शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रावर विजेचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:33 IST

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत.

ठळक मुद्देदररोज होतो वीजपुरवठा खंडित : उद्योजक त्रस्त, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार सुरू

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत. तसे झाले तर औरंगाबादेत औद्योगिकीकरणाची सुरुवात करणारे पहिले औद्योगिक क्षेत्र नामशेष होण्याची चिंता ‘मसिआ’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.उद्योगांना वीजपुरवठा ही सर्वात महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. औद्योगिक क्षेत्रात उद्योगांना महावितरणकडून ही सुविधा पुरविली जाते. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात मुख्यत: रेडियंट अ‍ॅग्रो, इंडस्ट्रियल १ व २, एलोरा या फिडरवरील वीजपुरवठा गेल्या दोन वर्षांपासून दररोज तासन्तास खंडित होत आहे. हे फिडर खंडित वीजपुरवठ्यासाठी आता प्रसिद्ध झाले आहेत. या फिडर्सवरील ट्रान्सफॉमर्स, केबल्स, वीजवाहिन्या या अत्यंत जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्या वारंवार नादुरुस्त होतात आणि वीजपुरवठा बंद होतो. यातून या फिडरवर जोडलेले उद्योग दररोज किमान २ ते ३ तास बंद पडतात. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होते. यंत्रसामग्रीचेही नुकसान होते. या सगळ्या परिस्थितीत कामगारांचे वेतन मात्र, द्यावेच लागते. त्यामुळे उद्योगांना दोन्ही बाजंूनी आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. या समस्येमुळे येथील उद्योग इतरत्र हलविण्याचा विचारही उद्योजक करीत आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या समस्येक डे गांभीर्याने लक्ष द्यावे. भविष्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि येथील उद्योगांची या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी ‘मसिआ’चे अध्यक्ष ज्ञानदेव राजाळे, माजी अध्यक्ष किशोर राठी, पदाधिकारी अभय हंचनाळ, मनीष अग्रवाल, सचिन गायके, राजेंद्र चौधरी, भगवान राऊ त, विक्रम डेकाटे, कुंदन रेड्डी आदींनी केले आहे.वीजपुरवठ्यानुसार कामाचे नियोजनचिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी ‘मसिआ’ संघटना गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. प्रत्येक वेळी अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन मिळते; परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिणामी, वीज खंडित होईल, हे गृहीत धरूनच दिवसभराच्या कामाचे नियोजन करावे लागत आहे. त्यातून अपेक्षित उत्पादन होत नाही. पायाभूत सुविधांअभावी चिक लठाणा औद्योगिक वसाहतीची वाताहत होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण