शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेमुळे २५ कोटींनी औषधींची विक्री घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 16:28 IST

इंदोर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही ? :  शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते धूळकणांनी मुक्त करण्यात आले. या स्वच्छतेचे परिणामही शहरवासीयांना दिसून येऊ लागले आहेत. मागील वर्षभरात २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. दमा आणि साथरोगांच्या आजाराचे प्रमाणही नगण्य झाल्याचा दावा महापौर तथा माजी आमदार मालिनी गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानात काहीही करून इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा अशी शपथच घेण्यात आली होती.तब्बल १५ हजार वर्ग मीटरपर्यंत शहरातील सर्व सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : इंदूर महापालिकेने शहर स्वच्छतेअंतर्गत ८५ वॉर्डांमधील तब्बल ९०० कचराकुंड्या गायब केल्या. सार्वजनिक ठिकाणी कुठेच कचरा साचणार नाही याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते धूळकणांनी मुक्त करण्यात आले. या स्वच्छतेचे परिणामही शहरवासीयांना दिसून येऊ लागले आहेत. मागील वर्षभरात २५ कोटींनी औषधांची विक्री घटली. दमा आणि साथरोगांच्या आजाराचे प्रमाणही नगण्य झाल्याचा दावा महापौर तथा माजी आमदार मालिनी गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

स्वच्छ भारत अभियानात काहीही करून इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा अशी शपथच घेण्यात आली होती. तब्बल १५ हजार वर्ग मीटरपर्यंत शहरातील सर्व सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. प्रत्येक चौकात, वॉर्डांमधील अवैध पोस्टर्स, बॅनर हटवून स्वच्छतेचे फलक लावण्यात आले. विविध संस्था, संघटना, शाळांमध्ये जाऊन नागरिकांना शपथ दिली. या जनचळवळीचे परिणाम आम्हाला त्वरित दिसून येऊ लागले, असे अत्यंत आनंदात मालिनी गौड सांगत होत्या. शहरातील रस्त्यांची रात्री २० मशीनद्वारे सफाई होते. शहरातील ४२ टक्केधूळ-कणांचे प्रमाण घटले. त्यामुळे दम्याच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. स्वच्छतेमुळे डास आणि माशांही गायब झाल्या.

कठोर निर्णय घेतलेशहरातील लाखो नागरिकांची महापालिकेला साथ मिळू लागताच काही कठोर निर्णयही घेण्यात आले. प्रत्येक चौकात बसणाऱ्या जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात आला. ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची ही जनावरे होती त्यांचे अवैध बांधकामे पहाटे पाच वाजता महापालिकेने जमीनदोस्त केली. त्यामुळे शहरात मनपाबद्दल दहशत निर्माण झाली. या कामात मनपा खूपच गंभीर आहे, असे नागरिकांनाही वाटले. महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षांनीही या कामात आम्हालाच मदत केल्याचे त्यांनी प्रांजळपणे नमूद केले. 

( इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च )

स्मार्ट शहरांमध्येही बाजी मारणारशहरातील मलनिस्सारणापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राची मदत घेतली आहे. अणु किरणोत्सर्गचा वापर करून मानवी विष्ठेवर प्रक्रिया करण्यात येईल. अहमदाबादनंतर देशातील हा दुसरा प्रकल्प ठरणार आहे. प्लास्टिकपासून डांबरनिर्मिती, मानवीय केसांपासून खतनिर्मिती, हेल्मेट सक्ती, नद्यांना गतवैभव प्राप्त करून देणे आदी अनेक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत इंदूर शहर सध्या ७ व्या क्रमांकावर आहे. काही दिवसांमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घ्यायची आहे.

आयुक्तांचा सिंहाचा वाटामहापालिका आयुक्त मनीष सिंह यांनी शहर स्वच्छतेत खरोखरच सिंहाचा वाटा उचलला. १४ ते १६ तास ते काम करीत असत. महापौर आणि आयुक्त यांच्यात समन्वय असेल तरच शहराचा निश्चितच कायापालट होऊ शकतो, असेही महापौरांनी नमूद केले.

मनपातील भ्रष्टाचार संपविलामी महापौर होण्यापूर्वी आमदार होते. मध्यप्रदेश शासनात मंत्री असलेल्या यजमानाचे अपघाती निधन झाले. परिस्थितीने मला महापौरपदावर आणले. सर्वप्रथम महापालिकेतील भ्रष्टाचार मुळापासून संपविला. ही शहराच्या यशाची सर्वात मोठी आणि जमेची बाजू ठरली.मालिनी गौड, महापौर 

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmedicinesऔषधं