शिक्षण विभागाचे कच्चे ‘अकाऊंट’
By Admin | Updated: January 6, 2015 01:12 IST2015-01-06T00:42:53+5:302015-01-06T01:12:06+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अकाऊंट फारच कच्चे व सुमार दर्जाचे आहे. शिक्षण विभागाने केलेल्या खर्चावर अंकेक्षण (आॅडिट) विभागाने

शिक्षण विभागाचे कच्चे ‘अकाऊंट’
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अकाऊंट फारच कच्चे व सुमार दर्जाचे आहे. शिक्षण विभागाने केलेल्या खर्चावर अंकेक्षण (आॅडिट) विभागाने उपस्थित केलेल्या आक्षेपांची (आॅडिट पॅरे) संख्या आता तब्बल २४०० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे चक्क जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनचे आक्षेप अद्यापही निराकरणाविना पडून आहेत. दरवर्षी आक्षेप तुंबत चालले आहेत.
सरकारी विभागांनी सरकारी निधीचा केलेला वापर नियमानुसार आहे की, नाही हे तपासण्याची जबाबदारी अंकेक्षण विभागाची आहे. हा आॅडिट विभाग संबंधित सरकारी विभागाने खर्च केलेल्या निधीची समीक्षा करून त्यातील चुका शोधून काढत असतो. जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर १९६५ पासून झालेल्या अंकेक्षणामध्ये आॅडिट विभागाने काही शिक्षण विभागाच्या खर्चावर आक्षेप उपस्थित केलेले आहेत. परंतु त्या आक्षेपांचे निराकरण तत्कालीन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे दरवर्षी या आक्षेपांची संख्या वाढत गेली आहे.
सध्या ही संख्या २४०० वर गेली आहे. या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी दरवर्षी विशेष शिबिरे घेतली जातात. त्यातही या आक्षेपांचे निराकरण झालेले नाही.
जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काही आॅडिट पॅरे पडून आहेत. या वर्षी ही संख्या २४०० वर गेली होती; परंतु आम्ही मागील काही दिवसांत १२४ आक्षेपांवरील त्रुटी पूर्ण केल्या आहेत. हे आक्षेप अगदी किरकोळ स्वरूपाचे आहेत व त्यातील बहुतांश आक्षेपांवरील खुलासा आपण लवकरच करून हे आक्षेप निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- एम. के. देशमुख, जिल्हा शिक्षणाधिकारी, औरंगाबाद.