शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

मराठवाड्यातील निवडणूक रणधुमाळी संपली, आता मोर्चा पाणीटंचाईकडे वळावा

By विकास राऊत | Updated: May 17, 2024 14:02 IST

मराठवाड्याच्या ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा; १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रणधुमाळीचा धुराळा खाली बसला आहे. निवडणूक यंत्रणेत प्रशासकीय यंत्रणा आणि उमेदवारांच्या प्रचारात राजकीय नेते गुंतल्यामुळे विभागातील दुष्काळाकडे कुणीही पाहिले नाही. टँकरच्या मंजुरीचा सपाटा मागील दीड महिन्यात लावल्यामुळे सुमारे १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरवर भागत आहे. रणधुमाळी संपली असून, आता शासन आणि प्रशासनाने टंचाई निवारणासाठी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

मराठवाड्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. मेच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १२ लाख ग्रामस्थांना टँकरचा पाणीपुरवठा सुरू होता. १५ दिवसांत ३३४ टँकर वाढले आहेत, तर तीन लाख ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. टँकर वेळेत गेले नाहीत तर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांच्याकडून पाणीटंचाईचा मध्यंतरी आढावा घेतला होता.

दुष्काळाच्या झळा, पण भाषणे उणीदुणी काढणारीनिवडणूक रणधुमाळीत दुष्काळाचा टक्का वाढला. सध्या ११९३ गावे आणि ४५५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. १५ दिवसांत २३२ गावे, ११० वाड्या, ६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले. तीन लाख नागरिक दुष्काळाच्या रेट्याखाली आले. ३३४ टँकरची संख्या वाढली. निवडणुकीच्या रणधुमाळीत पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव ही मुद्दे पूर्णत: गायब होते. फक्त उणीदुणी काढणाऱ्या भाषणांमुळेच मतदारांचे मनोरंजन केले.

जलसाठे आटत आहेत...विभागातील जलसाठे आटू लागले. मोठे ११, मध्यम ७५, लघु ७४९, बंधारे ४२ मिळून ८७७ प्रकल्पांत सद्य:स्थितीत सुमारे १०.३३ टक्के पाणी आहे. अनेक मध्यम व लघुप्रकल्प आटले आहेत.

१०९ वरून १७५८ वर गेला आकडा...जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९, तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर पोहोचली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १७५८ वर टँकरचा आकडा गेला.

६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले....प्रशासनाने विभागातील २०८३ विहिरींचे अधिग्रहण केले होते. त्यात ६५१ विहिरींची संख्या वाढली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३४६, जालना ४६८, परभणी १५८, हिंगोली १००, बीड ३९२, नांदेड १६९, लातूर ३३३, तर धाराशिव जिल्ह्यात ८१३ विहिरींचे अधिग्रहण केले. टँकरसाठी ९००, टँकर व्यतिरिक्त १८३४ अशा २७३४ विहिरींचे अधिग्रहण केले.

जिल्हानिहाय टँकर संख्याछत्रपती संभाजीनगर.......... ६७८जालना.......... ४८८परभणी.............१४हिंगोली ..........०२नांदेड.............. २१ बीड ..............३९९लातूर........... २५धाराशिव........... १३१एकूण ...........१७५८

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबाद