शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

Drought In Marathwada : मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 19:44 IST

७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर वळणावर पोहोचू लागला आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सध्या विभागासमोर असून, १६ लाख २२ हजार २७६ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. ७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३६४ गावांतील ७ लाख १०० नागरिक, जालन्यातील ६३ गावांतील १ लाख ५८ हजार ७०६ नागरिक, नांदेडमधील १ गावातील १२६०० नागरिक, बीड जिल्ह्यातील १३४ गावांतील ६ लाख ९९ हजार ११८ नागरिक, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ गावांत राहणाऱ्या ११ हजार ७५२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ३७ गावांची वाढ झाली आहे. तसेच ५ लाख नागरिकांपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५६८ गावे आणि ६७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून, आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठ्यासाठी विभागातील ५७८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर :जिल्हा                  लोकसंख्या           गावे    टँकर संख्या औरंगाबाद         ७ लाख ४० हजार     ३६४    ४६३जालना              १ लाख ५८ हजार    ६३    ९५नांदेड                     १२ हजार ६००    ०१    ०२बीड                    ६ लाख ९९ हजार    १३४    १३९उस्मानाबाद            ११ हजार ७५२    ०६    ०६एकूण                १६ लाख २२ हजार     ५६८    ७०५

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणी