शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

‘शंभर आमदार निवडून आणा, आरक्षण वाचवा’ - ॲड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 07:18 IST

आंबेडकर म्हणाले, आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मताने लढली गेली पाहिजे. डोक्याने लढली गेली पाहिजे. या वेळेसचे मत आरक्षण वाचवणाऱ्यालाच दिले पाहिजे. कारण, दुसरीकडे मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणण्याचे घोषित करण्यात आलेले आहेच. 

छत्रपती संभाजीनगर : येथील ‘शंभर आमदार निवडून आणा आणि आरक्षण वाचवा’, असे आवाहन बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपानिमित्त आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेत केले. याचवेळी त्यांनी, आम्ही काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेमुळे राज्यात शांतता निर्माण झाली, गावागावांमधली दहशत संपली, असा दावा करीत, तयारीसाठी आम्हाला वेळ मिळू नये, म्हणून विधानसभा निवडणुका कदाचित दिवाळीआधी होतील, असे भाकीतही वर्तवले.

आंबेडकर म्हणाले, आरक्षणाची लढाई ही रस्त्यावर नव्हे, तर विधानसभेत लढली गेली पाहिजे. मताने लढली गेली पाहिजे. डोक्याने लढली गेली पाहिजे. या वेळेसचे मत आरक्षण वाचवणाऱ्यालाच दिले पाहिजे. कारण, दुसरीकडे मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणण्याचे घोषित करण्यात आलेले आहेच. 

ओबीसींच्या बासरीतून मनोज जरांगे यांचे सूर-मनोज जरांगे पाटील ओबीसींच्या बासरीतून सूर काढीत आहेत. -त्यांच्या माध्यमातून निजामी मराठ्यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत ‘ना रहेगी बास, ना रहेगी बासुरी’ हे धोरण ठरवलेले आहे.-जरांगे निवडणुका लढवणार की नाही, हे २९ ऑगस्टला स्पष्ट होईल; पण माझे म्हणणे आहे की, त्यांनी विधानसभा लढवावीच.-त्यामुळे निजामी मराठ्यांना अद्दल घडू शकेल, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीreservationआरक्षण