शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

मी पाहिलेली निवडणूक....एक रुपया खर्च न करता बनलो आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 7:35 PM

या गटबाजीमध्ये काँग्रेसकडून जाहीर झालेले तिकीट ऐनवेळी रद्द केले.

१९७०  च्या दशकात यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांचे गट तुल्यबळ होते. या गटबाजीमध्ये काँग्रेसकडून जाहीर झालेले तिकीट ऐनवेळी रद्द केले. या झालेल्या मानहानीच्या बदल्यात काँग्रेसने अवघ्या महिनाभरात विधान परिषदेवर संधी देत एक रुपयाही खर्च न करता आमदार बनविले.

गंगापूर तालुक्यात काही युवकांना एकत्र करत शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी एका संस्थेची नोंदणी केली. या संस्थेच्या उद्घाटनासाठी विखे पाटील यांना बोलावले. कार्यक्रम झोकात झाला. शहरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९७१ साली भूविकास बँकेच्या निवडणुकीला उभे राहण्यास अनेकांनी गळ घातली. तेव्हा प्रस्थापित बाळासाहेब पवार गंगापूरचे आमदार होते. भूविकास बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसने चंद्रभान पाटील नांदेडकर यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मला १४०० मते मिळाली. नांदेडकरांना अवघी ७०० मते पडली. या निवडणुकीसाठी १७ रुपये खर्च आला होता. विजयी झाल्यामुळे गंगापूर तालुका काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला. तालुकाध्यक्षपद मिळाले.

माणिकदादा पालोदकर हे यशवंतराव चव्हाण गटाचे होते. आम्ही यशवंतराव चव्हाण गटात सामील झालो, तर बाळासाहेब पवार, अप्पासाहेब नागदकर हे शंकरराव चव्हाण गटाचे. १९७२ मध्ये जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत २६ जानेवारी १९७२ या दिवशी गंगापूर विधानसभेसाठी बाळासाहेब पवार यांचे तिकीट कापून मला उमेदवारी दिली. यासाठी तालुका, जिल्हा, प्रदेश आणि केंद्रीय कार्यकारिणीने माझ्याच नावाची शिफारस केली होती. मात्र, मराठवाड्यात शंकरराव चव्हाण यांचे न ऐकता उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे तक्रार करून राज्यातील पाच जणांचे तिकीट रद्द करण्यास भाग पाडले. त्यात माझाही क्रमांक होता. १ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास निघालो असताना उमेदवारी रद्द झाल्याचे समजले. ही रद्द केलेली उमेदवारी बाळासाहेब पवार यांना देण्यात आली. गंगापूर तालुक्यात यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला. अनेकांनी अपक्ष लढण्यासाठी गळ घातली. लोकवर्गणी करण्यास सुरुवात केली. मात्र, काँग्रेसने घेतलेला निर्णय मान्य करून बंडखोरी करण्यास मी ठाम नकार दिला. आक्रमक समर्थकांचे ऐकले नाही. तेव्हा बाळासाहेब पवार यांनीही कौतुक केले. या जागेवर बाळासाहेब पवार जिंकले.

पुढे महिनाभराने विधान परिषदेचे नऊ आमदार सेवानिवृत्त होत होते. त्यात उमेदवारी रद्द केलेल्या सर्वांना आमदार बनविण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घेतला. ७ एप्रिल १९७२ रोजी विधान परिषदेचा आमदार झालो. एकही रुपया खर्च आला नाही. तेव्हा अप्पासाहेब नागदकर यांना सोबत घेऊन सर्व आमदारांची ओळख करून दिली. प्रत्येक बारीकसारीक गोष्टी समजून सांगितल्या. १९७८ पर्यंत विधान परिषदेचा आमदार होतो. याच काळात आणीबाणी लागली होती. पुढे काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. यशवंतराव चव्हाणांसह अनेकजण जुन्या काँग्रेसमध्ये कायम राहिले. इंदिरा काँग्रेसमध्ये अनेकांनी जाण्यास नकार दर्शविला. तेव्हा जुन्या काँग्रेसकडून गंगापूर विधानसभेसाठी तिकीट मिळाले.

जिल्ह्यातून जुन्या काँग्रेसचा एकमेव निवडून आलो. बाळासाहेब पवार, माणिकदादा पालोदकर अशा दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. मात्र, वर्षभराच्या आतच शरद पवार यांनी स्वतंत्र चूल मांडत जनता दलाच्या सहकार्याने वसंतदादाचे सरकार पाडले. तेव्हा जिल्ह्यातून शरद पवार यांच्यासोबत गेलेला एकमेव आमदार होतो. पुढे इंदिरा गांधी यांनी बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील शरद पवार यांचे सरकार बरखास्त करून टाकले. यामुळे आमची पाच वर्षांची आमदारकी अवघ्या दोन वर्षातच संपली. पुढील निवडणुकीत माझाही पराभव झाला. तेव्हापासून राजकारणापासून दुरावलो ते दुरावलोच. आमदारकी संपली तेव्हा अवघी ३५० रुपये पेन्शन मिळत होती. आता हीच पेन्शन ६० हजार रुपये मिळते. यातच समाधान आहे.

शब्दांकन : राम शिनगारे

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक