शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके धोक्यात

By admin | Updated: July 28, 2014 00:58 IST

विष्णू वाकडे, कारला कारला : जालना तालुक्यातील कारला भाटेपुरी परिसरात पावसाळा सुरू होऊनही दोन महिने उलटले तरीही समाधानकारक पाऊस झाला नाही.

विष्णू वाकडे, कारलाकारला : जालना तालुक्यातील कारला भाटेपुरी परिसरात पावसाळा सुरू होऊनही दोन महिने उलटले तरीही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी खरिपाची पिके तसेच ऊस व मोसंबी बागांचे पाण्याअभावी अतोनात नुकसान होत आहे. कारला, हातवण, वडीवाडी, थेरगाव, हिवरा, दोषणगाव, ममदाबाद, भाटेपुरी, माळीपिंपळगाव सह परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.जिल्ह्यात इतरत्र तालुक्यात थोडाबहुत पाऊस पडला. त्यावेळी सुध्दा या भागात पावसाने हुलकावणी दिली. सुरूवातीस अगदी मोजक्याच पावसावर ७ ते ८ जुलै रोजी खरिपाच्या पेरण्या झाल्या. परंतु पावसाने मोठी दडी मारल्याने झालेली पेरणी बहुतांश भागात वाया गेली. गेल्या तीन दिवसांत पुन्हा रिमझिम पाऊस झाल्याने हतबल झालेल्या बळीराजाने दुबार पेरणीस सुरूवात केली.कारला भाटेपुरी परिसरात बारामही बागायती पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मोसंबी तसेच उसाचे उत्पन्न या भागात जास्त आहे. मे महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्याने आता पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. कुंडलिका नदीला अद्याप एकही पूर तर सोडाच पाणीसुध्दा वाहून गेले नाही. पाण्याचे स्त्रोत फक्त विहिरी असल्याने परिसरात मोठी समस्या निर्माण होत आहे. विहिरी तसेच कूपनलिकांची पाणी पातळी खोलवर गेली आहे. परिणामी मोसंबी चिकु, यांच्यासह उसाचे पीकही धोक्यात आले आहे.शेतकरी गंगाधर सांगोळे यांनी सांगितले की, जिथे दोन कापसाच्या पिकामध्ये लागवड होत होती तेथे आता चार ते पाच पिशव्या कपाशीचे बियाणे लागले. मूग, उडीद, सोयाबीन यांची पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागल्याचे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करावी लागल्याचे ते म्हणाले. ऊस उत्पादक यशवंत देशमुख यांनी सांगितले की, सूक्ष्मसिंचनाचा उपयोग करून कसाबसा ऊस आतापर्यंत टिकून ठेवला. परंतु दुष्काळी परिस्थितीने पाण्याची पातळी खालावली. त्यामुळेच उसाचे पीक सुध्दा धोक्यात आले. मोसंबी उत्पादक अशोकराव गायकवाड, सुभाषराव गायकवाड यांनी सांगितले की, मोसंीच्या झाडावर आंबे बहाराच्या मोसंब्या असून फळबागेस पाण्याची नितांत गरज आहे. हात तोंडाशी आलेले पीक कसे पुर्णत्वास जाईल याची चिंता वाटत आहे.शिवाय झाडास सध्या मिळत असलेल्या ताणाने मोसंबीच्या झाडास धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच पावसाअभावी खरीप तर धोक्यात आले आहेच; शिवाय फळबागा व उसाचे पीकही संकटात सापडले आहे. परिणामी शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक संकट कोसळल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.