शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

उड्डाणपुलाखाली अतिक्रमणे वाढली

By admin | Updated: July 20, 2015 00:51 IST

जालना : शहरातील नूतन वसाहत व भाग्यनगरसमोरील उड्डाणपूल अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असून या उड्डाणपुलाखाली दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत

जालना : शहरातील नूतन वसाहत व भाग्यनगरसमोरील उड्डाणपूल अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असून या उड्डाणपुलाखाली दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत. मात्र नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असल्याने पालिकेचा अतिक्रमण हटाव पथक गेले कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.भाग्यनगरसमोरून सुरू झालेला उड्डाणपूल नूतन वसाहतमधील तुळजाभवानी माता मंदिरासमोर संपतो. सुरूवातीला या उड्डाणपुलाखाली नगरपालिकेच्या वतीने गाळे बांधण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात याबाबतचा कोणताही निर्णय झाला नाही. भाग्यसमोरील भागात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची बेकायदा पार्किंग असते. याशिवाय छोट्या टपऱ्या, दुकाने यांचीही संख्या येथे वाढत आहे. काहींनी तर पक्के, सिमेंटचे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी नगरपालिकेत स्वतंत्र अतिक्रमण हटाव पथक तयार केल्याचे म्हटले होते. परंतु नंतर हे पथक कोठे गेले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या उड्डाणपुलासह पूर्वी ज्या-ज्या भागात अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली, त्या जवळपास सर्वच ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पंचायत समिती परिसर, संभाजी उद्यान परिसर, नवीन जालना भागातील शिवाजीपुतळा परिसर, मंठा रोड, भोकरदन रोड, अंबड रोड, औरंगाबाद रोड आदी भागांचा समावेश आहे. अंबड रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाखालून शिवनगर, कांचननगर, मम्मादेवीनगर, नुतनवसाहत, राम मंदिर परिसर आदी भागातील जनतेची ये-जा असते. परंतु या पुलाखालील अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा ठरत आहे. शिवाय पावसाळ्याच्या दिवसात याठिकाणी चिखल व पाण्याचे डबके होत असल्याने त्रास होतो. (प्रतिनिधी)याबाबत मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, शहरातील सर्वच भागातील अतिक्रमणे हटविण्यात येणार असून त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यापूर्वी नगरपालिकेने अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावलेल्या आहेत, असेही पुजारी यांनी सांगितले.