शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

औरंगाबाद बाजार समितीमध्ये येत्या सोमवारपासून धान्याचा ई-लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 7:38 PM

शेतीमालास चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘ई-नाम’ची अंमलबजावणी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे.

औरंगाबाद : शेतीमालास चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘ई-नाम’ची अंमलबजावणी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे. या अंतर्गत येत्या सोमवार, १२ मार्चपासून प्रत्यक्षात धान्याचा ई-लिलाव (हर्राशी)ला सुरुवात होणार आहे. अडत्याने किंवा खरेदीदाराने परस्पर शेतीमाल खरेदी केला, तर कारवाई करण्यात येणार आहे. 

केंद्र शासनाची राष्ट्रीय कृषी बाजार योजना राबविण्यासाठी राज्यातील ६० बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या ३० मध्ये जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी आणलेल्या शेतीमाल खरेदीत स्पर्धा निर्माण व्हावी, शेतीमाल खरेदी केल्यावर लगेच संबंधित  शेतकर्‍याच्या बँक खात्यात सर्व रक्कम जमा व्हावी, या उद्देशाने ‘ई-नाम’ योजना सुरू करण्यात आली आहे.

जाधववाडीतील बाजार समितीमध्ये यासाठी खास टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. मागील दोन ते तीन आठवड्यांपासून येथील प्रशिक्षित कर्मचार्‍यांनी धान्य, कडधान्याची तपासणी करणे, ग्रेडिंग करणे व ई-नाम पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम केले. आता प्रत्यक्षात ई-लिलाव करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतेच बाजार समितीने सर्व अडते व खरेदीदारांना ‘परिपत्रक’ पाठविले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की, १२ मार्चपासून बाजार समितीतील धान्याच्या अडत बाजारात येणार्‍या प्रत्येक शेतीमाल व शेतकर्‍याची नोंद करण्यात येणार आहे. यानंतर सर्व शेतकर्‍यांच्या शेतीमालाने भरलेल्या गाड्या सेल हॉल क्र. २ येथे आणण्यात येतील. येथेच ई-लॅब असणार आहे. तिथेच धान्याचे नमुने घेऊन त्याचे ग्रेडिंग करण्यात येईल व माहिती ई-नाम पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्यानुसार खरेदीदारांना ई-लिलावाद्वारे शेतीमाल खरेदी करावा लागेल. तोंडी हर्राशी सोमवारपासून बंद होणार आहे. ज्यांच्या बँक खात्यात जेवढी रक्कम असेल तेवढ्याच किमतीचा शेतीमाल खरेदीची मुभा देण्यात येईल. माल खरेदी करताच खरेदीदारांच्या खात्यातून रक्कम शेतकर्‍याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. परस्पर शेतीमाल खरेदी करताना कोणी आढळून आले तर त्या खरेदीदारावर कारवाई करण्यात येईल. 

अडत्या, खरेदीदारांची बैठक ‘ई-नाम’चे परिपत्रक मिळताच मंगळवारी औरंगाबाद अडत व्यापारी संघटनेची तातडीची बैठक जाधववाडीत पार पडली. ई-नाममध्ये अडत्यांना कोणतेच स्थान नसल्याने अडत्यांनी काय करावे, असा संतप्त सवाल यावेळी व्यक्त करण्यात आला. ई-नाम लागू करण्यात अनेक अडचणी आहेत. यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांनी आणलेला शेतीमाल अडत्याकडेच उतरविण्यात यावा, तिथेच हर्राशी करण्यात यावी, आदी सूचना यावेळी मांडण्यात आल्या. यासंदर्भात बाजार समितीला अडत्या व खरेदीदारांतर्फे  निवेदन देण्यात येणार आहे. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल, दिलीप गांधी, हरीश पवार, मधुकर निकम, राजेंद्र बादशहा, कैलास निकम, विजय पांडे, मुकेश गंगवाल, जुगलकिशोर दायमा आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Farmerशेतकरी