शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या राष्ट्रवादामुळेच दलित नक्षलवाद नाही

By admin | Updated: April 14, 2016 00:59 IST

उस्मानाबाद : बाबासाहेबांचा राष्ट्रवाद दलितमुक्तीपासून सुरू होवून मानवमुक्तीपर्यंत जातो. त्यांनी आयुष्यभर सर्वप्रथम या देशाच्या हिताचा विचार केला

उस्मानाबाद : बाबासाहेबांचा राष्ट्रवाद दलितमुक्तीपासून सुरू होवून मानवमुक्तीपर्यंत जातो. त्यांनी आयुष्यभर सर्वप्रथम या देशाच्या हिताचा विचार केला. त्यांच्या या शंभर नंबरी राष्ट्रवादामुळेच देशात दलित नक्षलवाद निर्माण झाला नाही. याबाबत बाबासाहेबांचे आपण ऋण व्यक्त केले पाहिजेत, असे सांगत शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झटणाऱ्या बाबासाहेबांचे ‘मॉडेल’ सध्याच्या राजकारण्यांनी स्वीकारण्याची आवश्यकता असून, ते मॉडेल राजकारणी स्वीकारणार नसतील तर त्यांना बाबासाहेबांच्या तसबिरीला हार घालण्याचाही अधिकार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचच्या वतीने बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान’ या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दुसरे पुष्प गुंफले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत तानाजी ठोंबरे होते. डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती यावर्षी ‘युनो’च्या माध्यमातून जगभर साजरी होत आहे. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सबनीस यावेळी म्हणाले. बाबासाहेबांच्या कतृत्वाची लांबी-रूंदी मोजता येणार नाही. मात्र, एकच माणूस अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कामगार नेता, मजुरांचा कैवारी, घटनातज्ज्ञ यासह इतर बाबीत प्रवीण होता. त्यांच्या या इतर पैलूंचाही अभ्यास होण्याची गरज आहे. हिंदू स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांना रोखण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडले. याचबरोबर देशातील ओबीसी समाजबांधवांना सवलती मिळवून देण्यासाठी आयोग स्थापन करण्याची मागणी केली. मात्र, या दोन्ही बाबी सरकारने मान्य न केल्याने बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९३५ पर्यंत आंबेडकर हिंदू होते, मात्र बाबासाहेबांचा हिंदूनिष्ठ समतावाद मान्य केला नाही त्यामुळेच त्यांनी धर्मांतर केल्याचे सांगत धर्माच्या नावावर ज्यांनी बाबासाहेबांसह सात कोटी जनतेला त्रास दिला, त्यांना धडा शिकवायचा ठरविले असते तर त्यांनी बुध्द धम्माऐवजी इतर धर्म स्वीकारला असता. मात्र, बुध्द धम्मात प्रवेश करून त्यांनी सूडचक्र थांबविल्याचेही सबनीस यावेळी म्हणाले. बाबासाहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचा कैवार घेतला. कोकणातील खोती प्रथेविरूध्द काढलेला मोर्चा हे त्याचेच प्रतिक होते. परंतु, देशातील शेतकरी नेत्यांनाही बाबासाहेब समजले नसल्याचे सांगत आजच्या राजकारण्यांनी आंबेडकरांच्या शेतीविषयक धोरणांचा अभ्यास करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही वर्षात राजकारण्यांच्या खाबुगिरीमुळे १७७ साखर कारखाने आजारी पडले असून, ४२ कारखाने विकण्यात आले आहेत. तर २७ विक्रीच्या तयारीत आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा शेतकऱ्यांची मुले म्हणविणाऱ्या राजकारण्यांनीच केल्याचे सांगत राजकारणी अशा पध्दतीने वागणार असतील तर या देशातील शेतकरी जगणार कसा, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)