल तेथे अतिक्रमण करून ठेवले आहे. अरुंद रस्त्यांवर वाहनांची बेकायदेशीरपणे पार्किंग करण्यात येते. फुटपाथवर पावलापावलांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मुख्य रस्त्यांवरून चालणेही जिकिरीचे ठरत आहे. या गंभीर प्रकाराकडे मनपा प्रशासन अजिबात गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. मागील चार दिवसांमध्ये मनपाने पोलिसांच्या मदतीने राबविलेली अतिक्रमण हटाव मोहीम निव्वळ पाट्या टाकणारी होती.

‘लोकमत’ने १६ नोव्हेंबरच्या अंकात शहरातील प्रमुख रस्त्यांची अतिक्रमणांमुळे कशी वाईट अवस्था झाली आहे, याचा सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला होता. याची दखल पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घेतली. त्यांनी त्वरित उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांना महापालिकेत पाठविले. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक सुरळीत राहावी, मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे असू नयेत यावर चर्चा झाली. मंगळवार, १९ नोव्हेंबरपासून कारवाईला सुरुवात करण्याचे आश्वासन मनपातर्फे देण्यात आले. यानंतर खंडपीठाने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन सुमोटो याचिका दाखल करून घेतली.

मुकुंदवाडीत झाला होता विरोधबुधवार, २० नोव्हेंबर रोजी महापालिकेने मुकुंदवाडी भाजीमंडई येथून करवाईला सुरुवात केली. रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांना मनपाच्या पथकाने हुसकावून लावले. याठिकाणी राजकीय, व्यापाऱ्यांकडून विरोध झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे मनपा अधिकाऱ्यांनी राजकीय मंडळींसमोर अक्षरश: माफी मागून कारवाई गुंडाळली. मुकुंदवाडी ते दीपाली हॉटेलपर्यंत फुटपाथवरील अतिक्रमणे सोडून देण्यात आली. जयभवानीनगर रोडवरील सर्व अतिक्रमणे जशास तशी होती. जयभवानीनगर चौकात फक्त एकमेव पानटपरी जप्त करण्याचा प्रयत्न केला. पानटपरीचालकाने डोळे वटारताच मनपाच्या पथकाने पानटपरीही सोडून दिली.

चंपाचौक ते आझाद चौकतिसऱ्या दिवशी मनपाच्या पथकाने चंपाचौक ते आझाद चौक या मुख्य रस्त्यावर कारवाईची औपचारिकता पूर्ण केली. या भागातील रस्त्याच्या मध्यभागी असलेली वाहने, हातगाड्या, व्यापाऱ्यांची मोठमोठी अतिक्रमणे याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. या भागातून सायंकाळी दुचाकी वाहनही सुरळीत नेता येत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, वाहनांची पार्किंग करण्यात येते. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून या भागातून ये-जा करावी लागते.

कारवाईपूर्वी हातगाड्यांना मनपाची सूचनाज्या रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे, त्या रस्त्यावर हातगाडीचालक, अतिक्रमणधारकांना मनपाच्या कर्मचाऱ्यांकडूनच पूर्वसूचना देण्यात येते. मनपाचे पथक दाखल होईपर्यंत हातगाडीचालक, अतिक्रमणधारक पसार होतात. मनपाचे पथक गेल्यावर परत त्याच जागेवर येऊन उभे राहतात.

सतत अतिक्रमणे झाल्यास गुन्हे दाखल कराशहरातील प्रमुख रस्त्यांवर वारंवार अतिक्रमणे होत असतील तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी सूचनाही पोलिसांनी मनपाला १६ नोव्हेंबरच्या बैठकीत केली. दिल्लीगेट येथील फर्निचर व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करू असे मनपाने नमूद केले. आजपर्यंत कोणत्याही पोलीस ठाण्यात साधा तक्रार अर्जही दिला नाही.

धोकादायक चौक कोण दुरुस्त करणारलिंक रोड टी पॉइंट, रेल्वेस्टेशन चौक, जिल्हा न्यायालय चौक, क्रांतीचौक, अमरप्रीत चौक, आकाशवाणी चौक, सेव्हन हिल चौक, जळगाव टी पॉइंट, मुकुंदवाडी, महानुभाव आश्रम चौक, महावीर चौक, मिल्ट्री हॉस्पिटल टी पॉइंट, छावणी गणपती विसर्जन टी पॉइंट, आयकर भवन टी पॉइंट, नगरनाका, हॉटेल शरद टी पॉइंट, आंबेडकरनगर चौक, हर्सूल टी पॉइंट, एमआयटी चौक, गोदावरी चौक, देवळाई चौक, केम्ब्रिज चौक. 

कुंभारवाडा कॉर्नर... गुलमंडी चौकाजवळील कुंभारवाडा कॉर्नरवर अतिक्रमणांनी ७० टक्के रस्ता व्यापला आहे. या भागात महिला खरेदीसाठी मोठ्या संख्येने दररोज दाखल होतात. पादचारी महिलांना रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण असते. त्यातच दुचाकी, चारचाकी वाहनांची येथून सतत वर्दळ असते. जीव मुठीत धरून महिला सोमवारीही खरेदी करीत होत्या.

रंगारगल्ली... जुन्या शहरातील अत्यंत गजबजलेली बाजारपेठ म्हणजे रंगारगल्ली होय. अतिक्रमणांनी या गल्लीचा ‘रंग’च उडाला आहे. महापालिकेने चार दिवसांपूर्वी या भागात मोहीम राबविली असली तरी परिस्थिती जशास तशी आहे. अतिक्रमणे एक इंचही कमी झालेली नाहीत.

निराला बाजार... शहरातील अत्यंत हायफाय मार्केट म्हणजे निराला बाजार होय. या भागातील मोठ-मोठ्या नामांकित कंपन्यांच्या शोरूमसमोर  फुटपाथच्या खाली चारचाकी वाहने अत्यंत शिस्तीत उभी असतात. वाहनांच्या या पार्किंगमुळे अर्ध्याहून अधिक रस्ता पार्किंगने व्यापला जातो. फुटपाथवर दुचाकी, रस्त्यावर चारचाकी, पादचाऱ्यांनी नेमके चालावे तरी कोठून याचे उत्तर महापालिका, वाहतूक पोलिसांनी द्यावे...?

पोलिसांनी कर्तव्य बजावले, पण...नियोजित कार्यक्रमानुसार पोलिसांनी मनपाला मोठा बंदोबस्त दिला. पहिल्या दिवशी पैठणगेट येथून कारवाईला सुरुवात झाली. टिळकपथ येथील फक्त फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. रस्त्यांवर उभी राहणारी वाहने, व्यापाऱ्यांचे अतिक्रमण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गुलमंडीवर मनपाच्या पथकाला पाहून सर्व फेरीवाले पसार झाले होते. औरंगपुरा, जि.प. कार्यालयापर्यंत मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी ४ वाजता अत्यंत वर्दळीच्या शाहगंज चमन येथे कारवाई करण्यात आली. मोजक्याच दोन ते तीन हातगाड्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मनपाचे पथक रवाना होताच अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये परिस्थिती जशास तशी झाली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबाद