शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेमुळे २५ कोटींनी औषधींची विक्री घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 16:28 IST

इंदोर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही ? :  शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते धूळकणांनी मुक्त करण्यात आले. या स्वच्छतेचे परिणामही शहरवासीयांना दिसून येऊ लागले आहेत. मागील वर्षभरात २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. दमा आणि साथरोगांच्या आजाराचे प्रमाणही नगण्य झाल्याचा दावा महापौर तथा माजी आमदार मालिनी गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानात काहीही करून इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा अशी शपथच घेण्यात आली होती.तब्बल १५ हजार वर्ग मीटरपर्यंत शहरातील सर्व सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : इंदूर महापालिकेने शहर स्वच्छतेअंतर्गत ८५ वॉर्डांमधील तब्बल ९०० कचराकुंड्या गायब केल्या. सार्वजनिक ठिकाणी कुठेच कचरा साचणार नाही याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते धूळकणांनी मुक्त करण्यात आले. या स्वच्छतेचे परिणामही शहरवासीयांना दिसून येऊ लागले आहेत. मागील वर्षभरात २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. दमा आणि साथरोगांच्या आजाराचे प्रमाणही नगण्य झाल्याचा दावा महापौर तथा माजी आमदार मालिनी गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

स्वच्छ भारत अभियानात काहीही करून इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा अशी शपथच घेण्यात आली होती. तब्बल १५ हजार वर्ग मीटरपर्यंत शहरातील सर्व सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. प्रत्येक चौकात, वॉर्डांमधील अवैध पोस्टर्स, बॅनर हटवून स्वच्छतेचे फलक लावण्यात आले. विविध संस्था, संघटना, शाळांमध्ये जाऊन नागरिकांना शपथ दिली. या जनचळवळीचे परिणाम आम्हाला त्वरित दिसून येऊ लागले, असे अत्यंत आनंदात मालिनी गौड सांगत होत्या. शहरातील रस्त्यांची रात्री २० मशीनद्वारे सफाई होते. शहरातील ४२ टक्केधूळ-कणांचे प्रमाण घटले. त्यामुळे दम्याच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. स्वच्छतेमुळे डास आणि माशांही गायब झाल्या.

कठोर निर्णय घेतलेशहरातील लाखो नागरिकांची महापालिकेला साथ मिळू लागताच काही कठोर निर्णयही घेण्यात आले. प्रत्येक चौकात बसणाऱ्या जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात आला. ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची ही जनावरे होती त्यांचे अवैध बांधकामे पहाटे पाच वाजता महापालिकेने जमीनदोस्त केली. त्यामुळे शहरात मनपाबद्दल दहशत निर्माण झाली. या कामात मनपा खूपच गंभीर आहे, असे नागरिकांनाही वाटले. महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षांनीही या कामात आम्हालाच मदत केल्याचे त्यांनी प्रांजळपणे नमूद केले. 

( इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च )

स्मार्ट शहरांमध्येही बाजी मारणारशहरातील मलनिस्सारणापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राची मदत घेतली आहे. अणु किरणोत्सर्गचा वापर करून मानवी विष्ठेवर प्रक्रिया करण्यात येईल. अहमदाबादनंतर देशातील हा दुसरा प्रकल्प ठरणार आहे. प्लास्टिकपासून डांबरनिर्मिती, मानवीय केसांपासून खतनिर्मिती, हेल्मेट सक्ती, नद्यांना गतवैभव प्राप्त करून देणे आदी अनेक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत इंदूर शहर सध्या ७ व्या क्रमांकावर आहे. काही दिवसांमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घ्यायची आहे.

आयुक्तांचा सिंहाचा वाटामहापालिका आयुक्त मनीष सिंह यांनी शहर स्वच्छतेत खरोखरच सिंहाचा वाटा उचलला. १४ ते १६ तास ते काम करीत असत. महापौर आणि आयुक्त यांच्यात समन्वय असेल तरच शहराचा निश्चितच कायापालट होऊ शकतो, असेही महापौरांनी नमूद केले.

मनपातील भ्रष्टाचार संपविलामी महापौर होण्यापूर्वी आमदार होते. मध्यप्रदेश शासनात मंत्री असलेल्या यजमानाचे अपघाती निधन झाले. परिस्थितीने मला महापौरपदावर आणले. सर्वप्रथम महापालिकेतील भ्रष्टाचार मुळापासून संपविला. ही शहराच्या यशाची सर्वात मोठी आणि जमेची बाजू ठरली.मालिनी गौड, महापौर 

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmedicinesऔषधं