शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

औरंगाबाद जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:34 IST

वरुणराजाची पुन्हा एकदा अवकृपा झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळातून शेतकरी सावरत असतानाच यावर्षी दुष्काळाचे संकट दारावर येऊन उभे ठाकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके करपून जात असून, त्यांची होणारी वाढही खुंटल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणींत मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे५६ मंडळे कोरडी : आतापर्यंत सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वरुणराजाची पुन्हा एकदा अवकृपा झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळातून शेतकरी सावरत असतानाच यावर्षी दुष्काळाचे संकट दारावर येऊन उभे ठाकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके करपून जात असून, त्यांची होणारी वाढही खुंटल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणींत मोठी वाढ झाली आहे.जिल्ह्यात मागील २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. पिकांनी माना टाकल्या असून, पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यांत सरासरी ३२६.३९ मि. मी. एवढा पाऊस अपेक्षित होता; परंतु आजपर्यंत केवळ १७५.३८ मि. मी. एवढा पाऊस पडल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.जिल्ह्यात दरवर्षी १ जून ते ३१ आॅक्टोबरदरम्यान सरासरी ६७५.४६ मि. मी. इतक्या पावसाची नोंद होते. यामध्ये ५ आॅगस्टपर्यंत ३२६.३९ मि. मी. इतका पाऊस होतो. यंदा प्रत्यक्षात ५४.०३ टक्के म्हणजे १७५.३८ मि. मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी ५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात २१३.२९ मि. मी. पाऊस झाला होता. यंदा गतवर्षीपेक्षा ३७.९१ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी ५६ मंडळे कोरडे असून, ९ मंडळांमध्ये केवळ काही थेंबांपुरता पाऊस झाला. दोन महिन्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत अर्धा पाऊस पडणे अपेक्षित होते. पावसाने दगा दिल्याने पिकांची परिस्थिती गंभीर बनत आहे.जूनपासूनच पावसाचा लहरीपणा दिसून आला. दोन महिन्यांत आठ ते दहा दिवस वगळता मोठा पाऊस झालेला नाही. बहुतांश दिवस कोरडे आणि भुरभुर पावसातच सरले. जिल्ह्यात १६ जुलै रोजी पावसाने अखेरची बºयापैकी हजेरी लावली होती. तेव्हापासून पावसाने जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. जिल्ह्यात आणखी काही दिवस मोठा पाऊस नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे पावसाविना पिके हातातून जाण्याचे संकट ओढावण्याची भीती आहे.अर्धा पावसाळा उलटला आहे, तरी शहरातील व शहरालगतचे तलाव कोरडेठाक आहेत. या तलावांचे तळ उघडे पडले असून, त्यातील वाळू चोरट्या मार्गाने उपसली जात आहे. हर्सूल, सावंगी आणि मोमबत्ता तलावात सध्या शून्य टक्के जलसाठा आहे.आॅगस्ट महिना लागला असून, आजवर जिल्ह्यात १७५ मि. मी. इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील १०७ लहान-मोठ्या लघुप्रकल्पांत समाधानकारक असा जलसाठा निर्माण झालेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा यंदा हिवाळ्यापासून बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.५ आॅगस्टपर्यंत एकूण सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये ३२६ मि. मी. इतक्या पावसाची अपेक्षा होती. परंतु तेवढा पाऊस न झाल्यामुळे दौलताबाद व खुलताबाद परिसराला थोड्या-फार प्रमाणात पाणीपुरवठा करणाºया मोमबत्ता तलावाने पूर्णत: तळ गाठला आहे.तलावातील वाळू चोरट्या मार्गाने उपसली जात असताना त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष सुरू केले आहे. हर्सूल- सावंगी तलावाचीदेखील हीच अवस्था आहे. दोन्ही तलाव पूर्णत: कोरडेठाक पडले असून, त्यातील वाळू उपसण्याचा धंदा तेजीत सुरू आहे.जिल्ह्यात आजवर एकूण सरासरीच्या तुलनेत फक्त २५ टक्के पाऊस पडला आहे. त्या पावसातून तलावात पुरेसा जलसाठा निर्माण झाला नाही. सातारा-देवळाई परिसरातील तळे व तलावांना थोडाफार पाणीसाठा आहे. एवढीच काय ती समाधानाची बाब सध्या आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळ