शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा

By विकास राऊत | Updated: May 17, 2024 14:02 IST

मराठवाड्याच्या ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा; १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रणधुमाळीचा धुराळा खाली बसला आहे. निवडणूक यंत्रणेत प्रशासकीय यंत्रणा आणि उमेदवारांच्या प्रचारात राजकीय नेते गुंतल्यामुळे विभागातील दुष्काळाकडे कुणीही पाहिले नाही. टँकरच्या मंजुरीचा सपाटा मागील दीड महिन्यात लावल्यामुळे सुमारे १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर भागत आहे. रणधुमाळी संपली असून, आता शासन आणि प्रशासनाने टंचाई निवारणासाठी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

मराठवाड्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. मेच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १२ लाख ग्रामस्थांना टँकरचा पाणीपुरवठा सुरू होता. १५ दिवसांत ३३४ टँकर वाढले आहेत, तर तीन लाख ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. टँकर वेळेत गेले नाहीत तर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांच्याकडून पाणीटंचाईचा मध्यंतरी आढावा घेतला होता.

दुष्काळाच्या झळा, पण भाषणे उणीदुणी काढणारीनिवडणूक रणधुमाळीत दुष्काळाचा टक्का वाढला. सध्या ११९३ गावे आणि ४५५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. १५ दिवसांत २३२ गावे, ११० वाड्या, ६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले. तीन लाख नागरिक दुष्काळाच्या रेट्याखाली आले. ३३४ टँकरची संख्या वाढली. निवडणुकीच्या रणधुमाळीत पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव ही मुद्दे पूर्णत: गायब होते. फक्त उणीदुणी काढणाऱ्या भाषणांमुळेच मतदारांचे मनोरंजन केले.

जलसाठे आटत आहेत...विभागातील जलसाठे आटू लागले. मोठे ११, मध्यम ७५, लघु ७४९, बंधारे ४२ मिळून ८७७ प्रकल्पांत सद्य:स्थितीत सुमारे १०.३३ टक्के पाणी आहे. अनेक मध्यम व लघुप्रकल्प आटले आहेत.

१०९ वरून १७५८ वर गेला आकडा...जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९, तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर पोहोचली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १७५८ वर टँकरचा आकडा गेला.

६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले....प्रशासनाने विभागातील २०८३ विहिरींचे अधिग्रहण केले होते. त्यात ६५१ विहिरींची संख्या वाढली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३४६, जालना ४६८, परभणी १५८, हिंगोली १००, बीड ३९२, नांदेड १६९, लातूर ३३३, तर धाराशिव जिल्ह्यात ८१३ विहिरींचे अधिग्रहण केले. टँकरसाठी ९००, टँकर व्यतिरिक्त १८३४ अशा २७३४ विहिरींचे अधिग्रहण केले.

जिल्हानिहाय टँकर संख्याछत्रपती संभाजीनगर.......... ६७८जालना.......... ४८८परभणी.............१४हिंगोली ..........०२नांदेड.............. २१ बीड ..............३९९लातूर........... २५धाराशिव........... १३१एकूण ...........१७५८

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबाद