शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

पावसाळ्यातही अनेक गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:46 PM

पावसाळ्यातही वाळूज महानगरातील अनेक गावे तहानलेलीच असून, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाळूज महानगर : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जलस्त्रोत कोरडेच आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही वाळूज महानगरातील अनेक गावे तहानलेलीच असून, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशीच परिस्थिती रहिली तर येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा सुरु होवून दीड महिना होत आला आहे. तरीही अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. केवळ दोन-तीन वेळाच बºयापैकी पाऊस झाला आहे. परंतू या झालेल्या पावसामुळे अजून जमिनीची तहानही भागलेली नाही. त्यामुळे दरवर्षी या वेळेत २५ ते ३० टक्के साठा होणारे पाझर तलाव, धरणे अजूनही कोरडेच आहेत.

त्यामुळे मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणारी वाळूज महानगरातील अनेक गावे पावसाळ्यातही तहानलेलीच आहेत. महानगरातील सिडको वाळूज महानगरासह पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी, कमळापूर, विटावा, घाणेगाव आदी गावांतील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून यातील काही गावांना स्थानिक प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीने पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. या पाणी कपातीच्या धोरणामुळे स्थानिक ग्रामपंचायतीही संकटात सापडल्या असून, गावाला पाणीपुरवठा करताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यातून बहुतांशी ग्रामपंचायतीला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तर भीषण पाणीटंचाईअर्धा पावसाळा संपत आला आहे. परंतू अजून चांगला पाणीसाठा होईल असा मोठा पाऊस झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात सुरुवातीच्या एक ते दीड महिन्यात पाझर तलाव, धरणे, नाल्यात बºयापैकी साठा होतो. पण यावर्षी एकाही तलावात, धरणा पाणी साठा झालेला नाही. यंदा जमिनीतील पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. जर काही दिवसांत मोठा पाऊस झाला नाही. तर नागरिकांसह जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.----------------------------------------------

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात