शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

स्वच्छतेमुळे २५ कोटींनी औषधींची विक्री घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 16:28 IST

इंदोर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही ? :  शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते धूळकणांनी मुक्त करण्यात आले. या स्वच्छतेचे परिणामही शहरवासीयांना दिसून येऊ लागले आहेत. मागील वर्षभरात २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. दमा आणि साथरोगांच्या आजाराचे प्रमाणही नगण्य झाल्याचा दावा महापौर तथा माजी आमदार मालिनी गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानात काहीही करून इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा अशी शपथच घेण्यात आली होती.तब्बल १५ हजार वर्ग मीटरपर्यंत शहरातील सर्व सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : इंदूर महापालिकेने शहर स्वच्छतेअंतर्गत ८५ वॉर्डांमधील तब्बल ९०० कचराकुंड्या गायब केल्या. सार्वजनिक ठिकाणी कुठेच कचरा साचणार नाही याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते धूळकणांनी मुक्त करण्यात आले. या स्वच्छतेचे परिणामही शहरवासीयांना दिसून येऊ लागले आहेत. मागील वर्षभरात २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. दमा आणि साथरोगांच्या आजाराचे प्रमाणही नगण्य झाल्याचा दावा महापौर तथा माजी आमदार मालिनी गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

स्वच्छ भारत अभियानात काहीही करून इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा अशी शपथच घेण्यात आली होती. तब्बल १५ हजार वर्ग मीटरपर्यंत शहरातील सर्व सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. प्रत्येक चौकात, वॉर्डांमधील अवैध पोस्टर्स, बॅनर हटवून स्वच्छतेचे फलक लावण्यात आले. विविध संस्था, संघटना, शाळांमध्ये जाऊन नागरिकांना शपथ दिली. या जनचळवळीचे परिणाम आम्हाला त्वरित दिसून येऊ लागले, असे अत्यंत आनंदात मालिनी गौड सांगत होत्या. शहरातील रस्त्यांची रात्री २० मशीनद्वारे सफाई होते. शहरातील ४२ टक्केधूळ-कणांचे प्रमाण घटले. त्यामुळे दम्याच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. स्वच्छतेमुळे डास आणि माशांही गायब झाल्या.

कठोर निर्णय घेतलेशहरातील लाखो नागरिकांची महापालिकेला साथ मिळू लागताच काही कठोर निर्णयही घेण्यात आले. प्रत्येक चौकात बसणाऱ्या जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात आला. ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची ही जनावरे होती त्यांचे अवैध बांधकामे पहाटे पाच वाजता महापालिकेने जमीनदोस्त केली. त्यामुळे शहरात मनपाबद्दल दहशत निर्माण झाली. या कामात मनपा खूपच गंभीर आहे, असे नागरिकांनाही वाटले. महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षांनीही या कामात आम्हालाच मदत केल्याचे त्यांनी प्रांजळपणे नमूद केले. 

( इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च )

स्मार्ट शहरांमध्येही बाजी मारणारशहरातील मलनिस्सारणापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राची मदत घेतली आहे. अणु किरणोत्सर्गचा वापर करून मानवी विष्ठेवर प्रक्रिया करण्यात येईल. अहमदाबादनंतर देशातील हा दुसरा प्रकल्प ठरणार आहे. प्लास्टिकपासून डांबरनिर्मिती, मानवीय केसांपासून खतनिर्मिती, हेल्मेट सक्ती, नद्यांना गतवैभव प्राप्त करून देणे आदी अनेक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत इंदूर शहर सध्या ७ व्या क्रमांकावर आहे. काही दिवसांमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घ्यायची आहे.

आयुक्तांचा सिंहाचा वाटामहापालिका आयुक्त मनीष सिंह यांनी शहर स्वच्छतेत खरोखरच सिंहाचा वाटा उचलला. १४ ते १६ तास ते काम करीत असत. महापौर आणि आयुक्त यांच्यात समन्वय असेल तरच शहराचा निश्चितच कायापालट होऊ शकतो, असेही महापौरांनी नमूद केले.

मनपातील भ्रष्टाचार संपविलामी महापौर होण्यापूर्वी आमदार होते. मध्यप्रदेश शासनात मंत्री असलेल्या यजमानाचे अपघाती निधन झाले. परिस्थितीने मला महापौरपदावर आणले. सर्वप्रथम महापालिकेतील भ्रष्टाचार मुळापासून संपविला. ही शहराच्या यशाची सर्वात मोठी आणि जमेची बाजू ठरली.मालिनी गौड, महापौर 

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmedicinesऔषधं