शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रावर विजेचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:33 IST

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत.

ठळक मुद्देदररोज होतो वीजपुरवठा खंडित : उद्योजक त्रस्त, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार सुरू

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत. तसे झाले तर औरंगाबादेत औद्योगिकीकरणाची सुरुवात करणारे पहिले औद्योगिक क्षेत्र नामशेष होण्याची चिंता ‘मसिआ’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.उद्योगांना वीजपुरवठा ही सर्वात महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. औद्योगिक क्षेत्रात उद्योगांना महावितरणकडून ही सुविधा पुरविली जाते. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात मुख्यत: रेडियंट अ‍ॅग्रो, इंडस्ट्रियल १ व २, एलोरा या फिडरवरील वीजपुरवठा गेल्या दोन वर्षांपासून दररोज तासन्तास खंडित होत आहे. हे फिडर खंडित वीजपुरवठ्यासाठी आता प्रसिद्ध झाले आहेत. या फिडर्सवरील ट्रान्सफॉमर्स, केबल्स, वीजवाहिन्या या अत्यंत जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्या वारंवार नादुरुस्त होतात आणि वीजपुरवठा बंद होतो. यातून या फिडरवर जोडलेले उद्योग दररोज किमान २ ते ३ तास बंद पडतात. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होते. यंत्रसामग्रीचेही नुकसान होते. या सगळ्या परिस्थितीत कामगारांचे वेतन मात्र, द्यावेच लागते. त्यामुळे उद्योगांना दोन्ही बाजंूनी आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. या समस्येमुळे येथील उद्योग इतरत्र हलविण्याचा विचारही उद्योजक करीत आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या समस्येक डे गांभीर्याने लक्ष द्यावे. भविष्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि येथील उद्योगांची या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी ‘मसिआ’चे अध्यक्ष ज्ञानदेव राजाळे, माजी अध्यक्ष किशोर राठी, पदाधिकारी अभय हंचनाळ, मनीष अग्रवाल, सचिन गायके, राजेंद्र चौधरी, भगवान राऊ त, विक्रम डेकाटे, कुंदन रेड्डी आदींनी केले आहे.वीजपुरवठ्यानुसार कामाचे नियोजनचिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी ‘मसिआ’ संघटना गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. प्रत्येक वेळी अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन मिळते; परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिणामी, वीज खंडित होईल, हे गृहीत धरूनच दिवसभराच्या कामाचे नियोजन करावे लागत आहे. त्यातून अपेक्षित उत्पादन होत नाही. पायाभूत सुविधांअभावी चिक लठाणा औद्योगिक वसाहतीची वाताहत होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण