शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
4
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
5
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
6
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
7
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
8
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
9
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
10
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
11
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
12
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
13
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
14
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
15
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
16
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
17
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
18
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
19
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
20
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...

मराठवाड्यातील दुष्काळ पावसाने धुतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:13 IST

खरीप पिकांना जीवदान; नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा अधिक जोर

औरंगाबाद : पावसाअभावी माना टाकलेल्या खरीप पिकांना वरुणराजाने जीवदान दिले आहे.मराठवाड्याच्या बहुतांश भागात रविवारपासून पावसाने हजेरी लावली असून सोमवारी दिवसभर सर्वत्र कमी-अधिक स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता.तब्बल २५ दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे़ मुसळधार पावसामुळे नांदेडच्या विष्णूपुरीसह जिल्ह्यातील अनेक प्रकल्प तुडुंब भरले झाले आहेत़ मुदखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे़ भोकर तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे़ हिंगोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरूच आहे. वसमत, डोंगरकडा, कनेरगावनाका, जवळाबाजार, कुरूंदा, कळमनुरी, कडोळी, खुडज, कौठा, सवना, हट्टा, सेनगाव, जवळा पांचाळ, नांदापूर, नर्सीनामदेव, आडगाव रंजे इ. ठिकाणी पाऊस झाला.जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ मि. मी. पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांत सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली. गेवराई, धारूर, केज, परळी परिसरात रिमझिम पावसाला सुरूवात झाली. लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत दिवसभर भीजपाऊस झाला असून, खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र अद्याप जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जैसे थे असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.नांदेड जिल्ह्यात दोन शेतकरी गेले वाहूनहिमायतनगर (जि़नांदेड) : शेतातून घरी परत येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मारोती संग्राम बिरकुरे (६०, रा.वडगाव जहांगीर) हे नाल्यात वाहून गेले़ गावकऱ्यांनी नदीकाठावर शोधमोहीम सुरु केली होती़ मात्र बिरकुरे यांचा उशिरापर्यंत शोध लागला नाही़ दुसरी घटना हदगाव तालुक्यात घडली. कवाना येथील भारत हरिभाऊ तोडकर (३५) हे शेतकरी शेतातून घरी परत येत होते, तेव्हा पैनगंगा नदीच्या किनाºयावरून जाताना पाय घसरून ते पाण्यात वाहून गेले. उशिरापर्यंत त्यांचाही शोध लाला नव्हता.परभणी जिल्ह्यातील पाच गावांचा तुटला संपर्कसंततधार पावसामुळे पालम ते जांभूळबेट रस्त्यावरील लेंडी नदीला पूर आला आहे. पाण्याचा ओघ सुरूच असल्याने पुलाच्या पलीकडील बाजूस असलेल्या फळा, आरखेड, सोमेश्वर, घोडा व उमरथडी या गावांचा संपर्क काही तासांसाठी तुटला होता़पावसामुळे पिकाचे नुकसान; शेतकºयाची आत्महत्यापुसद (यवतमाळ) : पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे पाहून एका शेतकºयाने सोमवारी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली. डिगांबर काशिराम पवार (५०) रा. कवडीपूर असे मृताचे नाव आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डिगांबर पवार हे रविवारी शेतात गेले असता त्यांना पिकाचे नुकसान झाल्याचे दिसले. त्यांच्या दोन एकर शेतातील कपाशी, ज्वारीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. निराश होऊन त्यांनी सायंकाळी शेतातच विष प्राशन केले. पवार यांच्याकडे स्टेट बँकेचे २० हजारांचे कर्ज असल्याचे समजते.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाDamधरणWaterपाणी