शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

बाबासाहेबांच्या राष्ट्रवादामुळेच दलित नक्षलवाद नाही

By admin | Updated: April 14, 2016 00:59 IST

उस्मानाबाद : बाबासाहेबांचा राष्ट्रवाद दलितमुक्तीपासून सुरू होवून मानवमुक्तीपर्यंत जातो. त्यांनी आयुष्यभर सर्वप्रथम या देशाच्या हिताचा विचार केला

उस्मानाबाद : बाबासाहेबांचा राष्ट्रवाद दलितमुक्तीपासून सुरू होवून मानवमुक्तीपर्यंत जातो. त्यांनी आयुष्यभर सर्वप्रथम या देशाच्या हिताचा विचार केला. त्यांच्या या शंभर नंबरी राष्ट्रवादामुळेच देशात दलित नक्षलवाद निर्माण झाला नाही. याबाबत बाबासाहेबांचे आपण ऋण व्यक्त केले पाहिजेत, असे सांगत शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झटणाऱ्या बाबासाहेबांचे ‘मॉडेल’ सध्याच्या राजकारण्यांनी स्वीकारण्याची आवश्यकता असून, ते मॉडेल राजकारणी स्वीकारणार नसतील तर त्यांना बाबासाहेबांच्या तसबिरीला हार घालण्याचाही अधिकार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचच्या वतीने बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान’ या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दुसरे पुष्प गुंफले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत तानाजी ठोंबरे होते. डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती यावर्षी ‘युनो’च्या माध्यमातून जगभर साजरी होत आहे. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सबनीस यावेळी म्हणाले. बाबासाहेबांच्या कतृत्वाची लांबी-रूंदी मोजता येणार नाही. मात्र, एकच माणूस अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कामगार नेता, मजुरांचा कैवारी, घटनातज्ज्ञ यासह इतर बाबीत प्रवीण होता. त्यांच्या या इतर पैलूंचाही अभ्यास होण्याची गरज आहे. हिंदू स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांना रोखण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडले. याचबरोबर देशातील ओबीसी समाजबांधवांना सवलती मिळवून देण्यासाठी आयोग स्थापन करण्याची मागणी केली. मात्र, या दोन्ही बाबी सरकारने मान्य न केल्याने बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९३५ पर्यंत आंबेडकर हिंदू होते, मात्र बाबासाहेबांचा हिंदूनिष्ठ समतावाद मान्य केला नाही त्यामुळेच त्यांनी धर्मांतर केल्याचे सांगत धर्माच्या नावावर ज्यांनी बाबासाहेबांसह सात कोटी जनतेला त्रास दिला, त्यांना धडा शिकवायचा ठरविले असते तर त्यांनी बुध्द धम्माऐवजी इतर धर्म स्वीकारला असता. मात्र, बुध्द धम्मात प्रवेश करून त्यांनी सूडचक्र थांबविल्याचेही सबनीस यावेळी म्हणाले. बाबासाहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचा कैवार घेतला. कोकणातील खोती प्रथेविरूध्द काढलेला मोर्चा हे त्याचेच प्रतिक होते. परंतु, देशातील शेतकरी नेत्यांनाही बाबासाहेब समजले नसल्याचे सांगत आजच्या राजकारण्यांनी आंबेडकरांच्या शेतीविषयक धोरणांचा अभ्यास करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही वर्षात राजकारण्यांच्या खाबुगिरीमुळे १७७ साखर कारखाने आजारी पडले असून, ४२ कारखाने विकण्यात आले आहेत. तर २७ विक्रीच्या तयारीत आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा शेतकऱ्यांची मुले म्हणविणाऱ्या राजकारण्यांनीच केल्याचे सांगत राजकारणी अशा पध्दतीने वागणार असतील तर या देशातील शेतकरी जगणार कसा, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)