शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

नांदेड-मनमाड लोहमार्गाचे विद्युतीकरण दोन वर्षांत : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 12:12 PM

Raosaheb Danve : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची बैठक प्रथमच औरंगाबादेत घेण्यात आली.

ठळक मुद्देमराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांवर दिल्लीत बैठक घेऊ

औरंगाबाद : नांदेड ते मनमाडपर्यंतच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल ( Electrification of Nanded-Manmad railway) . दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी आहे. शिवाय, या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी जुनी आहे आणि मी याच कामाचा पाठपुरावा करीत आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांनी बुधवारी रेल्वेच्या बैठकीत सांगितले. सर्व प्रलंबित मागण्यांसाठी अधिवेशन काळात दिल्लीत मराठवाड्यातील ( Marathwada )  खासदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची बैठक प्रथमच औरंगाबादेत घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री दानवे म्हणाले, फायद्यात नसलेले रेल्वेमार्ग आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा दिला पाहिजे. त्यासाठी सर्वजण मुख्यमंत्र्यांना भेटू. बैठकीत उपस्थित खासदारांनी आपल्या मागण्या मांडल्यानंतर रावसाहेब दानवे म्हणाले, यापूर्वी खासदार म्हणून बैठकीत मुद्दे मांडत होतो. आज मंत्री म्हणून आलो आहे. मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी प्रयत्न केला जाईल. राज्य सरकारकडे काही विषय प्रलंबित आहेत. नवीन रेल्वेमार्ग आणि भुयारी मार्गांच्या कामात राज्याचा वाटा असतो.

मुदखेड - परभणी काम पूर्ण‘एससीआर’च्या अधिकार क्षेत्रात महाराष्ट्रासाठी ४ हजार २६४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या कामांमध्ये २६३ कि.मी. दुहेरी लाईन, ४२ कि.मी. तिसरी लाईन आणि ९३० किलोमीटरच्या विद्युतीकरणाचा समावेश आहे. ८१ किलोमीटर लांबीच्या मुदखेड-परभणीदरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. यावेळी दानवे म्हणाले, अकोला-अकोटदरम्यान ४३ कि.मी. गेज रूपांतराचे कामही पूर्ण झाले आहे. ३४ कि.मी. अंतरासाठी अकोला-लोहगडदरम्यान विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. भारतीय रेल्वे सुरक्षेशी संबंधित पायाभूत कामांना प्राधान्य देते. ज्यात भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल यांचा समावेश आहे. औरंगाबादेतील शिवाजीनगर रेल्वेगेटवर कॉस्ट शेअरिंग तत्त्वावर भुयारी मार्ग केला जाईल. बीड-परळीदरम्यान ३० कि.मी. अंतरासाठी नवीन रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे आणि चालू आर्थिक वर्षात ३० किलोमीटरचा आणखी एक भाग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असेही दानवे म्हणाले.

औरंगाबाद-चाळीसगाव हा मार्ग फायद्याचा नाहीपॅसेंजर रेल्वे फायद्यात नाही; कारण एक रुपया खर्च केल्यानंतर ४८ पैशांचे नुकसान होते. हे नुकसान मालवाहतुकीतून भरून काढले जाते. मात्र, चाळीसगाव येथे मालवाहतूक नसल्याने औरंगाबाद-चाळीसगाव हा मार्ग फायद्याचा नाही. त्यासाठी राज्य सरकारने वाटा वाढवून दिला तरच शक्य होईल. राज्यानुसार झोन झालेले नाहीत. नांदेड विभाग मध्य रेल्वेतून काढण्यासाठी रेल्वे बोेर्डाशी चर्चा केली जाईल. पुण्याला जाण्यासाठी नांदेडहून रेल्वे सुरू केली जाईल, असे दानवे म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा